शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भूजल साठ्यात ०.५८ मीटरची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:12 PM

उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही गावांत विहिरींना कोरड पडून भीषण पाणीटंचाई जाणवत होती; पण मागील काही वर्षांत झालेले पुनर्भरण तथा जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे यंदा भूजल पातळी राखली गेली आहे.

ठळक मुद्देपातळी सरासरी ७.६० मीटर : ११२ विहिरींचे केले निरीक्षण

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही गावांत विहिरींना कोरड पडून भीषण पाणीटंचाई जाणवत होती; पण मागील काही वर्षांत झालेले पुनर्भरण तथा जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे यंदा भूजल पातळी राखली गेली आहे. असे असले तरी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत भूजल साठ्यात सरासरी ०.५८ मिटरची घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने निरीक्षण केलेल्या ११२ विहिरींची सरासरी पाणी पातळी ७.६० मिटरपर्यंत खालावल्याचे सांगण्यात आले.यंदा एप्रिल महिन्यातच पारा ४४ अंशाला टेकला होता. शिवाय सातत्याने ४३ ते ४४ अंश सेल्सीअस दरम्यान तापमानाची नोंद होत आहे. यामुळे यंदा पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवेल, असा प्रशासनासह सर्वांचा अंदाज होता. यासाठीच पाणीटंचाईच्या उपाययोजनांना प्रारंभ करण्यात आला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील विहिरींची पाणी पातळी त्या तुलनेत घटली नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. या कार्यालयाद्वारे आर्वी तालुक्यातील १२ विहिरींचे निरीक्षण केले. यात मागील पाच वर्षांत जलपातळी ५.८६ मीटर तर यंदा मार्चपर्यंत ६.५० मीटर म्हणजे ०.६४ मीटर घट नोंदविली आहे. आष्टी तालुक्यातील ८ विहिरींच्या निरीक्षणात पाच वर्षांत ९.०२ वर असलेली पातळी ९.४४ वर जात ०.४२ मीटरने घटली. कारंजा तालुक्यात १२ विहिरींचे निरीक्षण केले. यात पाच वर्षांतील ६.८५ वरील पातळी ७.२५ वर गेली असून ०.४० मिटरने घटली. वर्धा तालुक्यातील १२ विहिरींचे निरीक्षण केले. यात पाच वर्षांत ८ वर असलेली जलपातळी ८.५८ वर म्हणजे ०.५८ मिटर घटल्याचे नमूमद आहे. देवळी तालुक्यातील ११ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. यात पाच वर्षांत ५.९४ मीटरची असलेली नोंद ६.७६ वर जात ०.८२ मीटर घटली आहे. सेलू तालुक्यातील २० विहिरींच्या निरीक्षणात पाच वर्षांत ७.२७ वर असलेली पातळी ७.८२ वर गेली. यात ०.५५ मीटर घट झाली. हिंगणघाट तालुक्यातील २४ विहिरींच्या निरीक्षणात पाच वर्षांत ६.७२ मिटर असलेली पातळी ०.७२ मिटर घटून ७.४४ वर गेली. समुद्रपूर तालुक्यातील १३ विहिरींच्या निरीक्षणात पाच वर्षांतील ६.५५ मीटरवरून ०.४७ मीटरने घटून ७.०२ मीटरवर पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूण ११२ विहिरींची मागील पाच वर्षांची सरासरी ७.०३ मीटरवरून ०.५८ मीटरने घटून ७.६० मीटरवर पोहोचली आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामांमुळे भूजल पातळीमध्ये यंदा अपेक्षेपेक्षा कमी घट आल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने सांगितले. पर्जन्यमानातील १८.८४ टक्क्यांच्या घटीनंतरही जिल्ह्यातील भूजल पातळी फारशी खालावली नसल्याने भिषण पाणीटंचाईचे सावट नाही.जलयुक्त शिवार व वॉटर कपमुळे पातळी टिकूनवर्धा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक कामे करण्यात आलीत. यात नाला खोलीकरण, सरळीकरण, सिमेंट बंधारे, गावतलाव, तलावांचे खोलीकरण आदी कामांचा समावेश आहे. यामुळे भूजल पातळी राखण्यास मोलाची मदत झाल्याचे सांगण्यात आाले आहे. वास्तविक, मागील वर्षी पावसाची तूट असल्याने यंदा भूजल पातळीत मोठी घट अपेक्षित होती; पण तसे झाले नाही. केवळ ०.५८ मीटरने जलपातळी खालावली आहे. यामुळे जिल्ह्यात भिषण पाणीटंचाईचे चिन्ह नसल्याचेही सांगण्यात आले आहे.पर्जन्यमानात १८९.२३ मिमीची घटजिल्ह्यात सरासरी १००४.१९ मिलीमीटर पावसाची नोंद अपेक्षित असते; पण मागील वर्षी ८१४.९६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सरासरीपेक्षा जिल्ह्यात १८९.२३ मिलीमिटर पाऊस कमी झाला आहे. एकूण पावसामध्ये १८.८४ टक्के घट आल्याने यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवेल, अशी अपेक्षा होती; पण शासन, खासगी संस्था तथा ग्रामस्थांकडून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे विशेष पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे जीएसडीएने सांगितले. त्यांनी केलेल्या ११२ विहिरींच्या निरीक्षणात केवळ देवळी व हिंगणघाट तालुक्यात भूजल पातळी अधिक खालावली. यामुळे धोक्याचे संकेत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई