शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

फुले दाम्पत्यास भारतरत्न द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:08 IST

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान कराण्यात यावा. फुले दाम्पत्याचे समाजाकरिता असलेले कार्य पाहता त्यांना सर्वोच्च नागरी देण्याची, मागणी माळी समाज संस्थेच्यावतीने जिल्हाधिकऱ्यांकडे शुक्रवारी करण्यात आली. विशाल हजारे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देमाळी समाज संस्थेची मागणी : शासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान कराण्यात यावा. फुले दाम्पत्याचे समाजाकरिता असलेले कार्य पाहता त्यांना सर्वोच्च नागरी देण्याची, मागणी माळी समाज संस्थेच्यावतीने जिल्हाधिकऱ्यांकडे शुक्रवारी करण्यात आली. विशाल हजारे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.यावेळी विनय डहाके, पौर्णिमा पोतदार, ललिता बनसोड, संगीता सुरोसे, विद्या डहाके, पुजा हजारे शालिकराम बनसोड आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य तसेच स्त्री शिक्षणाच्याबाबत शाळा काढून शिक्षणाचा केलेला प्रसार व कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर त्यांनी घेतलेले शिक्षण आणि शिक्षक व मुख्याध्यापक बनून समाजाला शिक्षण देण्याचे काम केले. पुणे येथील शिक्षण कार्य पाहूण १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पती-पत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. व त्यांच्या शाळांना सरकारी अनुदान देऊ केले. सावित्रीबाई फुले यांनी भारतातल्या पहिल्या शिक्षिकेचे शिक्षणव्रत चालूच ठेवले. त्यामुळेच ३ जानेवारी हा सावित्रीबाईची जयंती बालक दिन म्हणून साजरी केली जाते. महात्मा ज्योतिबा फुले हे मराठीचे लेखक, विचारवंत व समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यामुळे त्यांना महात्मा ही उपाधी देवून सन्मानित करण्यात आला. १८९० मध्ये त्यांनी शेतकºयाचा आसूड हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या या कार्याची दखल घेवून शासनाने त्यांना भारतरत्न जाहीर करावा अशी मागणी माळी समाज संस्थेने केली आहे.