शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा भडका; टँकरसाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:56 IST

शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे.

ठळक मुद्देपालिकेचे नियोजन कोलमडले : दहा दिवसांपासून कोरड, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. सद्यस्थितीत नागरिकांना दहा दिवसांपासून पाणी मिळाले नसून नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे.शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. शहरात सध्या सिमेंटीकरण, पाणीपुरवठा पाईपलाईन आणि भुयारी गटार योजना यामुळे शहरातील रस्ते पोखरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेत समन्वयाचा अभाव असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बांधकाम नळजोडणी वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठा खंडित होत असून पाण्याचाही अपव्यय होत आहे. परिणामी, नागरिकांच्या घशाला कोरड पडत आहे. पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात पालिका असमर्थ ठरल्याने दहा दिवसांपासून नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. शहरातील टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना केवळ तीन टँकरद्वारेच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत पाणी मिळत नसल्याने खासगी टँकरचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी नागरिकांना पाचशे ते हजार रुपये मोजावे लागत आहे. नागरिकांना काम सोडून पाण्याची सोय करण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने शहरातील पाणीकोंडी आणखीच तीव्र होण्याची शक्यता बळावली आहे.पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी थाटली दुकानदारीशहरातील पाणीटंचाई फायदा उचलत अनेकांनी पाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचा व्यवसायच थाटला आहे. यात नगरपालिकेतील काही आजी-माजी नगरसेवकांसह कर्मचारीही सहभागी आहे. त्यांनी स्वत: चे टँकर तयार करुन शहरात पाणीपुरवठा सुरु केला आहे. यांच्या सपन्नतेसाठी तर पालिका अतिरिक्त टँकरव्दारे पाणीपुरवठा करणे टाळत नाही ना? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.शहरात जवळपास २० ते २५ टँकर असून दररोज एक टँकर दहा ते पंधरा ट्रीप मारताना दिसत आहे. शहरालगतच्या शेतकºयांच्या विहिरीवरुन दोनशे रुपयात भरुन घेतलेला टँकर नागरिकांना १ हजार ते १ हजार २०० रुपयांत दिला जात आहे. यावरून टँकरचालक पाण्यासारखा पैसा लुटत आहे. यावर पालिकेने नियंत्रण आणण्याची गरज आहे.घरगुती बोअरवेलचे पाणी विकण्याकरिता नगरपालिका किंवा ग्रामपंचायतची परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही आर्वी मार्गावरील पंजाब कॉलनी परिसरातील एका गृहस्थामार्फत बिनदिक्कतपणे टँकरव्दारे पाण्याची विक्री सुरु आहे. लहान टँकर ५०० रुपये तर मोठा १ हजार रुपयात विकल्या जात आहे. पहाटेपासून तर रात्री उशीरापर्यंत पाणी विक्री सुरु असतानाही ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष आहे.मागील दहा दिवसांपासून नळ आले नसल्याने पाणी टँकरची मागणी वाढली आहे. कोणत्याही टँकरचालकाला फोन केला तर तत्काळ टँकर उपलब्ध होत नाही. एका दिवसाचे ‘वेटिंग’ असल्याचे सांगतात. तर काही जास्त पैसे दिल्यावर लगेच पाणी पोहोचवितात. अशी मनमर्जी सध्या शहरात सुरू असून नागरिकांची होरपळ होत आहे.कंत्राटदाराविरुद्ध पोलिसात तक्रारशहरात दहा दिवसांपासून नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असतानाही बॅचलर रोडलगतच्या राधानगरात भुयारी गटार योजनेच्या कामादरम्यान प्रशांत वानखेडे यांच्या घरची नळजोडणी तोडली. आज दहाव्या दिवशी नळ आले पण, जोडणी फुटल्याने त्यांना पाणी मिळाले नाही. नळजोडणी तोडल्याने कंत्राटदाराला विचारपूस केली असता त्याने वानखेडे यांनाच धमकावत आपली मुजोरी कायम ठेवली. तसेच पाणी घेऊन आलेला टँकरही त्यांच्या घरापर्यंत जाऊ दिला नाही. त्यामुळे वानखेडे यांनी पोलीस ठाणे गाठून कंत्राटदारविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. असाच त्रास अनेकांना सहन करावा लागत असल्याने मुजोर कंत्राटदारावर कारवाई करण्याची गरज आहे.पेट्रोलपेक्षा पाणी महागलेपाणीटंचाईच्या काळात पाण्यासाठी वाट्टेल ते अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. सकाळपासून नागरिक सार्वजनिक नळांवर, विहिरीवर व हातपंपावर गर्दी करून पाण्यासाठी धडपडतांना दिसून येत आहे. पाण्याची वाहतुक करण्यासाठी चक्क दोनचाकी व चारचाकी वाहनांचाही वापर होत आहे. त्यामुळे नागरिकांना परराष्ट्रातील पेट्रोल मिळणे सहज शक्य आहे. पण, पाणी मिळणे कठीण झाल्याने नागरिकांना पाणी आणण्याकरिता पेट्रोलची वाहने वापरावी लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई