शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

कुंभमेळ्यासारख्या धार्मिक आयोजनांवर शासकीय खर्च अनाठायी

By admin | Updated: August 21, 2015 02:36 IST

भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. अनेक धर्म आणि परंपरा येथे एकत्र नांदतात. भारतीय राज्यघटनेने धर्माधारित व्यवस्थेला कुठलेही महत्त्व न देता धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मान्य केली आहे.

१४ व्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा सूर : खुल्या गटात ३७ तर शालेय गटात ३५ स्पर्धकांचा सहभागआर्वी : भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. अनेक धर्म आणि परंपरा येथे एकत्र नांदतात. भारतीय राज्यघटनेने धर्माधारित व्यवस्थेला कुठलेही महत्त्व न देता धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मान्य केली आहे. यामुळे देशातील जनतेने करापोटी शासनाकडे गोळा केलेला जनतेचा पैसा शासनाद्वारे कुंभ मेळाव्यासारख्या धार्मिक आयोजनावर खर्च करणे अनाठायी आहे. त्याचे समर्थन करता येणे कदापि शक्य नाही, असा सूर वादविवाद स्पर्धेतून उमटला.स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालयात एनएसयुआयतर्फे दरवर्षीप्रमाणे स्व. आ.डॉ. शरद काळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. ही १४ वी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा होती. राज्याच्या विविध भागातून सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपले विचार व्यक्त केले. ‘भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या कुंभमेळा सारख्या धार्मिक आयोजनावर शासनाद्वारे होणारा कोट्यवधीचा खर्च अनाठायी नसून योग्य आहे’, हा या वादविवाद स्पर्धेच्या खुल्या गटाचा विषय होता. खुल्या गटाचे परीक्षण प्रा. अनिल कवरासे, प्रा. खडसे, सुनीता कदम यांनी केले. शालेय व खुल्या अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. मोरेश्वर देशमुख तर उद्घाटक म्हणून प्रा. डी.जे. नांदूरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक शैलेष साळवी उपस्थित होते. शालेय गटाचा विषय ‘शालांत परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची त्याच सत्रात पुन्हा परीक्षा घेण्याचा शासन निर्णय योग्य आहे’ हा होता. शालेय गटाचे परीक्षण मोकदम, ताजनेकर व नाखले यांनी केले.शालेय गटात ३५ तर खुल्या गटात ३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या समारोपिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अमर काळे तर अतिथी म्हणून बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आ. रवी राणा, अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ उपस्थित होते. आ. काळे यांनी भारताच्या सांस्कृतिक परंपरा व त्यातून साकारलेलया एकात्मतेमुळेच हे राष्ट्र उभे आहे. जगाला गुरूस्थानी असल्याचा उल्लेख करून आपल्याला चांगल्या परंपरांचा अंगिकार करावा. वाईट परंपरांना मुठमाती द्यावी. सर्वच क्षेत्रात असलेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आ. रवी राणा, प्रकाश महाराज वाघ यांनीही विचार व्यक्त केले. सलग आठ तास चाललेल्या स्पर्धेला आर्वी व परिसरातील श्रोते उपस्थित होते. संचालन प्रफुल क्षीरसागर यांनी केले तर आभार एनएसयुआय अध्यक्ष अंगद गिरधर यांनी मानले. स्पर्धेला एनएसयुआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)