शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

ग्रामसभेतून ग्रामसचिवासह सदस्यांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 00:31 IST

शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचातीपैकी एक असलेल्या साटोडा ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी जयंती निमित्य रविवारी ग्रामसभा झाली.

साटोडा येथील प्रकार : नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना उडाली भंबेरी; समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनवर्धा : शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचातीपैकी एक असलेल्या साटोडा ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी जयंती निमित्य रविवारी ग्रामसभा झाली. या सभेत येथील ग्रामस्थांनी सरपंच प्रिती शिंदे, ग्रामसवेक सुनील गावंडे व सदस्य सागर बुचे यांच्यावर समस्यांचा भडीमार केला. यावेळी ग्रामस्थांच्या प्रश्नांसमोर निरूत्तर झालेले ग्रामसेवक गावंडे व सदस्य बुचे यांनी सभेतून पलायन केल्याने नागरिक चांगलेच संतापले.यावेळी ग्रामस्थ झाडाच्या सावलीत ग्रामपंचायत आपल्या समस्येचे निराकरण करेल या आशेने उभे राहून वाट बघत होते; मात्र त्यांची आशा हवेतच विरल्याचे दिसून आले. यामुळे ही ग्रामसभा कशासाठी घेतली असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी केला. ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अंजनीमाता नगरातील समस्येबाबत स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत महिला व नागरिकांनी निवेदन दिले होते. यात ग्रामसेवक व सरपंच यांनी स्वत: पाच दिवसाच्या आत निवेदनातील समस्या निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यावर अद्याप कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे तलावातील पाणी घरात व विहिरीत जात आहे. नळयोजना नसल्याने नाईलाजाने तेच पाणी नागरिकांना प्यावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अंजनी माता वॉर्डातील या समस्यांबाबत नागरिकांनी ग्राम पंचायत सदस्य सागर बुचे यांच्याशी बोलले असता या भागातील नागरिकांनी मला मतदान केले नाही. म्हणून वॉर्डात कुठलेही काम होणार नाही, असे ते म्हणाल्याचे सुनंदा जगताप, शोभा कोवे, जयश्री चौधरी, वंदना तळवेकर, आशा निदेकर, पुष्पा हेलवटकर, संतोष कोलारकर, कांता वतकर, लता कोपरकर, अविनाश हेलवटकर व इतर नागरिकांनी सांगितले. या बाबत ग्रामपंचायतीने लकडे यांच्या घराजवळील व ले-आऊट मधील पाण्याची व अंजनी माता मंदिराच्या मागील बाजूच्या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)