शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दारूविक्रेत्यांना लगाम घालून दारूबंदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:47 IST

वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा घोषित करून यात दारूबंदी करण्यात आली. याला अनेक वर्षे लोटले असून पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे जिल्ह्यात खुलेआम दारू विकल्या जात असते, हे वास्तव असून वेळोवेळी वॉश आऊट केल्या जात असतानाही पुलगाव शहरात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे.

ठळक मुद्दे२५० महिला कार्यकर्त्यांचे पोलीस प्रशासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा घोषित करून यात दारूबंदी करण्यात आली. याला अनेक वर्षे लोटले असून पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे जिल्ह्यात खुलेआम दारू विकल्या जात असते, हे वास्तव असून वेळोवेळी वॉश आऊट केल्या जात असतानाही पुलगाव शहरात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. त्याचा परिणाम परिसरातील सर्व सामान्य कुटुंबावर होत आहे. खून, मारामारी घरफोडी या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्याचा परिणाम समाजाच्या मानसिकतेवर होत असून शहरातील दारू विक्रेत्यावर लगाम घालून अवैध दारूविक्रीवर अंकुश घालावा, अशी मागणी शहरातील डॉ.आंबेडकर नगर भागातील ३०० महिला कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.महिलांनी केलेल्या तक्ररीनुसार डॉ. आंबेडकर नगर भागात खुलेआम दारू विकल्या जात आहे. ही दारू मानवी शारिरीक दृष्ट्या विषारीयुक्त असून शरिराला घात करणारी आहे. दारू पिणाऱ्यांना बरेच प्रकारचे आजार होवून अनेकांचा बळीही गेला आहे. तर अनेकांना मेंदूचे, आतडी, फुफ्फुसाचे, किडनीचे, रक्ताचे शरीर कंपाचे आजाराने ग्रासलेले आहेत. आंबेडकर नगर येथील आठवडी बाजार परिसरात अल्पवयीन मुले, विद्यार्थ्यांना गांजा, चरस याची नशा करण्याची सवय लागली आहे.आंबेडकरनगरमध्ये गरीब कुटुंब मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. सदर कुटूंबातील लोक मोलमजुरी व कामधंदा करून आपले कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु या भागात होत असलेल्या अवैद्य दारू विक्रीमुळे व या दारू सेवनामुळे घरात दररोजची भांडण, झगडे, मारामारी होवून कलह व अशांती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या मुला बाळांवर, शैक्षणिक, मानसिक परिणाम होवून सुख, शांती हिरावून घेतली गेली असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेली दारू विक्रेत्यांची दादागिरी, गुंडगिरी, झुंडशाही सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अश्लिल शिवीगाळ, मारझोड करणे, चाकु, सुरे, भाले, फरशे तलवारी काढणे, वॉर्डात दहशतीचे वातावरण निर्माण करून खुनांची व जीवे मारण्याची धमकी देणे, असा प्रकार सर्रास सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे.१५ दारूविक्रेत्यांचा उच्छाद, महिला व मुली त्रस्तयेण्याजाणाऱ्या रस्त्यावर उभे राहून तरूण महिला, मुली, विद्यार्थ्यांना अश्लिल चाळे करणे यामुळे परिसरातील महिला, विद्यार्थीनी, ज्येष्ठ नागरिकांना या दारूविक्रेत्यांच्या घरासमोरून जाताना जीव मुठीत घेवून जावे लागत आहे. येथील १४-१५ दारू विक्रेत्यांनी घातलेल्या उच्छादामुळे राहणे, चालणे, फिरणे, जगणे मुश्कील झाले असल्याचा आरोपही निवेदनातून पोलीस प्रशासनाला कल्पना परिहार, आशा नंदेश्वर, रेखा सहारे, कविता सरदारे, जीजा वांदिले, शालू जांभुळकर, माया सरदारे यांच्यासह २५० महिलांनी केला आहे.