शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 8:27 PM

सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली असून आम्ही या मागणीचा पाठपुरावा करू, अशी भूमिका महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमेचे संयोजक बंडू धोत्रे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र वारसा जतन व संवर्धन परिक्रमेचे बहारतर्फे वर्धानगरीत स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा - महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेला सेवाग्राम आश्रम जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देतो, शिवाय प्रचंड वेगाने मानवाकडून होणारा निसर्गाचा ऱ्हास थांबवायचा असेल तर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची गरज निर्माण झालेली आहे, हा जागतिकदृष्ट्या महत्त्वाचा संदेशही सेवाग्राम आश्रम देतो. म्हणूनच सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली असून आम्ही इको-प्रोद्वारे या मागणीचा पाठपुरावा करू, अशी भूमिका महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमेचे संयोजक बंडू धोत्रे यांनी सेवाग्राम आश्रमाच्या भेटीप्रसंगी व्यक्त केली.इको-प्रो, चंद्रपूर या संस्थेद्वारे १ मेपासून राज्यात महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमा आयोजित केली होती. या परिक्रमेचा समारोप सेवाग्राम आश्रमात करण्यात आला. तत्पूर्वी या यात्रेचे स्वागत ऐतिहासिक वास्तू असलेल्या मगन संग्रहालयातील कुमारप्पा भवनात करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विभा गुप्ता होत्या. यावेळी, जिल्ह्याचे उपवनसंरक्षक डॉ. सुनील शर्मा, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे यांची प्रमुख उपस्थित होती. साडेचार हजार किलोमीटरची मोटरसायकलवर परिक्रमा करीत राज्यातील अनेक गड-किल्ले, परकोट, ऐतिहासिक वास्तू आणि अभयारण्यांना भेट देत 'आपला वारसा आपणच जपूया' हा संदेश या यात्रेने दिला.ऐतिहासिक वास्तू या भूतकाळ आणि भविष्याशी नाते सांगतात. आपला वारसा आपणच जपावयास पाहिजे, असे मनोगत बंडू धोत्रे यांनी केले. ते पुढे म्हणाले, संबंधित सरकारी विभागांकडे पैसा आहे पण इच्छाशक्ती नाही. गड-किल्ल्यांच्या संवर्धन संदर्भात धोरणांचा अभाव आहे. म्हणूनच जय भवानी, जय शिवाजीच्या पुढे जाऊन हा वारसा जतन करण्याची गरज आहे. शासन उदासीन असून आपणच पुढे आले पाहिजे, असेही धोत्रे म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन दीपक गुढेकर यांनी केले तर आभार अविनाश भोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बहार नेचर फाउंडेशनचे सचिव दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, दर्शन दुधाने, पवन दरणे, राजेंद्र लांबट, राहुल वकारे यांनी परिश्रम घेतले. सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन या परिक्रमेचा समारोप करीत ही यात्रा चंद्रपूरला रवाना झाली

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी