शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या वर्धा शहराला तीन दिवस मिळणार नाही पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST

 वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी २७ मे रोजी मान्यता दिल्यानंतर शुक्रवार २८ मेपासून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाच पोकलेनच्या साहाय्याने सध्या धाम नदीतील गाळ काढला जात असून हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे.

ठळक मुद्देयेळाकेळीत ‘धाम’ होतेय स्वच्छ : पाणी जपून वापरण्याचे न.प.चे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा नगरपालिका प्रशासन वर्धा शहरातील सुमारे १७ हजार कुटुंबाला पाणी पुरवठा करते. पण सध्या येळाकेळी येथील धाम नदीचे पात्र बजाज फाऊंडेशनच्या मदतीने वर्धा पाटबंधारे विभाग करीत आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस शहरातील अर्ध्या परिसरात पाणी पुरवठा होणार नसल्याचे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन वर्धा नगरपालिका प्रशासनाने केले आहे. वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी २७ मे रोजी मान्यता दिल्यानंतर शुक्रवार २८ मेपासून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाच पोकलेनच्या साहाय्याने सध्या धाम नदीतील गाळ काढला जात असून हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. धाम नदीची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच ती स्वच्छ व्हावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शनिवारी वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी सुनील रहाणे, वर्धा नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे नीलेश नंदनवार आदींनी येळाकेळी गाठून प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. सलग तीन दिवस नळाला पाणी येणार नसल्याने नागरिकांनाही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.

या भागातील नळांना येणार नाही पाणी- धाम नदीपात्र स्वच्छ केले जात असल्याने वर्धा शहरातील गौरक्षण वॉर्ड, कृष्णनगर, बॅचलररोड, राजकला टॉकीज रोड, भामटीपुरा, तेलीपुरा, साईमंदिर रोड, निर्मल बेकरी, रामनगर, धंतोली, पोद्दार बगिचा, इंदिरा मार्केट, वंजारी चौक, सराफ लाईन, अंबिका चौक, पटेल चौक, गुजराती भवन, पावडे चौक, राधानगर, म्हाडा कॉलनी, मानस मंदिर, गजानननगर, गोंड प्लॉट, स्टेशन फैल, तारफैल, दयालनगर, अशोकनगर, एम.जी. कॉलनी, जाकीर हुसैन कॉलनी या भागात पुढील तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही.

तीन दिवसांत काढणार २५ हजार घनमीटर गाळ- धाम स्वच्छता अभियान अंतर्गत तीन दिवसांत किमान २५ हजार घनमीटर गाळ नदीपात्रातून काढण्यात येणार आहे. पोखलेनच्या मदतीने दोन मीटर खोल व बंधाऱ्यापासून १ किमी लांब पोखरून धाम नदीपात्रात गाळ काढण्यात येणार आहे. या कामासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था विशेष सहकार्य करीत आहे.

येळाकेळी येथील धाम नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जानकीदेवी बजाज ग्रामीण विकास संस्थेचे विशेष सहकार्य या कामाला लागत आहे. तीन दिवसांत किमान २५ हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे.- सुनील रहाणे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा. 

येळाकेळी येथील धाम नदीपात्रातून गाळ काढल्या जात असल्याने पुढील तीन दिवस वर्धा शहरातील अर्ध्या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. - नीलेश नंदनवार, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, न.प. वर्धा.

 

टॅग्स :riverनदीWaterपाणी