शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
7
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
8
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
9
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
10
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
11
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
12
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
13
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
14
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
15
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
16
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
17
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
18
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
19
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
20
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार

विकणारा मालामाल तर पिकविणाऱ्यास कवडीमोल दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST

नारळी पौर्णिमा म्हणजेच रविवार, २२ ऑगस्टला वर्धा बाजारपेठेत जिल्ह्यातील ९० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ८०० क्विंटल भाजीपाला विक्रीकरिता आणला होता. परंतु, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळाल्याचे चित्र बघावयास मिळाले. भाजीपाला उत्पादकांनाही हमी भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून वर्धा बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी, भाजीपाल्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली असून, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला सध्या कवडीमोल भाव मिळत असल्याचे लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी वर्धा येथील बाजारपेठेत जाऊन पाहणी केली असता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या वांगी, टोमॅटो, कोथिंबीर या भाजीपाल्याला दहा रुपये प्रतिकिलो, तर भेंडी, काकडीला प्रतिकिलो ४ रुपये भाव देण्यात आला. एकूणच सध्याच्या परिस्थितीमुळे विकणारा मालामाल, तर पिकविणाऱ्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.

वर्धेत येणारा आलू-कांदा जिल्ह्याबाहेरील- वर्धा बाजारपेठेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला येत असला तरी येथे येणारा आलू आणि कांदा जिल्ह्याबाहेरूनच येत असल्याचे सांगण्यात आले. रविवारी वर्धा बाजारपेठेत १५० क्विंटल आलू, तर ८८ क्विंटल कांद्याची आवक राहिली. वर्धा बाजारपेठेतूनच तालुक्यातील इतर बाजारपेठेत आलू व कांदा पाठविला जातो.

१ हजार ०३८ क्विंटल भाजीपाल्याची आवक- रविवारी वर्धा येथील बाजारपेठेत एकूण १ हजार ३८ क्विंटल भाजीपाल्याची आवक राहिली. यात अल्पावधीत नाशिवंत होणारा भाजीपाला ८०० क्विंटल, तर १५० क्विंटल आलू आणि ८८ क्विंटल कांद्याचा समावेश आहे. सलग दोन दिवसांच्या सुटीनंतर १७ ऑगस्टला वर्धा बाजारपेठेत भाजीपाल्याची  विक्रमी आवक होती, हे विशेष.

रविवारी ९० शेतकऱ्यांनी आणला भाजीपाला- नारळी पौर्णिमा म्हणजेच रविवार, २२ ऑगस्टला वर्धा बाजारपेठेत जिल्ह्यातील ९० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ८०० क्विंटल भाजीपाला विक्रीकरिता आणला होता. परंतु, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळाल्याचे चित्र बघावयास मिळाले. भाजीपाला उत्पादकांनाही हमी भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी आहे.

भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठी मेहनत घेत पिकांचे संगोपन करतात. ते वेळोवेळी विविध किटकनाशकांची उभ्या पिकांवर फवारणी करता. या किटकनाशकांचे दर गत वर्षीच्या तुलनेत यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे. तसेच खतांचे भाव वाढले आहेत. असे असतानाही सध्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत आहे. भाजीपाला पिकाला हमीभाव जाहीर करून त्याला पिकविम्याचे कवच दिले गेले पाहिजे.- बाळकृष्ण माऊस्कर, शेतकरी, नालवाडी.

भाजीपाल्याला मिळालेला भाव (प्रतिकिलो)

वांगी     १० ते ११ रुपयेटोमॅटो    १० रुपयेभेंडी     ४ रुपयेचवळी    १० रुपयेढेमस    १५ ते २० रुपयेपालक    १५ ते २० रुपयेकोथजंबीर    १० रुपयेहिरवी मिरची    २० रुपयेकाकडी    ४ रुपयेपत्ताकोबी     १० ते १२ रुपयेफुलकोबी     १५ ते २० रुपयेदोडके     १० ते १५ रुपये

 

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार