शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

पाण्याचा भडका; टँकरसाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:56 IST

शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे.

ठळक मुद्देपालिकेचे नियोजन कोलमडले : दहा दिवसांपासून कोरड, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. सद्यस्थितीत नागरिकांना दहा दिवसांपासून पाणी मिळाले नसून नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे.शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. शहरात सध्या सिमेंटीकरण, पाणीपुरवठा पाईपलाईन आणि भुयारी गटार योजना यामुळे शहरातील रस्ते पोखरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेत समन्वयाचा अभाव असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बांधकाम नळजोडणी वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठा खंडित होत असून पाण्याचाही अपव्यय होत आहे. परिणामी, नागरिकांच्या घशाला कोरड पडत आहे. पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात पालिका असमर्थ ठरल्याने दहा दिवसांपासून नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. शहरातील टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना केवळ तीन टँकरद्वारेच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत पाणी मिळत नसल्याने खासगी टँकरचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी नागरिकांना पाचशे ते हजार रुपये मोजावे लागत आहे. नागरिकांना काम सोडून पाण्याची सोय करण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने शहरातील पाणीकोंडी आणखीच तीव्र होण्याची शक्यता बळावली आहे.पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी थाटली दुकानदारीशहरातील पाणीटंचाई फायदा उचलत अनेकांनी पाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचा व्यवसायच थाटला आहे. यात नगरपालिकेतील काही आजी-माजी नगरसेवकांसह कर्मचारीही सहभागी आहे. त्यांनी स्वत: चे टँकर तयार करुन शहरात पाणीपुरवठा सुरु केला आहे. यांच्या सपन्नतेसाठी तर पालिका अतिरिक्त टँकरव्दारे पाणीपुरवठा करणे टाळत नाही ना? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.शहरात जवळपास २० ते २५ टँकर असून दररोज एक टँकर दहा ते पंधरा ट्रीप मारताना दिसत आहे. शहरालगतच्या शेतकºयांच्या विहिरीवरुन दोनशे रुपयात भरुन घेतलेला टँकर नागरिकांना १ हजार ते १ हजार २०० रुपयांत दिला जात आहे. यावरून टँकरचालक पाण्यासारखा पैसा लुटत आहे. यावर पालिकेने नियंत्रण आणण्याची गरज आहे.घरगुती बोअरवेलचे पाणी विकण्याकरिता नगरपालिका किंवा ग्रामपंचायतची परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही आर्वी मार्गावरील पंजाब कॉलनी परिसरातील एका गृहस्थामार्फत बिनदिक्कतपणे टँकरव्दारे पाण्याची विक्री सुरु आहे. लहान टँकर ५०० रुपये तर मोठा १ हजार रुपयात विकल्या जात आहे. पहाटेपासून तर रात्री उशीरापर्यंत पाणी विक्री सुरु असतानाही ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष आहे.मागील दहा दिवसांपासून नळ आले नसल्याने पाणी टँकरची मागणी वाढली आहे. कोणत्याही टँकरचालकाला फोन केला तर तत्काळ टँकर उपलब्ध होत नाही. एका दिवसाचे ‘वेटिंग’ असल्याचे सांगतात. तर काही जास्त पैसे दिल्यावर लगेच पाणी पोहोचवितात. अशी मनमर्जी सध्या शहरात सुरू असून नागरिकांची होरपळ होत आहे.कंत्राटदाराविरुद्ध पोलिसात तक्रारशहरात दहा दिवसांपासून नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असतानाही बॅचलर रोडलगतच्या राधानगरात भुयारी गटार योजनेच्या कामादरम्यान प्रशांत वानखेडे यांच्या घरची नळजोडणी तोडली. आज दहाव्या दिवशी नळ आले पण, जोडणी फुटल्याने त्यांना पाणी मिळाले नाही. नळजोडणी तोडल्याने कंत्राटदाराला विचारपूस केली असता त्याने वानखेडे यांनाच धमकावत आपली मुजोरी कायम ठेवली. तसेच पाणी घेऊन आलेला टँकरही त्यांच्या घरापर्यंत जाऊ दिला नाही. त्यामुळे वानखेडे यांनी पोलीस ठाणे गाठून कंत्राटदारविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. असाच त्रास अनेकांना सहन करावा लागत असल्याने मुजोर कंत्राटदारावर कारवाई करण्याची गरज आहे.पेट्रोलपेक्षा पाणी महागलेपाणीटंचाईच्या काळात पाण्यासाठी वाट्टेल ते अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. सकाळपासून नागरिक सार्वजनिक नळांवर, विहिरीवर व हातपंपावर गर्दी करून पाण्यासाठी धडपडतांना दिसून येत आहे. पाण्याची वाहतुक करण्यासाठी चक्क दोनचाकी व चारचाकी वाहनांचाही वापर होत आहे. त्यामुळे नागरिकांना परराष्ट्रातील पेट्रोल मिळणे सहज शक्य आहे. पण, पाणी मिळणे कठीण झाल्याने नागरिकांना पाणी आणण्याकरिता पेट्रोलची वाहने वापरावी लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई