शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

फुले दाम्पत्यास भारतरत्न द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:08 IST

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान कराण्यात यावा. फुले दाम्पत्याचे समाजाकरिता असलेले कार्य पाहता त्यांना सर्वोच्च नागरी देण्याची, मागणी माळी समाज संस्थेच्यावतीने जिल्हाधिकऱ्यांकडे शुक्रवारी करण्यात आली. विशाल हजारे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देमाळी समाज संस्थेची मागणी : शासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान कराण्यात यावा. फुले दाम्पत्याचे समाजाकरिता असलेले कार्य पाहता त्यांना सर्वोच्च नागरी देण्याची, मागणी माळी समाज संस्थेच्यावतीने जिल्हाधिकऱ्यांकडे शुक्रवारी करण्यात आली. विशाल हजारे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.यावेळी विनय डहाके, पौर्णिमा पोतदार, ललिता बनसोड, संगीता सुरोसे, विद्या डहाके, पुजा हजारे शालिकराम बनसोड आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य तसेच स्त्री शिक्षणाच्याबाबत शाळा काढून शिक्षणाचा केलेला प्रसार व कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर त्यांनी घेतलेले शिक्षण आणि शिक्षक व मुख्याध्यापक बनून समाजाला शिक्षण देण्याचे काम केले. पुणे येथील शिक्षण कार्य पाहूण १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पती-पत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. व त्यांच्या शाळांना सरकारी अनुदान देऊ केले. सावित्रीबाई फुले यांनी भारतातल्या पहिल्या शिक्षिकेचे शिक्षणव्रत चालूच ठेवले. त्यामुळेच ३ जानेवारी हा सावित्रीबाईची जयंती बालक दिन म्हणून साजरी केली जाते. महात्मा ज्योतिबा फुले हे मराठीचे लेखक, विचारवंत व समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यामुळे त्यांना महात्मा ही उपाधी देवून सन्मानित करण्यात आला. १८९० मध्ये त्यांनी शेतकºयाचा आसूड हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या या कार्याची दखल घेवून शासनाने त्यांना भारतरत्न जाहीर करावा अशी मागणी माळी समाज संस्थेने केली आहे.