शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल १०८४.९८ लाख रूपये नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:14 IST

Vardha : १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जुलै ते ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील संत्रावर्गीय फळपिकांचे नुकसान झाले होते. याचा फटका आर्वी तालुक्यात जास्त बसला होता. या नुकसानाची दखल घेत राज्य सरकारने आर्वी तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना १०८४.९८ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. तसा आदेश मंगळवार २१ जानेवारी रोजी महसूल विभागाने काढला आहे.

सन २०२४ मध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन हंगामात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. सरकारकडे मदत मिळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शासन व प्रशासाने उंबरठे झिजवले होते. जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. याची दखल घेत सरकारने फळ उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

३०१३.८५ हेक्टरचे नुकसान सन २०२४ च्या खरीप हंगामाच्या सुरूवातीला म्हणजे जुलै व ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होते. त्यामुळे अनेक संत्रा व अन्य फळ बाग शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्याचा हंगाम वाया गेला होता. जिल्ह्यातील ३०१३.८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार ९३३ शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठविले होते.

ढगाळ वातावरणामुळे बसला होता फटका जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात ढगाळ वातावरण व सतत पाऊस पडत होता. त्यामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे फळगळतीमुळे नुकसान झाले. विशेष फळपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदतीची मागणी १५ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आली होती. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेतीwardha-acवर्धा