शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

मेळावे घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:13 PM

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही उत्तम आहे. मात्र, बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावे घेवून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले. ते भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.

ठळक मुद्देरामदास तडस : भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारिणी सभा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही उत्तम आहे. मात्र, बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावे घेवून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले. ते भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर आ. अनिल सोले, भाजपाचे पूर्व विदर्भ संघटन महामंत्री उपेद्र कोटेकर, माजी खा. विजय मुडे, माजी आमदार दादाराव केचे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, जि.प. अध्यक्ष नितिन मडावी, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना वानखेडे, भुपेंद्र शहाणे, अविनाश देव, किशोर दिघे, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रशांत बुरले, किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर किसान, राहुल चोपडा, प्रणव जोशी आदींची उपस्थिती होती.मार्गदर्शन करताना आ. अनिल सोले यांनी महाराष्ट्र शासनचे यंदाच्या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवले आहे. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी वृक्ष लागवड बाबत जनजागृती करण्यासाठी 'वृक्ष दिंडी' २८ जूनला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चिचगाव तालुका देवळी येथून निघणार आल्याचे सांगत या वृक्षदिंडीचा समारोप नागपूर येथ ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी बुथ रचनेवर भर देत 'एक बुथ पंचवीस युवा' या कार्यक्रमाची माहिती दिली. माजी आमदार दादाराव केचे यांनी कार्यकर्ता हाच पक्षाचा प्राण आहे, असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपेंद्र कोटेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.नगराध्यक्षांचा गौरवस्वच्छ सर्वेक्षण २०१८ या उपक्रमात वर्धा न.प.ने उल्लेखनिय कार्य केल्यामुळे वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर समुद्रपूर नगरपंचायतीच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून तेथील नगराध्यक्ष गजानन राऊत यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी शिला सोनोरे यांनाही सन्मानित करण्यात आले.