शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

३० वर्षांपासून काँग्रेस झाली खिळखिळी, कम्युनिस्टांनी मोडली मक्तेदारी; नंतर भाजपाने बसवले बस्तान

By रवींद्र चांदेकर | Updated: April 1, 2024 16:04 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग नऊ वेळा विजय मिळविल्यानंतर १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली होती. तेव्हापासून काँग्रेस खिळखिळी झाली आहे.

वर्धा लाेकसभा मतदारसंघातून

वर्धा : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग नऊ वेळा विजय मिळविल्यानंतर १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली होती. तेव्हापासून काँग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यानंतरच्या काळात भाजपाने प्रथम चंचू प्रवेश करून २०१४ पासून आपले बस्तान पक्के केले आहे.

पहिल्या १९५२ ते १९८९ च्या नवव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग विजय मिळविला होता. १९९१ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसची ही मक्तेदारी मोडीत काढली. १९९६ मध्ये भाजपने येथे चंचू प्रवेश केला. नंतर आलटून पालटून काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला. १९९८, १९९९ मध्ये काँग्रेसने बाजी मारली खरी पण, २००४ मध्ये पुन्हा भाजपने मुसंडी मारली. २००९ मध्ये काँग्रेसने विजय मिळविला. मात्र, २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने आपले बस्तान पक्के केले.

१९९१ च्या निवडणुकीपासूनच काँग्रेस खिळखिळी होण्यास सुरुवात झाली होती. काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष, पदाधिकाऱ्यांमधील सुंदोपसुंदी, एकमेकांची जिरविण्याची प्रवृत्ती, नेतृत्वाचा ओसरलेला प्रभाव आदी कारणांमुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसवर अवकळा आली. कधी काळी काँग्रेसच्या चिन्हावर कुणीही उमेदवार असला तरी विजयी होत होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये निश्चिततेचे वातावरण होते. नेते निर्धास्त झाले होते. त्याचा फटका पक्षाला बसला अन् भाजपने आपले बस्तान पक्के केले. एवढा बदल होऊनही काँग्रेस नेते अद्याप ताळ्यावर आलेले दिसत नाही. उमेदवारीच्या भांडणात मतदारसंघ मित्र पक्षाला गेला तरी काँग्रेस नेते आपल्याच धुंदीत दिसत आहे. त्यामुळे यंदा प्रथमच काँग्रेसचा उमेदवार मैदानात राहणार नाही.दुसऱ्याच्या चिन्हावर लढण्याची नामुष्की

आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार राहत होता. कधी हार, कधी जीत होत होती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसच्या माजी आमदारावर मित्र पक्षाच्या चिन्हावर लढण्याची नामुष्की ओढवली आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटली. परिणामी काँग्रेस तूर्तास वर्धेच्या रिंगणातून बाद झाली आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसवर ही नामुष्की ओढावल्याने महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या जिल्ह्यात प्रथमच काँग्रेसचा उमेदवार नसणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस