शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:27 PM

शेतकरी, कष्टकरी तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारच्या पं.स. सदस्या अरुणा सावरकर, प्रहारचे देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश सावरकर व रसुलाबाद पं.स. सर्कलमधील काही सुजान नागरिकांनी सोमवार १९ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : आर्वी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतकरी, कष्टकरी तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारच्या पं.स. सदस्या अरुणा सावरकर, प्रहारचे देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश सावरकर व रसुलाबाद पं.स. सर्कलमधील काही सुजान नागरिकांनी सोमवार १९ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सदर मागण्या निकाली निघाव्या यासाठी संबंधितांना वेळोवेळी निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीच्या निषेधार्थ हे आंदोलन आर्वी पं.स. कार्यालयासमोर डेरा टाकून सुरू करण्यात आले आहे.आर्वी पं.स.तील रसुलाबाद सर्कल मधील चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून पं.स. सदस्य अरुणा सावरकर यांनी यापूर्वी पं.स. सभागृहात सदर विषय मांडले. इतकेच नव्हे तर संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून सदर समस्या निकाली काढण्याची विनंती केली. परंतु, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध करण्यासाठी तसेच तालुका प्रशासनाचे सदर मागण्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात पं.स. सदस्य अरुणा सावरकर, राजेश सावरकर यांच्या नेतृत्त्वात अजय भोयर, बिट्टू रावेकर व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.आंदोलनकर्त्यांच्या मागण्यारोजगार हमी योजनेतील अनुदानाचे तात्काळ वाटप करण्यात यावे.रसुलाबाद येथील राजीव गांधी भवनचे काम मागील १० वर्षांपासून रखडले असून त्याला तात्काळ गती देण्यात यावी.घरकुल मधील सावळ्या गोंधळाचा त्रास गरजुंना होत असून तो दूर करण्यासाठी योग्य पाऊल उचलावेत.दिव्यांगांच्या वाट्याचा ३ टक्के निधी जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी खर्च केला नसून त्यांना तो खर्च करण्यासाठी लेखी सूचना देण्यात याव्या. दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ प्राधान्य क्रमाने देण्यात यावा.कवठा मार्गाची दैनावस्था झाली असून या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात यावे. बाºहा हे गाव आदिवासी बहूल असून या गावात प्राथमिक सोयी-सूविधांचा अभाव आहे. या कावाचा विकास करण्यात यावा. कुठलाही गरजू शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून तालुक्यात सर्वेक्षण करण्यात यावे. मनमर्जीने काम करणाऱ्या टेंभरी येथील अंगणवाडी सेविकेवर चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी.