गटशेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा विकास शक्य

By Admin | Updated: May 22, 2014 01:27 IST2014-05-22T01:27:05+5:302014-05-22T01:27:05+5:30

विदर्भात शेतकर्‍यांकडे दरडोई शेतीचे प्रमाण चांगले आहे; पण उत्पादनात फारशी सुधारणा दिसत नाही.

Grassroots can be developed by farmers | गटशेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा विकास शक्य

गटशेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा विकास शक्य

वर्धा : विदर्भात शेतकर्‍यांकडे दरडोई शेतीचे प्रमाण चांगले आहे; पण उत्पादनात फारशी सुधारणा दिसत नाही. शेतीवर अवलंबून असणार्‍यांची संख्या अधिक आहे; पण शेतीवर काम करणार्‍यांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत आपली शेती गटाच्या माध्यमातून केल्यास उत्पादन खर्चात कपात होईल व उत्पादनात वाढ होईल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकर्‍याचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन समूह शेतीचे प्रणेते कृषीभूषण नाथराव कराड इंजेगाव (बिड) यांनी केले.

जा.ब. ग्रामविकास संस्था व जिल्हा प्रकल्प आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विकास प्रशिक्षण कार्यक्रम निमसडा व टाकळी (चणा) येथे घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिकारी गायकवाड होते.

नाथराव कराड पूढे म्हणाले की, समुहात शेतकर्‍यांना अधिक शिकता येते व अनुभवाचे आदान-प्रदान होत असल्याने नुकसान कमी होते. एकत्रीतपणे बियाणे, खतांची खरेदी व अनेक शेतीपयोगी निविष्ठांची खरेदी केल्यास २५ ते ३0 टक्केपर्यंतची बचत होऊ शकते, हे सप्रमाण त्यांनी विषद केले. शेतकर्‍यांना गारपीट, दुष्काळ, अतवृष्टी, वादळ, पूर अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सतत तोंड द्यावे लागते. संकटाशी सामना करताना शेतकरी हतबल होतो. आजच्या स्थितीत शेती अधिक आव्हानात्मक झाली आहे. या परिस्थितीतून बाहेर निघायचे असेल तर शेतकर्‍यांनी समुहशेतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामुहिक माती परिक्षण, एक गाव एक वाण, एकात्मिक कीड व्यवस्थापन आदी बाबी केल्यास पीपीपीमध्ये सहभागी संस्थांकडून उत्पादनाला ज्यादा दर प्राप्त होऊ शकते. ठिंबक सिंचनाकडे एकत्रित वळण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी खरीपाच्या पुर्वतयारीकरिता बियाणे, खतांच्या उपलब्धतेबाबत मार्गदर्शन केले.

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे सचिव सोहनी, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय उपस्थित होते. प्रास्ताविक पानकर यांनी तर संचालन विनेश काकडे यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच प्रशांत निमसडकर, पराते, उपाध्ये, वर्‍हाडे, भोंगाडे, बन्सोड आदींनी सहकार्य केले. यावेळी टाकळी येथील शेतकरी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)

 

 

Web Title: Grassroots can be developed by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.