शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

पाण्याचा भडका; टँकरसाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:56 IST

शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे.

ठळक मुद्देपालिकेचे नियोजन कोलमडले : दहा दिवसांपासून कोरड, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. सद्यस्थितीत नागरिकांना दहा दिवसांपासून पाणी मिळाले नसून नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे.शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. शहरात सध्या सिमेंटीकरण, पाणीपुरवठा पाईपलाईन आणि भुयारी गटार योजना यामुळे शहरातील रस्ते पोखरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेत समन्वयाचा अभाव असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बांधकाम नळजोडणी वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठा खंडित होत असून पाण्याचाही अपव्यय होत आहे. परिणामी, नागरिकांच्या घशाला कोरड पडत आहे. पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात पालिका असमर्थ ठरल्याने दहा दिवसांपासून नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. शहरातील टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना केवळ तीन टँकरद्वारेच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत पाणी मिळत नसल्याने खासगी टँकरचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी नागरिकांना पाचशे ते हजार रुपये मोजावे लागत आहे. नागरिकांना काम सोडून पाण्याची सोय करण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने शहरातील पाणीकोंडी आणखीच तीव्र होण्याची शक्यता बळावली आहे.पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी थाटली दुकानदारीशहरातील पाणीटंचाई फायदा उचलत अनेकांनी पाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचा व्यवसायच थाटला आहे. यात नगरपालिकेतील काही आजी-माजी नगरसेवकांसह कर्मचारीही सहभागी आहे. त्यांनी स्वत: चे टँकर तयार करुन शहरात पाणीपुरवठा सुरु केला आहे. यांच्या सपन्नतेसाठी तर पालिका अतिरिक्त टँकरव्दारे पाणीपुरवठा करणे टाळत नाही ना? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.शहरात जवळपास २० ते २५ टँकर असून दररोज एक टँकर दहा ते पंधरा ट्रीप मारताना दिसत आहे. शहरालगतच्या शेतकºयांच्या विहिरीवरुन दोनशे रुपयात भरुन घेतलेला टँकर नागरिकांना १ हजार ते १ हजार २०० रुपयांत दिला जात आहे. यावरून टँकरचालक पाण्यासारखा पैसा लुटत आहे. यावर पालिकेने नियंत्रण आणण्याची गरज आहे.घरगुती बोअरवेलचे पाणी विकण्याकरिता नगरपालिका किंवा ग्रामपंचायतची परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही आर्वी मार्गावरील पंजाब कॉलनी परिसरातील एका गृहस्थामार्फत बिनदिक्कतपणे टँकरव्दारे पाण्याची विक्री सुरु आहे. लहान टँकर ५०० रुपये तर मोठा १ हजार रुपयात विकल्या जात आहे. पहाटेपासून तर रात्री उशीरापर्यंत पाणी विक्री सुरु असतानाही ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष आहे.मागील दहा दिवसांपासून नळ आले नसल्याने पाणी टँकरची मागणी वाढली आहे. कोणत्याही टँकरचालकाला फोन केला तर तत्काळ टँकर उपलब्ध होत नाही. एका दिवसाचे ‘वेटिंग’ असल्याचे सांगतात. तर काही जास्त पैसे दिल्यावर लगेच पाणी पोहोचवितात. अशी मनमर्जी सध्या शहरात सुरू असून नागरिकांची होरपळ होत आहे.कंत्राटदाराविरुद्ध पोलिसात तक्रारशहरात दहा दिवसांपासून नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असतानाही बॅचलर रोडलगतच्या राधानगरात भुयारी गटार योजनेच्या कामादरम्यान प्रशांत वानखेडे यांच्या घरची नळजोडणी तोडली. आज दहाव्या दिवशी नळ आले पण, जोडणी फुटल्याने त्यांना पाणी मिळाले नाही. नळजोडणी तोडल्याने कंत्राटदाराला विचारपूस केली असता त्याने वानखेडे यांनाच धमकावत आपली मुजोरी कायम ठेवली. तसेच पाणी घेऊन आलेला टँकरही त्यांच्या घरापर्यंत जाऊ दिला नाही. त्यामुळे वानखेडे यांनी पोलीस ठाणे गाठून कंत्राटदारविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. असाच त्रास अनेकांना सहन करावा लागत असल्याने मुजोर कंत्राटदारावर कारवाई करण्याची गरज आहे.पेट्रोलपेक्षा पाणी महागलेपाणीटंचाईच्या काळात पाण्यासाठी वाट्टेल ते अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. सकाळपासून नागरिक सार्वजनिक नळांवर, विहिरीवर व हातपंपावर गर्दी करून पाण्यासाठी धडपडतांना दिसून येत आहे. पाण्याची वाहतुक करण्यासाठी चक्क दोनचाकी व चारचाकी वाहनांचाही वापर होत आहे. त्यामुळे नागरिकांना परराष्ट्रातील पेट्रोल मिळणे सहज शक्य आहे. पण, पाणी मिळणे कठीण झाल्याने नागरिकांना पाणी आणण्याकरिता पेट्रोलची वाहने वापरावी लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई