लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी प्रत्येक गावातून ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आणि ग्रामसभेचा ठराव राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येत आहे. या उपक्रमाला ‘मिशन भारतरत्न’ असे नाव दिले असून प्रत्येक ग्रामस्थांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.तुकडोजी महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न सन्मान बहाल करण्यात यावा, अशी मागणी सध्या ‘मिशन भारतरत्न’ या उपक्रमाच्या माध्यमातून रेटली जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य आजच्या तरुण पिढीलासाठी प्रेरणादायी आहे.शिवाय त्यांची ग्रामगीता अजूनही अनेकांसाठी मार्गदर्शक ठरते. अनेक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे कार्य प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवित आहेत. राष्ट्रसंतांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी ‘मिशन भारतरत्न’ उपक्रमातून शासनदरबारी केली जात आहे. त्यासाठी प्रत्येक गावातून ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आणि ग्रामसभेत सर्वानुमते घेतलेला ठराव भारत सरकारला पाठविला जात असून या उपक्रमात नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुदेवभक्त विकास बोरवाल यांनी केले आहे.प्र्रजासत्ताक दिनापासून अभियान सुरूराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी कित्येक दिवसांपासून सुरु आहे. या मागणीने आता जोर धरला आहे. वर्धा, अमरावती, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी ग्रामसभा बोलावून ठरावही घेतला आहे. आता या गावातून राष्ट्रसंतांना भारतरत्न देण्याची मागणी करणारी एक लाख पत्रे शासनाला पाठविण्याची मोहीम हाती घेतली असून प्रजासत्ताक दिनापासून या अभियानाला विदर्भस्तरावर सुरुवात झालेली आहे.
राष्ट्रसंतांना भारतरत्न द्या ग्रामसभेत ठराव पारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:01 IST
गावातून ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आणि ग्रामसभेचा ठराव राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येत आहे. या उपक्रमाला ‘मिशन भारतरत्न’ असे नाव दिले असून प्रत्येक ग्रामस्थांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रसंतांना भारतरत्न द्या ग्रामसभेत ठराव पारित
ठळक मुद्देराष्ट्रपती, पंतप्रधानांकडे पाठविले निवेदन