शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आजच उरकवा काम, उद्यापासून कर्मचारी संपावर ठाम; शासकीय यंत्रणा कोलमडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 12:24 IST

१३ हजार कर्माचाऱ्यांचा सहभाग

वर्धा : एनपीएस बंद करून सर्व राज्य कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सेवानिवृत्ती अधिनियम १९८२ नुसार जुनी पेन्शन लागू करावी या मागणीकरिता गेल्या १७ वर्षांपासून कर्मचारी संघर्ष करीत आहे. विविध आंदोलने केली; परंतु राज्य शासनाने यासंबंधात कोणतीही दखल घेतली नाही. आता निर्णायक म्हणून राज्यातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर, जिल्हा परिषद कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी यांच्या संघटनांच्या राज्य समन्वय समितीने १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १३ हजार कर्मचारीही संपाच्या निर्णयावर ठाम असल्याने मंगळवारपासून शासकीय यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीकरिता सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी आक्रमक झाले असून, आता त्यांनी बेमुदत संपाचे शस्त्र उगारले आहे. या संपात राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा शासकीय व निमशासकीय वाहन चालक संघटना, जिल्हा राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद वर्धाअंतर्गत लिपिक संघटना, ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी संघटना, आरोग्य संघटना, नवनिर्मित जि.प. नर्सेस संघटना, अभियंता संघटना, महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना, विस्तार अधिकारी संघटना, जि. प. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, खाजगी प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, जिल्हा तक्रार निवारण समिती, नगर परिषद कर्मचारी संघटना, याशिवाय शासकीय विभागातील महसूल विभाग, विदर्भ भूमी अभिलेख, शासकीय जिल्हा नर्स फेडरेशन, आरोग्य, तंत्र शिक्षण विभाग कर्मचारी संघटना, समाजकल्याण कर्मचारी संघटना, आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना, कोषागार संघटना, कृषी विभागातील कृषी सहायक, पर्यवेक्षक व कर्मचारी संघटना, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, आयटीआय कर्मचारी संघटना, सार्वजनिक बांधकाम विभाग, वस्तू व सेवाकर, अन्न व पुरवठा विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग भविष्यनिर्वाह निधी व लेखा विभाग, जिल्हा पोलिस विभागातील कर्मचारी संघटना, वरिष्ठ लेखा परीक्षक कार्यालय कर्मचारी संघटना, तसेच इतर शासकीय संघटनांचे पदाधिकारी सहभागी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प पडणार आहे.

‘मेस्मा’ लावला तरीही कर्मचारी संपावर अटळ

गेल्या अनेक वर्षांपासून सर्व कर्मचारी आपल्या न्याय्य मागणीकरिता लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहे; परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. आता सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काकरिता एकजूट दाखवून मंगळवारपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. अशावेळी हा संप दडपण्याकरिता शासनाकडून ‘मेस्मा’च्या मार्गाचा अवलंब होऊ शकतो, म्हणून न घाबरता सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा समितीचे नियंत्रक हरिश्चंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असाही निर्धार केला.

कामकाज ठप्प, सर्वसामान्यांची अडचण

जिल्ह्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही मंगळवारपासून बेमुदत संपात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शासकीय व निमशासकीय कार्यालयात कर्मचारीच उपस्थित राहणार नसल्याने सर्व कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामानिमित्त तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्यांना सोमवार हा एकच दिवस मिळणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप किती दिवस चालतो, तोपर्यंत कामकाज ठप्प राहणार असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :StrikeसंपGovernmentसरकारEmployeeकर्मचारीPensionनिवृत्ती वेतन