शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

कपाशी पिकावर बुरशीजन्य रोगाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 11:40 PM

कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे. यात कपाशीवर पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाच्या सर्वेक्षणात उघड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे. यात कपाशीवर पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. हा प्रकार पावसाच्या खंडामुळे घडल्याचा संशय कृषी विभागाच्यावतीने व्यक्त केला.तालुक्यातील वडनेर, फुकटा, टेंभा, तिवसडी, दोंदुडा, बांबर्डा, मानकापूर, परसोडा रिठ, गांगापूर या गावात मोठ्या प्रमाणात तर आर्वी, काचनगाव, पवनी, वेळा, इंझाळा, सिरसगाव, गोपालपूर, नरसिंगपूर, वाघोली, पिपंळगाव, सातेफळ, कडाजना व कवडघाट इत्यादी गावात या आजाराची सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. या बुरशीजन्य आजारामुळे या भागातील एकूण ५०५.६० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून आले. या सर्व रोगांमुळे शोधण्याकरिता मौजा वडनेर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, तालुका कृषी अधिकारी राष्ट्रपाल मेश्राम, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.आर.टी. गोहोकर वनस्पतीरोग शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत वडनेर शिवारात पंकज मोगलाना नगराळे, महादेव बाळकृष्ण नगराळे, राजेश्वर तानबाजी महाजन यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी करण्यात आली.कपाशीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यावर नैसर्गिक कारणांचा परिणाम जाणवल्याचे दिसून आले. पावसाचा खंड, हलकी जमीन व खंडानंतर पाऊस हे याचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. बुरशी जमिनीतून मुळाद्वारे कापसाच्या झाडावर मारा करून अन्नद्रव्ये घेणाºया झाडाच्या नलीका क्षतीग्रस्त करतात. यामुळे झाड अचानक वाळल्याचे दिसते.सदर सर्वेक्षणात वडनेर सरपंच विनोद वानखेडे, उपसरपंच सुमीत सरोदे, यांच्यासह कृषी पर्यवेक्षक ए.व्ही. कोहळे, कृषी सहाय्यक सी.बी. टापरे, कृषी सहायक व्ही.व्ही. बोरकर, कृषी सहायक पी.डब्ल्यु. निखाडे, संदीप हांडे, योगेश डहाके इत्यादींनी सर्वेक्षणाची माहिती सादर केली.