शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

उरलेल्या शेतजमिनीच्या तुकड्यांचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:05 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या. पण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुकडे पडलेले आहे. कायद्यातील तरतुदी प्रमाणे जमिनींच्या त्या तुकड्यांचाही मोबदला द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महात्मा फुले समता परिषदेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या. पण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुकडे पडलेले आहे. कायद्यातील तरतुदी प्रमाणे जमिनींच्या त्या तुकड्यांचाही मोबदला द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे, दीड एकरच्या आत जर भूसंपादन करून शेतजमिनीचा तुकडा पडत असेल तर तो सुद्धा या महामार्गासाठी घेतला जाईल. तसेच त्याचाही याच नियमाप्रमाणे मोबदला दिला जाईल, असे समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने व शासनाने आश्वासन दिलेले होते. परंतु जमिनींचे अधिग्रहन करतांना शेतजमिनीचे दीड एकर व त्यापेक्षाही कमी आकाराचे तुकडे शिल्लक ठेवले आहे. त्याचे अधिग्रहन करुन मोबदला दिला नाही.या तुकड्यांमध्ये शेतकरी शेती करू शकत नसल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हे भूसंपादन केल्यावर राहिलेली दीड एकरपेक्षा लहान शेतजमिनीचे तुकडे सुद्धा त्याच किंमतीत समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने घ्यावेत. त्याचा मोबदला शेतकºयांना तत्काळ द्यावा, तसेच या शेजमिनीच्या अधिग्रहनामुळे अनेक शेतकरी त्यांची इच्छा नसताना सुद्धा विस्थापित झालेले आहे. त्यामुळे शासनाच्या कायद्यातील तरतुदीनुसार यासर्व शेतकºयांना, प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांना त्यांच्या वारसानांना प्रकल्पग्रस्त शेतकरी म्हणून शासनाच्या विविध सवलतींचा व शासकीय नोकरीमधील समांतर आरक्षणाचा लाभ होऊ शकेल, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने करण्यात आली.समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंगळवारला निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, अ‍ॅड. महेंद्र धोटे, निळकंठ पिसे, निळकंठ राऊत, विशाल हजारे, श्रीराम चव्हाण, कविता मुंगले, रेखा खेळकर, कवडू बुरंगे, श्रीकांत वंजारी, गंगाधर मुडे, विनायक पावडे, प्रभाकर राऊत, संजय म्हस्के, अरूण कनेरी, शंकर येलोरे, मनोहर गोंदाने, सुभाष भोयर, सुशील झाडे, चंद्रशेखर दाते, सुनील सोमनकर, अविनाश वानखेडे, प्रभाकर वांढेकर, सुरेश तिजारे, श्याम जगताप यांच्यासह समृध्दी महामार्ग बाधित विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी दिघे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गagricultureशेती