शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वर्षभरासाठीच होणार यंदाही घाटांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

पर्यावरणाचा समतोल व स्थायी विकास साधून वाळू घाट लिलावाच्या प्रक्रियेत लोकांना अधिकतम प्रमाणात सहभागी करुन घेणे, वाळू उत्खननाचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याच्या हिताचे रक्षण करतानाच वाळूघाट लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणून शासनाच्या महसूलात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू निर्गती धोरण जाहीर केले आहे. यानुसार वाळूघाटाचे एकत्रिकरण करुन क्षेत्रफळ वाढवावे आणि त्या घाटाचे कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच वर्षाकरिता लिलाव करण्याच्या सूचना दिल्या आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षण पूर्ण : पर्यावरण अनुमतीसाठी पाठविले प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या नवीन वाळू निर्गती धोरणानुसार कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त पाच वर्षाकरिता वाळू घाटांचा लिलाव अपेक्षीत होता. मात्र, वर्धा जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रफळाचे घाट नसल्याने यंदाही दरवर्षीप्रमाणे एका वर्षाकरिताच वाळू घाटांचा लिलाव केला जाणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनातील खनिकर्म विभागाकडून जिल्ह्यातील सर्वच वाळू घाटांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण झालेल्या घाटांचा प्रस्ताव पर्यावरण अनुमतीकरिता पाठविण्यात आला असून येत्या मार्च महिन्यात घाटांची लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.पर्यावरणाचा समतोल व स्थायी विकास साधून वाळू घाट लिलावाच्या प्रक्रियेत लोकांना अधिकतम प्रमाणात सहभागी करुन घेणे, वाळू उत्खननाचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याच्या हिताचे रक्षण करतानाच वाळूघाट लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणून शासनाच्या महसूलात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू निर्गती धोरण जाहीर केले आहे. यानुसार वाळूघाटाचे एकत्रिकरण करुन क्षेत्रफळ वाढवावे आणि त्या घाटाचे कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच वर्षाकरिता लिलाव करण्याच्या सूचना दिल्या आहे.सोबतच यामध्ये जिल्ह्यातील वाळू घाटांच्या क्षेत्रफळाची स्थिती पाहून शिथिलताही दिली होती. या नवीन वाळू निर्गती धोरणानुसारच जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने खनिकर्म विभागाकडून जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी, आर्वी व आष्टी या तालुक्यातील वाळू घाटांचे सर्वेक्षण करण्यात आले.हिंगणघाट तालुक्यातील २० घाटांचे सर्वेक्षण केले असून त्यापैकी १३ घाट लिलावासाठी योग्य ठरले आहेत. सोबतच समुद्रपूर तालुक्यातील १६ पैकी १४, देवळीतील १२ पैकी ०३, आष्टीतील १२ घाटांपैकी २ तर आर्वी तालुक्यातील १६ घाटांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यापैकी ४ घाटांमध्ये अद्यापही पाणीच असल्याने केवळ एकच घाट लिलावास योग्य ठरला आहे.सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यात ३० ते ३२ घाट लिलावास योग्य ठरले आहे. सर्वाधिक वाळू घाट हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील असून खनिकर्म विभागाकडून या तालुक्यातील सर्वेक्षणाअंती २७ वाळू घाटांचा प्रस्ताव पर्यावरण अनुमतीकरिता पाठविण्यात आला आहे.त्यासोबतच लवकरच देवळी, आर्वी आणि आष्टी तालुक्यातीलही प्रस्ताव पर्यावरण अनुमतीकरिता पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.पर्यावरण अनुमती प्राप्त होताच मार्च महिन्यात पहिली लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. विशेषत: नवीन वाळू निर्गती धोरणानुसार कालावधी दिला नसला तरी नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे निमावली पाळताना वाळू घाटधारकांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. वाळू घाटांचा लिलाव झाल्यास वाळूचोरीला आळाच बसणार आहे. शिवाय त्याचे दरही कमी होणार आहे.वाळूचोरी थांबविण्यासाठी देवळी तालुक्यात दोन पथकदेवळी तालुक्यामध्ये यशोदा आणि वर्धा नदीचे मोठे पात्र असून वाळू चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या वाळू चोरट्यांना स्थानिक काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची साथ असल्याने नदीपात्रच पोखरुन टाकले आहे. वाहन पकडल्यानंतर चिरिमिरी घेऊन सोडल्याच्या अनेक घटनाही उघडकीस आल्या आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि लिलावास योग्य ठरलेल्या घाटातून होणारा अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी देवळी तालुक्याकरिताच दोन पथक तयार केले आहे. यामध्ये सेलू व वर्धा तालुक्याच्या तहसीलदारांसह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांची नियुक्ती केली आहे. ही दोन्ही पथके देवळी तालुक्यात कधीही आणि कुठेही छापा टाकून कारवाई करणार आहे. त्यामुळे या पथकाला कारवाई करण्यात किती यश येते, हे येणारा काळच ठरवणार आहे.नवीन वाळू निर्गती धोरणानुसार घाटांचे सर्वेक्षण करुन पर्यावरण अनुमतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. अनुमती मिळताच मार्च महिन्यात वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया राबविली जाईल.डॉ. इम्रान शेख, खनिकर्म अधिकारी, वर्धा

टॅग्स :sandवाळू