शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वर्ध्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल १०८४.९८ लाख रूपये नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:14 IST

Vardha : १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जुलै ते ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील संत्रावर्गीय फळपिकांचे नुकसान झाले होते. याचा फटका आर्वी तालुक्यात जास्त बसला होता. या नुकसानाची दखल घेत राज्य सरकारने आर्वी तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना १०८४.९८ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. तसा आदेश मंगळवार २१ जानेवारी रोजी महसूल विभागाने काढला आहे.

सन २०२४ मध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन हंगामात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. सरकारकडे मदत मिळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शासन व प्रशासाने उंबरठे झिजवले होते. जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. याची दखल घेत सरकारने फळ उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

३०१३.८५ हेक्टरचे नुकसान सन २०२४ च्या खरीप हंगामाच्या सुरूवातीला म्हणजे जुलै व ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होते. त्यामुळे अनेक संत्रा व अन्य फळ बाग शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्याचा हंगाम वाया गेला होता. जिल्ह्यातील ३०१३.८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार ९३३ शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठविले होते.

ढगाळ वातावरणामुळे बसला होता फटका जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात ढगाळ वातावरण व सतत पाऊस पडत होता. त्यामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे फळगळतीमुळे नुकसान झाले. विशेष फळपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदतीची मागणी १५ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आली होती. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेतीwardha-acवर्धा