शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे दिवाळीची शुभेच्छापत्रे नामशेष

By admin | Updated: November 11, 2015 01:28 IST

दिवाळी हा भारतीयांसाठी लाखमोलाचा सण आहे. श्रीमंत, गरीब प्रत्येकच आपल्या परीने दिवाळी साजरी करतो.

दिवाळीत व्हॉटस्अ‍ॅपचा सर्वाधिक वापर : स्वस्तात व लवकर पोहोचतात मॅसेजवर्धा : दिवाळी हा भारतीयांसाठी लाखमोलाचा सण आहे. श्रीमंत, गरीब प्रत्येकच आपल्या परीने दिवाळी साजरी करतो. तरुणांसाठी हा सण आनंदाचा वर्षाव करणारा असतो. तो इतरांसोबत शेंअर करण्यासाठी आधी मोठ्या प्रमाणात छापील शुभेच्छापत्रांचा उपयोग होत आहे. पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियातील नवनवीन माध्यमांमुळे ही शुभेच्छापत्रे इतिहासजमा होत आहेत. इंटरनेटने मोबाईल आणि संगणक सोशल मीडियाला जोडल्या गेल्याने आॅनलाईन शुभेच्छापत्रांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे छापील शुभेच्छापत्रांची मागणी कमालीची मंदावली आहे. त्यातच व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक आदी माध्यमांतून स्वस्तात व काही क्षणात व्हर्चुअल ग्रिटिंग कार्ड कुणालाही पाठविता येते. पूर्वी सणानिमित्त विविधांगी शुभेच्छापत्रांची खरेदी करून ती आप्तस्वकीय, मित्र-मैत्रिणींना पाठविण्यात येत होती. दिवाळीला तर शुभेच्छापत्रांच्या दुकानात ग्राहकांची कमालीची गर्दी असायची. आता मोबाईलच्या वापरामुळे, आगमनामुळे शुभेच्छापत्रांची क्रेझ कमी होताना दिसत आहे. नक्षीदार व कलाकुसरीने तयार शुभेच्छापत्रांचे युवकांमधील आकर्षण दिवसेंदिवस कमी होत आहे. केवळ व्हॅलेंटाइन डे लाच शुभेच्छापत्रांचा खप मोठ्या प्रमाणात होतो. सोशल मीडियाद्वारे सहज व तात्काळ संदेश पाठविता येतात. त्यामुळे सर्वांचीच सोशल मीडियातील माध्यमांना पसंती मिळत आहे. आहे. इंटरनेट पॅक मारून जास्त जणांना दिवाळीच्या शुभेच्छा देता येतात.फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपवर तर दररोज अ‍ॅडव्हान्स शुभेच्छांचा वर्षाव होतो. इंटरनेट पॅक मारल्यानंतर एसएमएसचे दर लागत नसल्याने शुभेच्छांचा वर्षाव पहावयास मिळतो. शुभेच्छांची डिझाईन मोबाईलवर तयार करून किंवा इंटरनेटवरील शुभेच्छापत्र डाऊनलोड करून युवक-युवती ते फेसबुकवर अपलोड करतात. या कारणाने छापील शुभेच्छापत्रांना घरघर लागली असून ही दुकाने भर दिवाळीत खाली दिसत आहे. पूर्वी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या जायच्या. काही दिवसांपूर्वीपासून पत्रे लिहिली जायची. आता तर पत्र कसे लिहायचे हे देखील युवकांना माहिती नसल्याचे वास्तव आहे. यामुळे कागदाचा अपव्यय मात्र वाचला आहे.(शहर प्रतिनिधी)