शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

आजच उरकवा काम, उद्यापासून कर्मचारी संपावर ठाम; शासकीय यंत्रणा कोलमडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 12:24 IST

१३ हजार कर्माचाऱ्यांचा सहभाग

वर्धा : एनपीएस बंद करून सर्व राज्य कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सेवानिवृत्ती अधिनियम १९८२ नुसार जुनी पेन्शन लागू करावी या मागणीकरिता गेल्या १७ वर्षांपासून कर्मचारी संघर्ष करीत आहे. विविध आंदोलने केली; परंतु राज्य शासनाने यासंबंधात कोणतीही दखल घेतली नाही. आता निर्णायक म्हणून राज्यातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर, जिल्हा परिषद कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी यांच्या संघटनांच्या राज्य समन्वय समितीने १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १३ हजार कर्मचारीही संपाच्या निर्णयावर ठाम असल्याने मंगळवारपासून शासकीय यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीकरिता सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी आक्रमक झाले असून, आता त्यांनी बेमुदत संपाचे शस्त्र उगारले आहे. या संपात राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा शासकीय व निमशासकीय वाहन चालक संघटना, जिल्हा राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद वर्धाअंतर्गत लिपिक संघटना, ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी संघटना, आरोग्य संघटना, नवनिर्मित जि.प. नर्सेस संघटना, अभियंता संघटना, महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना, विस्तार अधिकारी संघटना, जि. प. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, खाजगी प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, जिल्हा तक्रार निवारण समिती, नगर परिषद कर्मचारी संघटना, याशिवाय शासकीय विभागातील महसूल विभाग, विदर्भ भूमी अभिलेख, शासकीय जिल्हा नर्स फेडरेशन, आरोग्य, तंत्र शिक्षण विभाग कर्मचारी संघटना, समाजकल्याण कर्मचारी संघटना, आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना, कोषागार संघटना, कृषी विभागातील कृषी सहायक, पर्यवेक्षक व कर्मचारी संघटना, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, आयटीआय कर्मचारी संघटना, सार्वजनिक बांधकाम विभाग, वस्तू व सेवाकर, अन्न व पुरवठा विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग भविष्यनिर्वाह निधी व लेखा विभाग, जिल्हा पोलिस विभागातील कर्मचारी संघटना, वरिष्ठ लेखा परीक्षक कार्यालय कर्मचारी संघटना, तसेच इतर शासकीय संघटनांचे पदाधिकारी सहभागी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प पडणार आहे.

‘मेस्मा’ लावला तरीही कर्मचारी संपावर अटळ

गेल्या अनेक वर्षांपासून सर्व कर्मचारी आपल्या न्याय्य मागणीकरिता लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहे; परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. आता सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काकरिता एकजूट दाखवून मंगळवारपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. अशावेळी हा संप दडपण्याकरिता शासनाकडून ‘मेस्मा’च्या मार्गाचा अवलंब होऊ शकतो, म्हणून न घाबरता सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा समितीचे नियंत्रक हरिश्चंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असाही निर्धार केला.

कामकाज ठप्प, सर्वसामान्यांची अडचण

जिल्ह्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही मंगळवारपासून बेमुदत संपात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शासकीय व निमशासकीय कार्यालयात कर्मचारीच उपस्थित राहणार नसल्याने सर्व कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामानिमित्त तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्यांना सोमवार हा एकच दिवस मिळणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप किती दिवस चालतो, तोपर्यंत कामकाज ठप्प राहणार असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :StrikeसंपGovernmentसरकारEmployeeकर्मचारीPensionनिवृत्ती वेतन