शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

अतिवृष्टी नुकसानाच्या आर्थिक मदतीचा फुसका बार; शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:35 IST

हवाय ३६.९१ कोटींचा निधी : ४० हजार शेतकऱ्यांना दिवाळीनंतरही प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सुरुवातीला हुलकावणी दिलेल्या पावसाने जून, जुलै महिन्यात कहर केला. जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी नोंदविण्यात आली होती. नुकसानग्रस्त ४० हजार शेतकऱ्यांसाठी ३६.९१ कोटींच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने यास मंजुरी देत दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासनही दिले होते. मात्र दिवाळी संपूनही खात्यात निधी न जमा झाल्याने शासनाचा आर्थिक मदतीचा बार फुसका ठरल्याची प्रचिती शेतकऱ्यांना आली असून दिवाळीनंतरही नुकसानभरपाईची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्याला गेल्या दोन-तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करावा लागतो आहे. यंदाही अस्मानी संकटाने शेतकऱ्यांना सोडले नाही. सुरुवातीला हुलकावणी देणाऱ्या पावसाने नंतरच्या काळात जोरदार हजेरी लावली. यात जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. यात ६६२ गावांतील ४० हजार ८६३ शेतकऱ्यांचे शेतपीक बाधित झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला होता. मधल्या काळात पावसाने विसावा घेतला खरा, मात्र ऐन काढणीच्या वेळेला परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेल्या घासावर पावसाने पाणी फिरविले. 

शासनाने अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना मदतीच्या घोषणेने किमान दिवाळी साजरी होणार, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा बाळगली होती. मात्र शासनाची ही घोषणा फुसका बार निघाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने आचारसंहितेअभावी निधीला खोडा बसला. निवडणूक होईपर्यंत तसेच नवे सरकार स्थापन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाला निधी उपलब्ध होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानाच्या निधीचा मार्ग खडतर झाला असल्याचे दिसून येत आहे. 

तालुकास्तरीय निधीची आवश्यकता अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे जुलै महिन्यात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी वर्धा तालुक्याला १ कोटी ३१ लाख ५५ हजार, सेलू तालुक्याला ५ कोटी ८१ लाख ८० हजार, देवळी तालुक्याला २ कोटी ५६ लाख ३७ हजार, आर्वी तालुक्याला १८ लाख ७५ हजार, कारंजा तालुक्याला ३ कोटी ९५ लाख ८८ हजार, हिंगणघाट तालुक्याला १८ कोटी ६७ लाख १७ हजार, समुद्रपूर तालुक्याला ४ कोटी ४० लाख २२ हजार रुपये निधीची आवश्यकता आहे.

अतिवृष्टीत बाधित झालेले क्षेत्र वर्धा                       ९६३.२९ हेक्टर          सेलू                       ४२७२.३६ हेक्टर देवळी                    १८८५.११ हेक्टर आर्वी                      ११३५.६० हेक्टर कारंजा                    २९१०.२५ हेक्टर हिंगणघाट                १३७२७.५५ हेक्टर समुद्रपूर                   ३२३६.९७ हेक्टर

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा