शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेत्यांना लगाम घालून दारूबंदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:47 IST

वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा घोषित करून यात दारूबंदी करण्यात आली. याला अनेक वर्षे लोटले असून पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे जिल्ह्यात खुलेआम दारू विकल्या जात असते, हे वास्तव असून वेळोवेळी वॉश आऊट केल्या जात असतानाही पुलगाव शहरात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे.

ठळक मुद्दे२५० महिला कार्यकर्त्यांचे पोलीस प्रशासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा घोषित करून यात दारूबंदी करण्यात आली. याला अनेक वर्षे लोटले असून पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे जिल्ह्यात खुलेआम दारू विकल्या जात असते, हे वास्तव असून वेळोवेळी वॉश आऊट केल्या जात असतानाही पुलगाव शहरात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. त्याचा परिणाम परिसरातील सर्व सामान्य कुटुंबावर होत आहे. खून, मारामारी घरफोडी या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्याचा परिणाम समाजाच्या मानसिकतेवर होत असून शहरातील दारू विक्रेत्यावर लगाम घालून अवैध दारूविक्रीवर अंकुश घालावा, अशी मागणी शहरातील डॉ.आंबेडकर नगर भागातील ३०० महिला कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.महिलांनी केलेल्या तक्ररीनुसार डॉ. आंबेडकर नगर भागात खुलेआम दारू विकल्या जात आहे. ही दारू मानवी शारिरीक दृष्ट्या विषारीयुक्त असून शरिराला घात करणारी आहे. दारू पिणाऱ्यांना बरेच प्रकारचे आजार होवून अनेकांचा बळीही गेला आहे. तर अनेकांना मेंदूचे, आतडी, फुफ्फुसाचे, किडनीचे, रक्ताचे शरीर कंपाचे आजाराने ग्रासलेले आहेत. आंबेडकर नगर येथील आठवडी बाजार परिसरात अल्पवयीन मुले, विद्यार्थ्यांना गांजा, चरस याची नशा करण्याची सवय लागली आहे.आंबेडकरनगरमध्ये गरीब कुटुंब मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. सदर कुटूंबातील लोक मोलमजुरी व कामधंदा करून आपले कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु या भागात होत असलेल्या अवैद्य दारू विक्रीमुळे व या दारू सेवनामुळे घरात दररोजची भांडण, झगडे, मारामारी होवून कलह व अशांती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या मुला बाळांवर, शैक्षणिक, मानसिक परिणाम होवून सुख, शांती हिरावून घेतली गेली असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेली दारू विक्रेत्यांची दादागिरी, गुंडगिरी, झुंडशाही सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अश्लिल शिवीगाळ, मारझोड करणे, चाकु, सुरे, भाले, फरशे तलवारी काढणे, वॉर्डात दहशतीचे वातावरण निर्माण करून खुनांची व जीवे मारण्याची धमकी देणे, असा प्रकार सर्रास सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे.१५ दारूविक्रेत्यांचा उच्छाद, महिला व मुली त्रस्तयेण्याजाणाऱ्या रस्त्यावर उभे राहून तरूण महिला, मुली, विद्यार्थ्यांना अश्लिल चाळे करणे यामुळे परिसरातील महिला, विद्यार्थीनी, ज्येष्ठ नागरिकांना या दारूविक्रेत्यांच्या घरासमोरून जाताना जीव मुठीत घेवून जावे लागत आहे. येथील १४-१५ दारू विक्रेत्यांनी घातलेल्या उच्छादामुळे राहणे, चालणे, फिरणे, जगणे मुश्कील झाले असल्याचा आरोपही निवेदनातून पोलीस प्रशासनाला कल्पना परिहार, आशा नंदेश्वर, रेखा सहारे, कविता सरदारे, जीजा वांदिले, शालू जांभुळकर, माया सरदारे यांच्यासह २५० महिलांनी केला आहे.