शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

गुणगौरव सोहळ्याला मुकणार गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:50 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शिक्षकदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येतो; पण यावर्षी शिक्षण विभागातील औदासिन्य आणि शिक्षणाधिकाºयांचा नाकर्तेपणामुळे शिक्षणदिनी गुणगौरव सोहळ्याला सर्वच मुकणार आहेत.

ठळक मुद्देनामुष्की : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे शिक्षकदिनाचा कार्यक्रम रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शिक्षकदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येतो; पण यावर्षी शिक्षण विभागातील औदासिन्य आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा नाकर्तेपणामुळे शिक्षणदिनी गुणगौरव सोहळ्याला सर्वच मुकणार आहेत.माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती देशभर ५ सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी राष्ट्रीय स्तरावर व राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शासनाकडून गौरव केला जातो. जिल्हास्तरावर सुद्धा उत्कृष्ठ कार्य करणाºया शिक्षकांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा या दिवशी सन्मान करण्यात येतो; पण नियोजनाअभावी यंदाच्या शिक्षक दिनाच्या सोहळ्यासाठी उत्कृष्ट शिक्षकांचे प्रस्ताव बोलावण्यातच विलंब झाला. सोबतच उत्कृष्ट शिक्षकांची निवड करताना राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे अनेक शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यास अनुत्साही आहेत. त्यातही वर्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुरेशी तयारी केली नाही. शिवाय पाठपुरावा न केल्याने प्रस्ताव येण्यासही विलंब झाला. असे असतानाही जे प्रस्ताव तालुक्यातून प्राप्त झाले त्या प्रस्तावांची छाननी करून जि.प. अध्यक्षांच्या नेतृत्वातील निवड समितीची सभा बोलावून पुरस्कार प्राप्त शिक्षकांची घोषणा करणे आवश्यक होते. तसेच पत्रिका निश्चित करुन ती छापण्यास देणे, प्रमाणपत्र गौरव चिन्ह यासाठी निविदा बोलावणे आदी निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभागाने साफ दुर्लक्ष केल्याने प्रथमच जिल्हा परिषदेवर ही नामुष्की ओढवली आहे.यांचा झालाय हिरमोडशिक्षकदिनी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्रत्येकी एक प्रमाणे आठ शिक्षकांचा गुणगौरव केला जातो. तसेच नवोदय विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये सुयश प्राप्त करून उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षकदिनी गुणगौरव करण्यात येतो. पण, यावर्षी नियोजनशुन्यतेमुळे हा कार्यक्रम होणार नसल्याने या सर्वांचा हिरमोड झाला आहे.शिक्षण विभागाचा कारभार ढेपाळलासध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षणाधिकाऱ्यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघत आहे. शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वभावामुळे व वर्तणुकीमुळे पदाधिकारी, प्रशासनिक यंत्रणा, शिक्षक आणि सर्वच कर्मचारी वैतागले आहे. कोणत्याच कामात नियोजन नसून केवळ अडथळे निर्माण करण्याचे काम प्राथमिक शिक्षण विभागात सुरू आहे. शासनाकडे तक्रारी करूनही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बाबतीत कोणताच निर्णय होत नाही. देशात राज्यात आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता असताना सुद्धा एक अधिकारी सर्वांनाच वेठीस धरत असल्याचे कार्यपद्धतीवरुन दिसून येत आहे.यापूर्वीही कार्यक्रम रद्द झाला; पण...दरवर्षी शिक्षकदिनी कार्यक्रमाचे आयोजन केले जात. त्यासाठी शिक्षकदिनापर्यंत सर्व नियोजन असायचे. मिलींद भेंडे हे शिक्षण सभापती असताना शिक्षकदिनीच महालक्ष्मी पूजन असल्याने त्यावर्षी शिक्षक दिनाचा कार्यक्रम महात्मा गांधी जयंतीदिनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे उपस्थितीत संपन्न झाला होता; पण या कार्यक्रमाची तयारी शिक्षकदिनापर्यंत पुर्ण झाली होती. यंदा अद्यापही कार्यक्रमाचे कुठलेच नियोजन नाही.शिक्षक समितीने केला निषेधग्रामीण भागात शासन व जि.प. प्रशासनाकडून तात्काळ गुणवत्तेची अपेक्षा केली जाते. शिक्षकांकडून प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी करण्याची सक्ती करताना विलंब झाल्यास कार्यवाहीची धमकी दिल्या जाते. त्याच शिक्षण विभागात यंदा शिक्षकदिनाचा कार्यक्रम होणार नसल्याने त्याचा म.रा. प्राथमिक शिक्षक समितीकडून निषेध करण्यात आला आहे.जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी याबाबत कोणतेही नियोजन केलेले नाही. शिवाय त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. सूचविलेल्या बाबींकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने हा शिक्षकदिनाचा कार्यक्रम घेता आला नाही. याला शिक्षणाधिकारी जबाबदार आहे.- जयश्री गफाट, सभापती,शिक्षण व आरोग्य समिती,जि. प. वर्धा....अन् मुख्य कार्यपालन अधिकारीही भडकलेशिक्षण विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या विसंवादामुळे कार्यक्रमाला ग्रहण लागले आहे. दरवर्षी जिल्ह्याचे खासदार आणि आमदार यांच्यासह जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाची यावर्षी पत्रिका निश्चित करताना शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी खासदार, आमदारांना न बोलावण्याचा निर्णय घेत त्यांच्या नावावर आणि खासदार, आमदार या पदावलीवर रेघ ओढण्याचा प्रकार घडला. त्यानंतर मात्र मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना हे कळल्यावर त्यांनी चांगलेच खडसावल्याने त्यात सुधारणा करण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदमध्ये आज होती.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण