शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट कामांसाठी ग्रा.पं. निधीतील कपात जबाबदार

By admin | Updated: December 18, 2015 02:40 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून १५ लाख रुपयांपर्यंतची कामे पूर्ण करण्यासाठी ग्रा.पं. कडे दिली जातात.

स्वायत्ततेवरही प्रश्नचिन्ह : शासनाच्या धोरणालाही जाताहेत तडासंजय बिन्नोड विजयगोपालजिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून १५ लाख रुपयांपर्यंतची कामे पूर्ण करण्यासाठी ग्रा.पं. कडे दिली जातात. ही कामे जि.प. व पं.स.ने ग्रा.पं. ला दिलेली असल्यास त्यांच्या देयकातून वैधानिक वजावटी कपात करू नये, असा शासन निर्णय आहे. असे असताना प्राप्तीकर, विक्रीकर, विमा आकार, प्रतिभूती ठेव इतर कपाती केल्या जातात. याचा परिणाम संबंधित कामांवर होत आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभाग मुंबईच्या २ मे २०००, ३० जून ०४ व ९ फेबु्रवारी ०९ या निर्णयान्वये ७३ व्या घटना दुरूस्तीनुसार ग्रा.पं. संस्थांचे बळकटीकरण करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. ग्रा.पं. ला जादा अधिकार देणे, ग्रा.पं.चे सर्वार्थाने बळकटीकरण करणे व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा उद्देश होता. या अनुषंगाने ग्रा.पं. हद्दीतील कामे संबंधित ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामांना गती येऊन कामे अधिक चांगली व त्वरित व्हावी, ग्रा.पं.चे आर्र्थिक सबलीकरण व बळकटीकरण यातून शक्य होणार आहे. यामुळेच जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून १५ लाखांपर्यंतची कामे ग्रा.पं. ला दिली जातात. ही कामे जिल्हा परिषद वा पंचायत समिती ग्रा.पं. ला देत असल्याने त्यांच्या देकायतून वैधानिक वजावटी प्राप्तीकर, विक्रीकर, विमा आकार, प्रतिभूती ठेव इतर वजावटी वसुली करण्याची गरज नाही, अशा स्पष्ट सूचना भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांनी ३१ मार्च २००८ रोजी सादर केलेल्या स्थानिक संस्थांच्या अहवालात नमूद केल्या आहेत. जिल्हा परिषेदेनेही याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. असे असले तरी काही विभाग व पं.स. सदर कपाती करीत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, कामे निकृष्ट होत आहे. शिवाय ग्रा.पं. बळकटीकरण या शासनाच्या धोरणाला तडा जात असून ग्रा.पं. चे खच्चीकरण होत आहे. यावर तोडगा काढून कामे दर्जेदार होण्याकरिता शासनाने सुस्पष्ट व कडक धोरण अवलंबिणे गरजेचे आहे.