शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Ganesh Chaturthi 2018; वर्धा जिल्हा; नाचणगावातील १२५ वर्षे पुरातन गणेश मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:20 IST

पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले.

ठळक मुद्देकपडा उद्योगाला ट्रेडमार्कही श्री गणेश ठरला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले. रेल्वे सुरू झाल्याने आठ जीन सुरू होते. याच मंडळींनी १८९० मध्ये चार एकर जागेत गणेश व शितला माता मंदिराचे बांधकाम केले.तेव्हापासून मंदिरात पुजारी म्हणून पं.मदनलाल शर्मा कार्यरत होते. १ मे २०१३ मध्ये पं. कमलनयन यांचा मृत्यू झाल्याने वंशपरंपरागत पुजारी म्हणून सध्या पं. दिलीप कमलनयन शर्मा कार्यरत आहेत. या ठिकाणी पूर्वीचे गणेश मंदिर आजही त्याच स्थितीत आहे. महाराजदिन यांनी त्या काळी पिंपळ वृक्षाखाली देवीची स्थापना केली. आज तेथे छोटेखानी शितला माता मंदिर आहे व लागूनच गणेश मंदिर आहे. धार्मिक प्रवृत्ती व निष्ठा या भावनेतून गणेश जिनींग व प्रेसींग तर १८८१ मध्ये पुलगाव कॉटन मिल सुरू झाला. त्या कपडा उद्योगाला ट्रेडमार्कही श्री गणेश ठरला. हे दोन्ही देवी देवता जागृत मानल्या जाते. आजही मार्बलची सुंदर गणेशमूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १९०२ मध्ये पुलगाव नगर परिषदेची स्थापना होवून नगररचना करण्यात आली. १९१० मध्ये जागतिक बाजारपेठेतील आर्थिक मंदिमुळे शहरातील अनेक उद्योग बंद करून भांडवलदारांनी उद्योगांची विक्री केली. १९५५-५६ मध्ये मालगुजारी संपली आणि २२ नोव्हेंबर १९९५ रोजी गणेश व शितला माता देवस्थान ट्रस्टचे प्रकरण सहधर्मदाय आयुक्ताकडे न्यायप्रविष्ठ झाले. ११ वर्षे न्यायालयीन प्रकरण सुरू होते. २८ नोव्हेंबर २००६ रोजी निकाल लागला व देवस्थान ट्रस्टला अधिकार मिळाले. मध्यंतरी शहरात अनेक मोठी मंदिरे झाली, पण न्यायालयीन खर्च, उत्पन्न स्त्रोंताचा अभाव यामुळे या जागृत देवस्थानाचा विकास होवू शकला नाही. इंग्रज राजवटीत १८९३ पासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी देशप्रेम जागृत करण्याचे कार्य केले जात होते. शहरातील नागरीक आजही नवरात्र गणेशोत्सव आदी कार्यक्रमांतून या मंदिराच्या प्रांगणात उत्सव साजरे करतात. न्यायालयीन प्रकरणामुळे मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. पण भाविकांची श्रद्धा कायम आहे. वास्तविक, येथील प्रशस्त जागा, १२५ वर्षांचा इतिहास, भाविकांची श्रद्धा पाहता शासनाने धार्मिक स्थळाचा दर्जा व विकास निधी देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८