शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

Ganesh Chaturthi 2018; वर्धा जिल्हा; नाचणगावातील १२५ वर्षे पुरातन गणेश मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:20 IST

पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले.

ठळक मुद्देकपडा उद्योगाला ट्रेडमार्कही श्री गणेश ठरला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले. रेल्वे सुरू झाल्याने आठ जीन सुरू होते. याच मंडळींनी १८९० मध्ये चार एकर जागेत गणेश व शितला माता मंदिराचे बांधकाम केले.तेव्हापासून मंदिरात पुजारी म्हणून पं.मदनलाल शर्मा कार्यरत होते. १ मे २०१३ मध्ये पं. कमलनयन यांचा मृत्यू झाल्याने वंशपरंपरागत पुजारी म्हणून सध्या पं. दिलीप कमलनयन शर्मा कार्यरत आहेत. या ठिकाणी पूर्वीचे गणेश मंदिर आजही त्याच स्थितीत आहे. महाराजदिन यांनी त्या काळी पिंपळ वृक्षाखाली देवीची स्थापना केली. आज तेथे छोटेखानी शितला माता मंदिर आहे व लागूनच गणेश मंदिर आहे. धार्मिक प्रवृत्ती व निष्ठा या भावनेतून गणेश जिनींग व प्रेसींग तर १८८१ मध्ये पुलगाव कॉटन मिल सुरू झाला. त्या कपडा उद्योगाला ट्रेडमार्कही श्री गणेश ठरला. हे दोन्ही देवी देवता जागृत मानल्या जाते. आजही मार्बलची सुंदर गणेशमूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १९०२ मध्ये पुलगाव नगर परिषदेची स्थापना होवून नगररचना करण्यात आली. १९१० मध्ये जागतिक बाजारपेठेतील आर्थिक मंदिमुळे शहरातील अनेक उद्योग बंद करून भांडवलदारांनी उद्योगांची विक्री केली. १९५५-५६ मध्ये मालगुजारी संपली आणि २२ नोव्हेंबर १९९५ रोजी गणेश व शितला माता देवस्थान ट्रस्टचे प्रकरण सहधर्मदाय आयुक्ताकडे न्यायप्रविष्ठ झाले. ११ वर्षे न्यायालयीन प्रकरण सुरू होते. २८ नोव्हेंबर २००६ रोजी निकाल लागला व देवस्थान ट्रस्टला अधिकार मिळाले. मध्यंतरी शहरात अनेक मोठी मंदिरे झाली, पण न्यायालयीन खर्च, उत्पन्न स्त्रोंताचा अभाव यामुळे या जागृत देवस्थानाचा विकास होवू शकला नाही. इंग्रज राजवटीत १८९३ पासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी देशप्रेम जागृत करण्याचे कार्य केले जात होते. शहरातील नागरीक आजही नवरात्र गणेशोत्सव आदी कार्यक्रमांतून या मंदिराच्या प्रांगणात उत्सव साजरे करतात. न्यायालयीन प्रकरणामुळे मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. पण भाविकांची श्रद्धा कायम आहे. वास्तविक, येथील प्रशस्त जागा, १२५ वर्षांचा इतिहास, भाविकांची श्रद्धा पाहता शासनाने धार्मिक स्थळाचा दर्जा व विकास निधी देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८