शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

३० वर्षांपासून काँग्रेस झाली खिळखिळी, कम्युनिस्टांनी मोडली मक्तेदारी; नंतर भाजपाने बसवले बस्तान

By रवींद्र चांदेकर | Updated: April 1, 2024 16:04 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग नऊ वेळा विजय मिळविल्यानंतर १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली होती. तेव्हापासून काँग्रेस खिळखिळी झाली आहे.

वर्धा लाेकसभा मतदारसंघातून

वर्धा : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग नऊ वेळा विजय मिळविल्यानंतर १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली होती. तेव्हापासून काँग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यानंतरच्या काळात भाजपाने प्रथम चंचू प्रवेश करून २०१४ पासून आपले बस्तान पक्के केले आहे.

पहिल्या १९५२ ते १९८९ च्या नवव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग विजय मिळविला होता. १९९१ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसची ही मक्तेदारी मोडीत काढली. १९९६ मध्ये भाजपने येथे चंचू प्रवेश केला. नंतर आलटून पालटून काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला. १९९८, १९९९ मध्ये काँग्रेसने बाजी मारली खरी पण, २००४ मध्ये पुन्हा भाजपने मुसंडी मारली. २००९ मध्ये काँग्रेसने विजय मिळविला. मात्र, २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने आपले बस्तान पक्के केले.

१९९१ च्या निवडणुकीपासूनच काँग्रेस खिळखिळी होण्यास सुरुवात झाली होती. काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष, पदाधिकाऱ्यांमधील सुंदोपसुंदी, एकमेकांची जिरविण्याची प्रवृत्ती, नेतृत्वाचा ओसरलेला प्रभाव आदी कारणांमुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसवर अवकळा आली. कधी काळी काँग्रेसच्या चिन्हावर कुणीही उमेदवार असला तरी विजयी होत होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये निश्चिततेचे वातावरण होते. नेते निर्धास्त झाले होते. त्याचा फटका पक्षाला बसला अन् भाजपने आपले बस्तान पक्के केले. एवढा बदल होऊनही काँग्रेस नेते अद्याप ताळ्यावर आलेले दिसत नाही. उमेदवारीच्या भांडणात मतदारसंघ मित्र पक्षाला गेला तरी काँग्रेस नेते आपल्याच धुंदीत दिसत आहे. त्यामुळे यंदा प्रथमच काँग्रेसचा उमेदवार मैदानात राहणार नाही.दुसऱ्याच्या चिन्हावर लढण्याची नामुष्की

आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार राहत होता. कधी हार, कधी जीत होत होती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसच्या माजी आमदारावर मित्र पक्षाच्या चिन्हावर लढण्याची नामुष्की ओढवली आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटली. परिणामी काँग्रेस तूर्तास वर्धेच्या रिंगणातून बाद झाली आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसवर ही नामुष्की ओढावल्याने महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या जिल्ह्यात प्रथमच काँग्रेसचा उमेदवार नसणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस