शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

११ गावांतील बांधकाम परवानगीच्या अर्ज नोंदीतही गौडबंगाल

By admin | Updated: May 20, 2015 02:21 IST

मागील चार वर्षांपासून वर्धा शहरालगतच्या ११ गावांच्या बांधकाम परवनागीचा विषय गाजत असताना बंदीच नसल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट उघड आली.

वर्धा : मागील चार वर्षांपासून वर्धा शहरालगतच्या ११ गावांच्या बांधकाम परवनागीचा विषय गाजत असताना बंदीच नसल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट उघड आली. बांधकाम बंदीचा फार्स सुरु असताना किती लोकांनी बांधकामासाठी अर्ज सादर केले, याबाबत प्रमोद मुरारका यांनी पंचायत समितीकडे माहितीच्या अधिकारातून माहिती मागितली असता यामध्येही मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल असल्याचे दिसून येते. प्रमोद मुरारका यांनी कायदेशीर कामाकरिता वर्धा शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींमध्ये बांधकामाच्या परवानगीसाठी १ जानेवारी २०१० ते २०१५ पर्यंत किती अर्ज आलेत व किती बांधकामाला मंजुरी देण्यात आली, याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्यांना नियमानुसार वेळेत माहिती तर मिळालीच नाही. नंतर मिळालेली माहितीही धक्कादायक आहे. माहितीच्या अधिकारात आलेल्या अर्जाची नोंद ज्या रजिस्टरवर करण्यात आली. त्या रजिस्टरची सत्यप्रत प्रमाणित करुन मागण्यात आली होती. मात्र सिंदी(मेघे) वगळता एकाही ग्रामपंचायतीने या पद्धतीने माहिती दिलेली नाही. बहुतांश ग्रामपंचायतींनी कागदावर नावे लिहून त्यावर ग्रामपंचायतीचा सही व शिक्का मारुन औपचारिकता पूर्ण केली. तसेच १ जानेवारी २०१० ते आजतागायत माहिती मागितलेली असताना काहींनी २०११, काहींनी २०१२ पर्यंतच माहिती उपलब्ध करुन दिली. गंभीर बाब म्हणजे, या माहितीचे अवलोकन केले असता अनुक्रमांकही अनुक्रमे नाहीत. काही ठिकाणी माहिती देण्यापूर्वी खोडतोड करण्यात आल्याचे दिसून येते. बांधकामाची परवानगी दिल्याचीही नोंद आहे. माहितीच्या अवलोकनावरुन भ्रष्टाचाराचा संशय येतो. मात्र पंचायत समिती व जिल्हा प्रशासनही सुस्त असल्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची अशी स्थिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)