शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

अर्थसंकल्पातील शेती तरतुदींवर गांधीवादी कृषी तज्ज्ञ नाखूष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 2:12 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थ संकल्पावर वर्धा जिल्ह्यातील गांधीवादी कृषी तज्ज्ञांनी शेतकी तरतुदीबाबत प्रचंड टीका केली आहे.

ठळक मुद्देशेतकी क्षेत्रातील अन्यायाची लुटारू योजना मागून पुढे सुरू असल्याचे टीका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थ संकल्पावर वर्धा जिल्ह्यातील गांधीवादी कृषी तज्ज्ञांनी शेतकी तरतुदीबाबत प्रचंड टीका केली असून अर्थ संकल्पातील कृषी क्षेत्राच्या तरतुदी म्हणजे शेतकी क्षेत्रावर अन्यायाची लुटारू योजना मागून पुढे चालू असल्याची टीका केली आहे.या संदर्भात माहिती देताना गांधीवादी कृषी शास्त्रज्ञ अशोक बंग म्हणाले की, वरवर भाषा सवलतींची पण मुळात प्रत्यक्ष धोरणे व निती प्रामुख्याने सावत्रपणाची हेच या अंदाजपत्रकातही दुर्दैवाने दिसते. पुढील निवडणुकांच्या आधीचे शेवटचे हे नियमित अंदाजपत्रक असूनही सरकारने शेतकी क्षेत्राचे मरण हेच सरकारचे धोरण या जुलुमी नितीला घट्ट केले आहे. वरवर काही शोभिवंत सजावटीची व लोभसपणाची अनुकूलता दिसली तरी खोलीवर जावून बघितले तर आधीच उद्ध्वस्त झालेल्या शेतकी क्षेत्राचे वस्त्रहरण करण्याची छुपी प्रमुख धोरणे कायम असल्यासारखीच आहेत.राष्ट्रीय किसान आयोग म्हणजेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या नाही. खराखुरा पूर्ण समावेशक असा उत्पादन खर्चचा हिशोब काढून तशा उत्पादन खर्चाच्या १५० टक्के शेतमालाला भाव मिळण्याची हमी प्रत्यक्षात येण्याचे धोरण नाही. १३० कोटीच्या अन्नदात्याला हक्काचा न्याय सन्मानाने मिळावे, असे अर्थ संकल्पात कुठेही दिसत नाही. राष्ट्रीय नियोजनात शेती क्षेत्राला वाटा १९७० च्या दशकात जवळपास १५ टक्के होता, तो घसरत २०१० च्या दशकात ३ ते ५ टक्के इतका कोसळवला. सध्या काय सुधारणा त्या बाबतीत आहे, हे याचा हिशोब लावला पाहिजे. देशाचे ५८ टक्के लोक शेतकी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाटा १३ ते १५ टक्के इतका अन्यायकारक आहे. त्यात काय सुधारणा घडवून आणणार? शेती क्षेत्राचा वृद्धी दर (ग्रोथ रेट) हा नेहमी राष्ट्रीय वाढ दराच्या अर्धा किंवा पाव एवढाच राहत आला. आता काय सुधारणा ? देशातल्या १ टक्के लोकांना ७३ टक्के संपत्ती वाढीचा वाटा मिळाला. यात काय फरक या धोरणांमधून घडणार ? हे सारे प्रश्न कृषी क्षेत्राकरिता मुलभूत आहेत, असे बंग म्हणाले.

टॅग्स :agricultureशेती