शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

उमेदवारीसाठी उरले चार दिवस: मातब्बर उमेदवारांमुळे तुल्यबळ लढतीचे संकेत

By रवींद्र चांदेकर | Updated: March 31, 2024 18:17 IST

लोकसभेसाठी महायुतीने रामदास तडस, तर महाविकास आघाडीने अमर काळे यांची उमेदवारी घोषित केली आहे.

वर्धा: लोकसभेसाठी महायुतीने रामदास तडस, तर महाविकास आघाडीने अमर काळे यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. दोन्ही उमेदवार मातब्बर असल्याने यावेळी तुल्यबळ लढतीचे संकेत मिळत आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस यांचा एक लाख ८७ हजार १९१ मतांनी पराभव केला होता. तत्पूर्वी २०१४ च्या निवडणुकीत तडस यांनी काँग्रेसचे सागर मेघे यांचा दोन लाख १५ हजार ७८३ मतांनी पराभव केला होता. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दत्ता मेघे यांनी भाजपचे सुरेश वाघमारे यांचा ९५ हजार ९१८ मतांनी पराभव केला होता. २०१४ पेक्षा २०१९ च्या निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारामधील मतांचा फरक कमी झाला होता. त्यामुळे यावेळी हा फरक आणखी कमी होऊन भाजप व राष्ट्रवादीत तुल्यबळ लढत होण्याचे संकेत मिळत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ चार दिवस उरले आहे. ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. त्या दिवशी रिंगणात नेमके किती अन् कोणत्या पक्षाचे उमेदवार उरतात, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. ९ एप्रिलपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. मात्र, खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्येच होणार आहे. तथापि, रिंगणातील वंचित, बसपा आणि इतर उमेदवार किती मते खेचतात, यावर जय आणि पराजयाचा दोलक अवलंबून राहणार आहे. 

२०१४ पासून विरोधकांना विजयाची प्रतीक्षा२००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांनी भाजपचे सुरेश वाघमारे यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. परिणामी २०१४ पासून विरोधकांना विजयाची प्रतीक्षा आहे. विरोधकांचा १० वर्षांच्या विजयाचा दुष्काळ यंदा संपणार का, असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर मतदार राजाच्या हाती आहे. २६ एप्रिलला मतदान झाल्यानंतर तब्बल सव्वा महिन्यानंतरच मतदारांचा कौल बाहेर येणार आहे.

टॅग्स :wardha-pcवर्धाwardha-acवर्धाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४