शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

बेशरममध्ये हरवले धाम नदीचे पात्र

By admin | Updated: February 28, 2017 01:13 IST

वर्धा शहरासह अनेक गावांना पिण्याचे पाणी पूरविणारी धाम नदी सध्या अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडली आहे.

पाणी होतेय दूषित : पाटबंधारे विभाग, जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतीचेही दुर्लक्षचमोईन शेख आंजी (मोठी)वर्धा शहरासह अनेक गावांना पिण्याचे पाणी पूरविणारी धाम नदी सध्या अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडली आहे. नदी पात्रात सर्वत्र बेशरम वाढली असून शेवाळ साचले आहे. परिणामी, पाणी दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे लक्ष देत धाम नदीचे पात्र स्वच्छ करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आंजी येथून वाहणारी धाम नदी बेशरम व इतर झुडपांनी हरविल्याचे चित्र आहे. बेशरम वाढल्याने तथा झुडपांमुळे नदीचे पात्रच दिसेनासे झाले आहे. धाम नदी महाकाळी प्रकल्पातून वाहत असून वणा नदीला जाऊन मिळते. या नदीचे पात्र सर्वत्रच बेशरम व झुडपांनी पूर्णत: बुजलेले दिसून येते. यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि दिशाच बददल्याचे दिसून येते. महाकाळी प्रकल्पापासून येळाकेळीपर्यंत ही नदीच मुख्य कालवा म्हणून कार्य करते. त्यामुळे नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १९८५ पासून महाकाळी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे; पण अद्याप एकदाही नदीचे पात्र साफ करण्यात आलेले नाही. यामुळे नदीने आपल्या प्रवाहाचा मार्ग बदलल्याचे दिसून येते. परिणामी, नदी पात्र सरळीकरण आणि स्वच्छतेची मागणी ग्रामस्थांतून होत आहे; पण ग्रा.पं. प्रशासनला हे काम परवडण्यासारखे नसल्याने कधी कुणी पुढाकार घेतल्याचे ऐकिवात नाही.महाकाळी प्रकल्पापासून काचनूर, मोरांगणा, खरांगणा, कामठी, सेवा, खैरी, आंजी, सुकळी, येळाकेळीपर्यंत नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात बेशरम आणि विविध वनस्पतींच्या झुडपांनी हरविल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात नदीला पूर येते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत असल्याने नदीचे पाणी गावात शिरते. परिणामी, पुरामुळे गावाला धोका निर्माण झाला आहे. महाकाळी ते येळाकेळीपर्यंत ही नदी कालव्याचे काम करीत असल्याने पाटबंधारे विभागाने पात्राची स्वच्छता करणे गरजेचे आहे; पण हा विभाग नदीच्या पात्राकडे कधीही लक्ष देताना दिसत नाही. ग्रामपंचायत प्रशासन नदीच्या स्वच्छतेकरिता मोठ्या प्रमाणात निधी खर्च करू शकत नाही आणि जिल्हा प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नदीच्या काठावरील गावांना धोका निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.पाणी पुरवठा योजनांनाही धोकाचधाम नदीवर वर्धा शहरासह अनेक गावांतील पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. या योजनांच्या परिसरातही अनेक ठिकाणी बेशरमची झाडे तथा झुडपेही वाढली आहे. नदी पात्रामध्ये अनेक ठिकाणी शेवाळ साचले आहे. यामुळे पाणी अवरुद्ध होत आहे. परिणामी, पाणी पुरवठ्याच्या यंत्रणांमध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या नदीवरून जीवन प्राधिकरण, नगर परिषद वर्धा तथा अन्य गावांना पाणी पुरवठा केला जातो. यामुळे ही नदी स्वच्छ करीत योजनांचा भविष्यातील धोका टाळणे गरजेचे झाले आहे.