शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

वर्ध्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल १०८४.९८ लाख रूपये नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:14 IST

Vardha : १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जुलै ते ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील संत्रावर्गीय फळपिकांचे नुकसान झाले होते. याचा फटका आर्वी तालुक्यात जास्त बसला होता. या नुकसानाची दखल घेत राज्य सरकारने आर्वी तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना १०८४.९८ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. तसा आदेश मंगळवार २१ जानेवारी रोजी महसूल विभागाने काढला आहे.

सन २०२४ मध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन हंगामात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. सरकारकडे मदत मिळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शासन व प्रशासाने उंबरठे झिजवले होते. जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. याची दखल घेत सरकारने फळ उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

३०१३.८५ हेक्टरचे नुकसान सन २०२४ च्या खरीप हंगामाच्या सुरूवातीला म्हणजे जुलै व ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होते. त्यामुळे अनेक संत्रा व अन्य फळ बाग शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्याचा हंगाम वाया गेला होता. जिल्ह्यातील ३०१३.८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार ९३३ शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठविले होते.

ढगाळ वातावरणामुळे बसला होता फटका जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात ढगाळ वातावरण व सतत पाऊस पडत होता. त्यामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे फळगळतीमुळे नुकसान झाले. विशेष फळपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदतीची मागणी १५ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आली होती. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेतीwardha-acवर्धा