शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतकऱ्यांचा शिवारी रस्ता बंद करण्याचा वनविभागाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:36 PM

दीडशे वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्याच्या शिवारी रस्त्यावर वनविभागाने आपला मालकी हक्क दाखवित तो रस्ता बंद केला. तेथे सध्या रोपटे लावली जात असून शेतकºयांसह ग्रामस्थांमध्ये यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट सदर घटनास्थळ गाठून जेसीबीसमोर ठिय्या दिला.

ठळक मुद्देप्रहारच्या मध्यस्तीने निघाला तोडगा : गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : दीडशे वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्याच्या शिवारी रस्त्यावर वनविभागाने आपला मालकी हक्क दाखवित तो रस्ता बंद केला. तेथे सध्या रोपटे लावली जात असून शेतकºयांसह ग्रामस्थांमध्ये यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट सदर घटनास्थळ गाठून जेसीबीसमोर ठिय्या दिला. त्यानंतर प्रहारचे देवा धोटे यांच्या मदस्तीने समाधानकारक तोडगा निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.आरंभावासियांच्या शेतामध्ये जाण्यासाठी १८८८ मध्ये नकाशानुसार गावकºयाच्या रस्त्याची नोंद होती. त्याच रस्त्यावर स्मशान भूमी सुद्ध आहे. त्यानंतर १९३० ला सुद्धा नोंद आहे. मात्र, त्यानंतर वनविभागाने सदर जागेवर आपला हक्क दाखवित या जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी जेसीबी घेऊन आले. ही वार्ता ग्रामस्थांना माहित होताच ग्रामस्थही तेथे धडकले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर माजी आमदार राजू तिमांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. बाबळे, क्षेत्रसहायक जी.व्ही. बोर, वनरक्षक सुरेखा तिजारे, ठाणेदार प्रवीण मुंडे, देवा धोटे, शंकर हरडे, हरिभाऊ हरडे, किसना सोमलकर, विवेक हिवरकर, पुजा हिवरकर, मारोती वानखेडे, सुषमा हिवरकर, कैलास लढी, नंदा हिवरकर, बाबाराव झाडे, यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. तेव्हा ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.१९९९ मध्ये रिकॉर्ड दुरूस्ती होवून वनविभागाला विस्तार अधिकार प्राप्त झाले. त्यावेळी पूर्ण मोजणी करून आम्ही वनविभागाची हद्द निर्धारित केली. मात्र, त्यावेळी गावकºयांनी आपला रस्ता करून घेण्यासाठी कुणीही समोर न आल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची रस्त्याकरिता जागा सोडली नव्हती. परंतु, गावकºयांची रास्त मागणी असल्यामुळे आम्ही तात्पुरता रस्ता त्यांना उपलब्ध करून देत आहोत.- बी. डी. बाबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी.