शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वर्षभरासाठीच होणार यंदाही घाटांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

पर्यावरणाचा समतोल व स्थायी विकास साधून वाळू घाट लिलावाच्या प्रक्रियेत लोकांना अधिकतम प्रमाणात सहभागी करुन घेणे, वाळू उत्खननाचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याच्या हिताचे रक्षण करतानाच वाळूघाट लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणून शासनाच्या महसूलात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू निर्गती धोरण जाहीर केले आहे. यानुसार वाळूघाटाचे एकत्रिकरण करुन क्षेत्रफळ वाढवावे आणि त्या घाटाचे कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच वर्षाकरिता लिलाव करण्याच्या सूचना दिल्या आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षण पूर्ण : पर्यावरण अनुमतीसाठी पाठविले प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या नवीन वाळू निर्गती धोरणानुसार कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त पाच वर्षाकरिता वाळू घाटांचा लिलाव अपेक्षीत होता. मात्र, वर्धा जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रफळाचे घाट नसल्याने यंदाही दरवर्षीप्रमाणे एका वर्षाकरिताच वाळू घाटांचा लिलाव केला जाणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनातील खनिकर्म विभागाकडून जिल्ह्यातील सर्वच वाळू घाटांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण झालेल्या घाटांचा प्रस्ताव पर्यावरण अनुमतीकरिता पाठविण्यात आला असून येत्या मार्च महिन्यात घाटांची लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.पर्यावरणाचा समतोल व स्थायी विकास साधून वाळू घाट लिलावाच्या प्रक्रियेत लोकांना अधिकतम प्रमाणात सहभागी करुन घेणे, वाळू उत्खननाचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याच्या हिताचे रक्षण करतानाच वाळूघाट लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणून शासनाच्या महसूलात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू निर्गती धोरण जाहीर केले आहे. यानुसार वाळूघाटाचे एकत्रिकरण करुन क्षेत्रफळ वाढवावे आणि त्या घाटाचे कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच वर्षाकरिता लिलाव करण्याच्या सूचना दिल्या आहे.सोबतच यामध्ये जिल्ह्यातील वाळू घाटांच्या क्षेत्रफळाची स्थिती पाहून शिथिलताही दिली होती. या नवीन वाळू निर्गती धोरणानुसारच जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने खनिकर्म विभागाकडून जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी, आर्वी व आष्टी या तालुक्यातील वाळू घाटांचे सर्वेक्षण करण्यात आले.हिंगणघाट तालुक्यातील २० घाटांचे सर्वेक्षण केले असून त्यापैकी १३ घाट लिलावासाठी योग्य ठरले आहेत. सोबतच समुद्रपूर तालुक्यातील १६ पैकी १४, देवळीतील १२ पैकी ०३, आष्टीतील १२ घाटांपैकी २ तर आर्वी तालुक्यातील १६ घाटांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यापैकी ४ घाटांमध्ये अद्यापही पाणीच असल्याने केवळ एकच घाट लिलावास योग्य ठरला आहे.सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यात ३० ते ३२ घाट लिलावास योग्य ठरले आहे. सर्वाधिक वाळू घाट हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील असून खनिकर्म विभागाकडून या तालुक्यातील सर्वेक्षणाअंती २७ वाळू घाटांचा प्रस्ताव पर्यावरण अनुमतीकरिता पाठविण्यात आला आहे.त्यासोबतच लवकरच देवळी, आर्वी आणि आष्टी तालुक्यातीलही प्रस्ताव पर्यावरण अनुमतीकरिता पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.पर्यावरण अनुमती प्राप्त होताच मार्च महिन्यात पहिली लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. विशेषत: नवीन वाळू निर्गती धोरणानुसार कालावधी दिला नसला तरी नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे निमावली पाळताना वाळू घाटधारकांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. वाळू घाटांचा लिलाव झाल्यास वाळूचोरीला आळाच बसणार आहे. शिवाय त्याचे दरही कमी होणार आहे.वाळूचोरी थांबविण्यासाठी देवळी तालुक्यात दोन पथकदेवळी तालुक्यामध्ये यशोदा आणि वर्धा नदीचे मोठे पात्र असून वाळू चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या वाळू चोरट्यांना स्थानिक काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची साथ असल्याने नदीपात्रच पोखरुन टाकले आहे. वाहन पकडल्यानंतर चिरिमिरी घेऊन सोडल्याच्या अनेक घटनाही उघडकीस आल्या आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि लिलावास योग्य ठरलेल्या घाटातून होणारा अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी देवळी तालुक्याकरिताच दोन पथक तयार केले आहे. यामध्ये सेलू व वर्धा तालुक्याच्या तहसीलदारांसह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांची नियुक्ती केली आहे. ही दोन्ही पथके देवळी तालुक्यात कधीही आणि कुठेही छापा टाकून कारवाई करणार आहे. त्यामुळे या पथकाला कारवाई करण्यात किती यश येते, हे येणारा काळच ठरवणार आहे.नवीन वाळू निर्गती धोरणानुसार घाटांचे सर्वेक्षण करुन पर्यावरण अनुमतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. अनुमती मिळताच मार्च महिन्यात वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया राबविली जाईल.डॉ. इम्रान शेख, खनिकर्म अधिकारी, वर्धा

टॅग्स :sandवाळू