शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018; वर्धा जिल्हा; नाचणगावातील १२५ वर्षे पुरातन गणेश मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:20 IST

पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले.

ठळक मुद्देकपडा उद्योगाला ट्रेडमार्कही श्री गणेश ठरला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले. रेल्वे सुरू झाल्याने आठ जीन सुरू होते. याच मंडळींनी १८९० मध्ये चार एकर जागेत गणेश व शितला माता मंदिराचे बांधकाम केले.तेव्हापासून मंदिरात पुजारी म्हणून पं.मदनलाल शर्मा कार्यरत होते. १ मे २०१३ मध्ये पं. कमलनयन यांचा मृत्यू झाल्याने वंशपरंपरागत पुजारी म्हणून सध्या पं. दिलीप कमलनयन शर्मा कार्यरत आहेत. या ठिकाणी पूर्वीचे गणेश मंदिर आजही त्याच स्थितीत आहे. महाराजदिन यांनी त्या काळी पिंपळ वृक्षाखाली देवीची स्थापना केली. आज तेथे छोटेखानी शितला माता मंदिर आहे व लागूनच गणेश मंदिर आहे. धार्मिक प्रवृत्ती व निष्ठा या भावनेतून गणेश जिनींग व प्रेसींग तर १८८१ मध्ये पुलगाव कॉटन मिल सुरू झाला. त्या कपडा उद्योगाला ट्रेडमार्कही श्री गणेश ठरला. हे दोन्ही देवी देवता जागृत मानल्या जाते. आजही मार्बलची सुंदर गणेशमूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १९०२ मध्ये पुलगाव नगर परिषदेची स्थापना होवून नगररचना करण्यात आली. १९१० मध्ये जागतिक बाजारपेठेतील आर्थिक मंदिमुळे शहरातील अनेक उद्योग बंद करून भांडवलदारांनी उद्योगांची विक्री केली. १९५५-५६ मध्ये मालगुजारी संपली आणि २२ नोव्हेंबर १९९५ रोजी गणेश व शितला माता देवस्थान ट्रस्टचे प्रकरण सहधर्मदाय आयुक्ताकडे न्यायप्रविष्ठ झाले. ११ वर्षे न्यायालयीन प्रकरण सुरू होते. २८ नोव्हेंबर २००६ रोजी निकाल लागला व देवस्थान ट्रस्टला अधिकार मिळाले. मध्यंतरी शहरात अनेक मोठी मंदिरे झाली, पण न्यायालयीन खर्च, उत्पन्न स्त्रोंताचा अभाव यामुळे या जागृत देवस्थानाचा विकास होवू शकला नाही. इंग्रज राजवटीत १८९३ पासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी देशप्रेम जागृत करण्याचे कार्य केले जात होते. शहरातील नागरीक आजही नवरात्र गणेशोत्सव आदी कार्यक्रमांतून या मंदिराच्या प्रांगणात उत्सव साजरे करतात. न्यायालयीन प्रकरणामुळे मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. पण भाविकांची श्रद्धा कायम आहे. वास्तविक, येथील प्रशस्त जागा, १२५ वर्षांचा इतिहास, भाविकांची श्रद्धा पाहता शासनाने धार्मिक स्थळाचा दर्जा व विकास निधी देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८