शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

निम्म्या वर्धा शहराला तीन दिवस मिळणार नाही पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST

 वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी २७ मे रोजी मान्यता दिल्यानंतर शुक्रवार २८ मेपासून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाच पोकलेनच्या साहाय्याने सध्या धाम नदीतील गाळ काढला जात असून हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे.

ठळक मुद्देयेळाकेळीत ‘धाम’ होतेय स्वच्छ : पाणी जपून वापरण्याचे न.प.चे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा नगरपालिका प्रशासन वर्धा शहरातील सुमारे १७ हजार कुटुंबाला पाणी पुरवठा करते. पण सध्या येळाकेळी येथील धाम नदीचे पात्र बजाज फाऊंडेशनच्या मदतीने वर्धा पाटबंधारे विभाग करीत आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस शहरातील अर्ध्या परिसरात पाणी पुरवठा होणार नसल्याचे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन वर्धा नगरपालिका प्रशासनाने केले आहे. वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी २७ मे रोजी मान्यता दिल्यानंतर शुक्रवार २८ मेपासून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाच पोकलेनच्या साहाय्याने सध्या धाम नदीतील गाळ काढला जात असून हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. धाम नदीची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच ती स्वच्छ व्हावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शनिवारी वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी सुनील रहाणे, वर्धा नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे नीलेश नंदनवार आदींनी येळाकेळी गाठून प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. सलग तीन दिवस नळाला पाणी येणार नसल्याने नागरिकांनाही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.

या भागातील नळांना येणार नाही पाणी- धाम नदीपात्र स्वच्छ केले जात असल्याने वर्धा शहरातील गौरक्षण वॉर्ड, कृष्णनगर, बॅचलररोड, राजकला टॉकीज रोड, भामटीपुरा, तेलीपुरा, साईमंदिर रोड, निर्मल बेकरी, रामनगर, धंतोली, पोद्दार बगिचा, इंदिरा मार्केट, वंजारी चौक, सराफ लाईन, अंबिका चौक, पटेल चौक, गुजराती भवन, पावडे चौक, राधानगर, म्हाडा कॉलनी, मानस मंदिर, गजानननगर, गोंड प्लॉट, स्टेशन फैल, तारफैल, दयालनगर, अशोकनगर, एम.जी. कॉलनी, जाकीर हुसैन कॉलनी या भागात पुढील तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही.

तीन दिवसांत काढणार २५ हजार घनमीटर गाळ- धाम स्वच्छता अभियान अंतर्गत तीन दिवसांत किमान २५ हजार घनमीटर गाळ नदीपात्रातून काढण्यात येणार आहे. पोखलेनच्या मदतीने दोन मीटर खोल व बंधाऱ्यापासून १ किमी लांब पोखरून धाम नदीपात्रात गाळ काढण्यात येणार आहे. या कामासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था विशेष सहकार्य करीत आहे.

येळाकेळी येथील धाम नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जानकीदेवी बजाज ग्रामीण विकास संस्थेचे विशेष सहकार्य या कामाला लागत आहे. तीन दिवसांत किमान २५ हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे.- सुनील रहाणे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा. 

येळाकेळी येथील धाम नदीपात्रातून गाळ काढल्या जात असल्याने पुढील तीन दिवस वर्धा शहरातील अर्ध्या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. - नीलेश नंदनवार, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, न.प. वर्धा.

 

टॅग्स :riverनदीWaterपाणी