शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

समाजातील नकारात्मकतेला गांधीविचार हेच उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 9:36 PM

महात्मा गांधींनी विदेशात वकिली करतानाही सत्याचेच प्रयोग केले. त्यांची वकिली ही नैतिक आणि सामाजिक न्यायासाठी होती. या देशातही त्यांनी निर्भयपणे अखेरच्या श्वासापर्यंत समाजाची आणि देशवासीयांची वकिली केली.

ठळक मुद्देअसीम सरोदे : ‘गांधी समजून घेताना’ मासिक व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींनी विदेशात वकिली करतानाही सत्याचेच प्रयोग केले. त्यांची वकिली ही नैतिक आणि सामाजिक न्यायासाठी होती. या देशातही त्यांनी निर्भयपणे अखेरच्या श्वासापर्यंत समाजाची आणि देशवासीयांची वकिली केली. आज सामाजिक न्यायाचा आवाज क्षीण होत असताना विरोधी आणि नकारात्मक विचारांना उत्तर देण्यासाठी गांधी पुरून उरतो, असे उद्गार अ‍ॅड. असीम सरोदे, पुणे यांनी गांधी फॉर फ्युचर समितीद्वारे आयोजित व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफताना काढले.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित गांधी समजून घेताना व्याख्यानमालेत असीम सरोदे यांनी 'नैतिक न्यायाचा पुरस्कर्ता गांधी' या विषयाची मांडणी केली. गांधींचा लढा हा सुरुवातीपासूनच परिवर्तनासाठी होता आणि त्याच उद्देशाने प्रेरित होऊन त्यांनी न्यायालयातही विवेकनिष्ठ सत्याचा विचार मांडला. अन्यायाविरोधात लढणाऱ्या बॅरिस्टर गांधींनी अर्थार्जनासाठी नव्हे, तर दोन पक्षकारांमधील प्रश्न आपसी सहमतीने, तडजोडीने सुटावेत, या विचारांतून दक्षिण आफ्रिकेत वकिली केली. विचारांची प्रक्रिया ही सतत प्रवाही असते, ती कुणीच थांबवू नये, असे म्हणणारे गांधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच मांडणी करीत असतात. गांधींनी हिंदू धर्मात प्रथमत: सामूहिक प्रार्थना, सर्वधर्म समभाव प्रार्थना आणली, तो सामाजिक न्यायाचाच प्रयोग होता. गांधींचा सर्वोदयाचा विचारही सामाजिक न्यायाचा विचार आहे. गांधींना या देशाच्या नेतृत्वासाठी चेहराविरहित यंत्रणा अपेक्षित होती. मात्र, आज देशात लोकशाही चालविणारी सुव्यवस्था विकसित होण्याऐवजी यंत्रणेत हस्तक्षेप करणारा चेहराच अधिक प्रभावी ठरतो आहे. या देशात संवैधानिक मूल्यांचा, नैतिक आणि सामाजिक न्यायाचा विचार रुजवायचा असेल तर आता इथल्या अव्यवस्थेवर धडका माराव्या लागतील, असेही सरोदे म्हणाले.आपल्या सामाजिक व पर्यावरणीय न्यायालयीन लढ्यात गांधींच्या नैतिक न्यायाचे बळ लाभले आहे, हे सांगताना अ‍ॅड. सरोदे यांनी अनेक दाखले दिले आणि गांधी आजही समाजासाठी दिशादर्शकच असल्याची जाणीव त्यांनी आपल्या व्याख्यानातून अधोरेखित केली.