शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

फुले दाम्पत्यास भारतरत्न द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:08 IST

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान कराण्यात यावा. फुले दाम्पत्याचे समाजाकरिता असलेले कार्य पाहता त्यांना सर्वोच्च नागरी देण्याची, मागणी माळी समाज संस्थेच्यावतीने जिल्हाधिकऱ्यांकडे शुक्रवारी करण्यात आली. विशाल हजारे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देमाळी समाज संस्थेची मागणी : शासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान कराण्यात यावा. फुले दाम्पत्याचे समाजाकरिता असलेले कार्य पाहता त्यांना सर्वोच्च नागरी देण्याची, मागणी माळी समाज संस्थेच्यावतीने जिल्हाधिकऱ्यांकडे शुक्रवारी करण्यात आली. विशाल हजारे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.यावेळी विनय डहाके, पौर्णिमा पोतदार, ललिता बनसोड, संगीता सुरोसे, विद्या डहाके, पुजा हजारे शालिकराम बनसोड आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य तसेच स्त्री शिक्षणाच्याबाबत शाळा काढून शिक्षणाचा केलेला प्रसार व कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर त्यांनी घेतलेले शिक्षण आणि शिक्षक व मुख्याध्यापक बनून समाजाला शिक्षण देण्याचे काम केले. पुणे येथील शिक्षण कार्य पाहूण १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पती-पत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. व त्यांच्या शाळांना सरकारी अनुदान देऊ केले. सावित्रीबाई फुले यांनी भारतातल्या पहिल्या शिक्षिकेचे शिक्षणव्रत चालूच ठेवले. त्यामुळेच ३ जानेवारी हा सावित्रीबाईची जयंती बालक दिन म्हणून साजरी केली जाते. महात्मा ज्योतिबा फुले हे मराठीचे लेखक, विचारवंत व समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यामुळे त्यांना महात्मा ही उपाधी देवून सन्मानित करण्यात आला. १८९० मध्ये त्यांनी शेतकºयाचा आसूड हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या या कार्याची दखल घेवून शासनाने त्यांना भारतरत्न जाहीर करावा अशी मागणी माळी समाज संस्थेने केली आहे.