शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कुंभमेळ्यासारख्या धार्मिक आयोजनांवर शासकीय खर्च अनाठायी

By admin | Updated: August 21, 2015 02:36 IST

भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. अनेक धर्म आणि परंपरा येथे एकत्र नांदतात. भारतीय राज्यघटनेने धर्माधारित व्यवस्थेला कुठलेही महत्त्व न देता धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मान्य केली आहे.

१४ व्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा सूर : खुल्या गटात ३७ तर शालेय गटात ३५ स्पर्धकांचा सहभागआर्वी : भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. अनेक धर्म आणि परंपरा येथे एकत्र नांदतात. भारतीय राज्यघटनेने धर्माधारित व्यवस्थेला कुठलेही महत्त्व न देता धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मान्य केली आहे. यामुळे देशातील जनतेने करापोटी शासनाकडे गोळा केलेला जनतेचा पैसा शासनाद्वारे कुंभ मेळाव्यासारख्या धार्मिक आयोजनावर खर्च करणे अनाठायी आहे. त्याचे समर्थन करता येणे कदापि शक्य नाही, असा सूर वादविवाद स्पर्धेतून उमटला.स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालयात एनएसयुआयतर्फे दरवर्षीप्रमाणे स्व. आ.डॉ. शरद काळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. ही १४ वी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा होती. राज्याच्या विविध भागातून सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपले विचार व्यक्त केले. ‘भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या कुंभमेळा सारख्या धार्मिक आयोजनावर शासनाद्वारे होणारा कोट्यवधीचा खर्च अनाठायी नसून योग्य आहे’, हा या वादविवाद स्पर्धेच्या खुल्या गटाचा विषय होता. खुल्या गटाचे परीक्षण प्रा. अनिल कवरासे, प्रा. खडसे, सुनीता कदम यांनी केले. शालेय व खुल्या अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. मोरेश्वर देशमुख तर उद्घाटक म्हणून प्रा. डी.जे. नांदूरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक शैलेष साळवी उपस्थित होते. शालेय गटाचा विषय ‘शालांत परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची त्याच सत्रात पुन्हा परीक्षा घेण्याचा शासन निर्णय योग्य आहे’ हा होता. शालेय गटाचे परीक्षण मोकदम, ताजनेकर व नाखले यांनी केले.शालेय गटात ३५ तर खुल्या गटात ३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या समारोपिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अमर काळे तर अतिथी म्हणून बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आ. रवी राणा, अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ उपस्थित होते. आ. काळे यांनी भारताच्या सांस्कृतिक परंपरा व त्यातून साकारलेलया एकात्मतेमुळेच हे राष्ट्र उभे आहे. जगाला गुरूस्थानी असल्याचा उल्लेख करून आपल्याला चांगल्या परंपरांचा अंगिकार करावा. वाईट परंपरांना मुठमाती द्यावी. सर्वच क्षेत्रात असलेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आ. रवी राणा, प्रकाश महाराज वाघ यांनीही विचार व्यक्त केले. सलग आठ तास चाललेल्या स्पर्धेला आर्वी व परिसरातील श्रोते उपस्थित होते. संचालन प्रफुल क्षीरसागर यांनी केले तर आभार एनएसयुआय अध्यक्ष अंगद गिरधर यांनी मानले. स्पर्धेला एनएसयुआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)