उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेण्याची गरज
By Admin | Updated: February 11, 2016 02:33 IST2016-02-11T02:33:09+5:302016-02-11T02:33:09+5:30
शिक्षण महागल्याने सामान्य वर्गातील मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतल्याशिवाय सामाजिक न्याय मिळणार नाही.

उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेण्याची गरज
अविनाश डोळस : राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद
वर्धा : शिक्षण महागल्याने सामान्य वर्गातील मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतल्याशिवाय सामाजिक न्याय मिळणार नाही. असे मत राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाची सहावी राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद आर्वी येथे घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून डोळस बोलत होते. उद्घाटन यवतमाळचे गजलकार प्रा. सिद्धार्थ भगत यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रजासत्ताकचे राज्याध्यक्ष अरुणकुमार हर्षबोधी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सुभाष गवई, आनंदार्च, डॉ. चव्हाण आणि शिक्षण हक्क परिषदेचे निमंत्रक अशोक गाडगे उपस्थित होते. करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून न. प. सदस्य प्रा. पंकज वाघमारे होते. सर्वंप्रथम नागपूरचे कवी भाऊ पंचभाई, रोहीत वेमुल्ला व प्रजासत्ताकचे आर्वी शाखेचे सचिव धर्मपाल टोकसे यांना मौन आदरांजली देण्यात आली. परिषदेचे निमंत्रक अशोक गाडगे यांनी प्रास्ताविक केले.
हर्षबोधी यावेळी म्हणाले, शाळांचे स्तरीकरण व अभ्यासक्रमांचे विषमीकरण झाल्याने समान शिक्षणाचा आशयच संपून गेला आहे. त्यामुळे संविधानातील समान आणि नि:शुल्क शिक्षणासाठी जनआंदोलन उभारणे गरजेचे आहे. धम्मा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संविधानातील शिक्षण आणि शासकीय धोरण या विषयावर झालेल्या परिसंवादात संजय बोधे, प्रा. डॉ. कमलाकर पायस, प्रा. सुनंदा वालदे यांचा सहभाग होता. सर्वांना समान, दर्जेदार आणि नि:शुल्क शिक्षण या विषयावर घेण्यात आलेल्या खुल्या चर्चासत्रात संजय गुजर, नवीन पाटील, मारोती पाटील, हेमंत गांजरे, प्रकाश दातार, गिरीश नरांजे यांनी सहभाग घेतला. नागपूर व अमरावती विद्यापीठाने पीएचडी प्रदान केलेल्या डॉ. प्रवीण काळे, डॉ. अनिल भगत, डॉ. अनिल दहाट, डॉ. प्रशांत धनविज, डॉ. तारेश आगाशे, डॉ. कमलाकर पायस, डॉ. राजु कांबळे यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक बाळकृष्ण मिरगे, चरणदास कांबळे, मुख्याध्यापक संतोष तागडे, समाजसेवक सुनील तेलगोटे, हस्तलिखीतामुळे लिम्का बुक मध्ये नोंद झालेले धनंजय नाखले यांचा सन्मान करण्यात आला.
समारोपीय समारंभात वर्धा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. सिद्धार्थ बुटले, शिक्षण हक्क परिषदेचे मुख्य संयोजक राजकुमार सोनटक्के, संयोजक अशोक खंडारे, सहसंयोजक अरविंद वावरे, विलास गायकवाड उपस्थित होते. अनिल खैरकार, अरुण डंभारे, सूर्यभान नडे, नारायण कुसळे, नवीन वासेकर, सचिन कांबळे, गौतम बागडे, संदीप चवात, विश्वेश्वर पायले, दत्तात्रय खंदारे, अरविंद माणिककुळे, सत्येंद्र गोटे, मनोहर लांडगे, किशोर ढाले, सोनाली कांबळे, संगीता वाघमारे, सुषमा पाखरे, पदमा तायडे, मिरा इंगोले यांना शिक्षणसेवा पुरस्काराने सन्मानित केले. संचालन प्रकाश कांबळे, संध्या भगत, विश्वेश्वर पायले, प्रास्ताविक अशोक गाडगे, संजय बोधे, विजय शेंडे तर आभार राजकुमार सोनटक्के, अशोक खंडारे, दत्तात्रय खंदारे यांनी मानले. मुकुंद वाघमारे, वसंत पाटील, निलेश नाखले, रविंद्र नाखले, राऊत, अढाऊ, नगराळे, हेमंत मडावी यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)