शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा भडका; टँकरसाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:56 IST

शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे.

ठळक मुद्देपालिकेचे नियोजन कोलमडले : दहा दिवसांपासून कोरड, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. सद्यस्थितीत नागरिकांना दहा दिवसांपासून पाणी मिळाले नसून नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे.शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. शहरात सध्या सिमेंटीकरण, पाणीपुरवठा पाईपलाईन आणि भुयारी गटार योजना यामुळे शहरातील रस्ते पोखरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेत समन्वयाचा अभाव असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बांधकाम नळजोडणी वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठा खंडित होत असून पाण्याचाही अपव्यय होत आहे. परिणामी, नागरिकांच्या घशाला कोरड पडत आहे. पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात पालिका असमर्थ ठरल्याने दहा दिवसांपासून नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. शहरातील टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना केवळ तीन टँकरद्वारेच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत पाणी मिळत नसल्याने खासगी टँकरचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी नागरिकांना पाचशे ते हजार रुपये मोजावे लागत आहे. नागरिकांना काम सोडून पाण्याची सोय करण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने शहरातील पाणीकोंडी आणखीच तीव्र होण्याची शक्यता बळावली आहे.पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी थाटली दुकानदारीशहरातील पाणीटंचाई फायदा उचलत अनेकांनी पाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचा व्यवसायच थाटला आहे. यात नगरपालिकेतील काही आजी-माजी नगरसेवकांसह कर्मचारीही सहभागी आहे. त्यांनी स्वत: चे टँकर तयार करुन शहरात पाणीपुरवठा सुरु केला आहे. यांच्या सपन्नतेसाठी तर पालिका अतिरिक्त टँकरव्दारे पाणीपुरवठा करणे टाळत नाही ना? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.शहरात जवळपास २० ते २५ टँकर असून दररोज एक टँकर दहा ते पंधरा ट्रीप मारताना दिसत आहे. शहरालगतच्या शेतकºयांच्या विहिरीवरुन दोनशे रुपयात भरुन घेतलेला टँकर नागरिकांना १ हजार ते १ हजार २०० रुपयांत दिला जात आहे. यावरून टँकरचालक पाण्यासारखा पैसा लुटत आहे. यावर पालिकेने नियंत्रण आणण्याची गरज आहे.घरगुती बोअरवेलचे पाणी विकण्याकरिता नगरपालिका किंवा ग्रामपंचायतची परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही आर्वी मार्गावरील पंजाब कॉलनी परिसरातील एका गृहस्थामार्फत बिनदिक्कतपणे टँकरव्दारे पाण्याची विक्री सुरु आहे. लहान टँकर ५०० रुपये तर मोठा १ हजार रुपयात विकल्या जात आहे. पहाटेपासून तर रात्री उशीरापर्यंत पाणी विक्री सुरु असतानाही ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष आहे.मागील दहा दिवसांपासून नळ आले नसल्याने पाणी टँकरची मागणी वाढली आहे. कोणत्याही टँकरचालकाला फोन केला तर तत्काळ टँकर उपलब्ध होत नाही. एका दिवसाचे ‘वेटिंग’ असल्याचे सांगतात. तर काही जास्त पैसे दिल्यावर लगेच पाणी पोहोचवितात. अशी मनमर्जी सध्या शहरात सुरू असून नागरिकांची होरपळ होत आहे.कंत्राटदाराविरुद्ध पोलिसात तक्रारशहरात दहा दिवसांपासून नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असतानाही बॅचलर रोडलगतच्या राधानगरात भुयारी गटार योजनेच्या कामादरम्यान प्रशांत वानखेडे यांच्या घरची नळजोडणी तोडली. आज दहाव्या दिवशी नळ आले पण, जोडणी फुटल्याने त्यांना पाणी मिळाले नाही. नळजोडणी तोडल्याने कंत्राटदाराला विचारपूस केली असता त्याने वानखेडे यांनाच धमकावत आपली मुजोरी कायम ठेवली. तसेच पाणी घेऊन आलेला टँकरही त्यांच्या घरापर्यंत जाऊ दिला नाही. त्यामुळे वानखेडे यांनी पोलीस ठाणे गाठून कंत्राटदारविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. असाच त्रास अनेकांना सहन करावा लागत असल्याने मुजोर कंत्राटदारावर कारवाई करण्याची गरज आहे.पेट्रोलपेक्षा पाणी महागलेपाणीटंचाईच्या काळात पाण्यासाठी वाट्टेल ते अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. सकाळपासून नागरिक सार्वजनिक नळांवर, विहिरीवर व हातपंपावर गर्दी करून पाण्यासाठी धडपडतांना दिसून येत आहे. पाण्याची वाहतुक करण्यासाठी चक्क दोनचाकी व चारचाकी वाहनांचाही वापर होत आहे. त्यामुळे नागरिकांना परराष्ट्रातील पेट्रोल मिळणे सहज शक्य आहे. पण, पाणी मिळणे कठीण झाल्याने नागरिकांना पाणी आणण्याकरिता पेट्रोलची वाहने वापरावी लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई