शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पूर व वादळाचा तडाखा

By admin | Updated: July 23, 2014 23:46 IST

वादळी पावसाचा तालुक्यातील सर्व गावांना फटका बसला़ यात मोठे नुकसान झाले़ बोरगाव-आलोडा, सरुळ-वायगाव तसेच देवळी ते डिगडोह, नांदोरा व मुरदगाव या पुलावरील वाहतूक यशोदा

यशोदा नदीच्या पुरामुळे वाहतूक ठप्प; घरांची पडझड, शेतीही खरडलीदेवळी - वादळी पावसाचा तालुक्यातील सर्व गावांना फटका बसला़ यात मोठे नुकसान झाले़ बोरगाव-आलोडा, सरुळ-वायगाव तसेच देवळी ते डिगडोह, नांदोरा व मुरदगाव या पुलावरील वाहतूक यशोदा नदीच्या पुरामुळे बुधवारी दुपारपर्यंत बंद होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ नदी व नाल्यांचे पाणी शेतात गेल्याने शेतांना तलावाचे स्वरुप आले़ पुरामुळे शेते खरडून गेली व पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन बियाणे जमिनीत सडले तर कपाशीचे पीक पूर्णत: पाण्याखाली आल्याने नुकसान झाले. झाडे पडून घरांची पडझड झाली. बुधवारी सकाळपर्यंत १३१ मिमी पावसाची नोंद झाली़तीन तालुक्यांत दोन दिवस वीज गुल; अनेक मार्ग बंदआष्टी (श़) - सततच्या पावसामुळे आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील वीज मंगळवार रात्रीपासून बंद होती़ यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते़ कारंजा येथील वीज पुरवठा पहाटे ४ वाजता तर आष्टीची वीज रात्री १ वाजेपासून बंद होती़ तळेगाव ते आष्टी मार्गावर झाडे पडल्याने रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत वाहतूक ठप्प होती़ जाम नदीच्या पुरामुळे आष्टी ते साहूर मार्ग बंद होता़ जाम, बाकळी व कड नदीला पूर आल्याने परिसरातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ सर्वाधिक नुकसान साहूर परिसरात झाल्याची नोंद आहे़मनसावळी ते कापसी मार्ग ठप्पहिंगणघाट - संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले ठप्प झाली़ २४ तासांत तालुक्यात ११४़४० मि.मी. तर एकूण ४०१ मिमी पाऊस झाला़ पावसामुळे वर्धा, यशोदा, वणा, पोथरा, लाल नाला आदींसह नाले दुथड्या वाहत आहे़ यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे मनसावळी ते कापसी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती़ संततधार पावसामुळे शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयातील उपस्थिती रोडावली व बाजारपेठाही ओस होत्या़ तालुक्यात ९३ गावांची पडझडसमुद्रपूर - तुडूंब भरलेल्या लाल नाला धरणाची ५ दारे खुले करण्यात आली़ पोथरा धरण ओव्हरफ्लो झाले़ बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तालुक्यात १२७ मिमी तर एकूण ३९१.३ मिमी पावसाची नोंद झाली़ वाघाडी नदीच्या पुलावरून पाणी असल्याने वर्धा-समुद्रपूर मार्ग सकाळी ४ तास बंद होता. मार्डा येथे १० कुटुंबांना प्राथमिक शाळेत हलविण्याची तयारी होती; पण पाऊस थांबल्याने प्रक्रिया रोखली़ डोंगरगाव, आसोला व कोरा परिसरात काही गावांना सतर्कतेचा इशारा दिला़ वाघाडी नदीचे पाणी शेतांत पाणी शिरल्यासने पिकांचे नुकसान झाले. चारमंडळ येथे ५० घरांचे अंशत: तर अंतरगाव, घोरपड, चापापूर, वानरचुआ, सावंगी, लोखंडी, वाघेडा, सायगव्हान, धोंडगाव, समुद्रपूर, वायगाव (ह.), रेणकापूर, निंभा, बोडखा, मुरादपूर, पाइकमारी आदी गावांतील एकूण ४३ घरांची अंशत: पडझड झाली़ कारंजा तालुक्यात १९३ घरांची पडझडतालुक्यात १९३ घरांची अंशत: पडझड झाली़ यात कारंजा मंडळात ५६, सारवाडी ४९, ठाणेगाव ३३, कन्नमवारग्राम ४५ घरांची पडझड झाली़ यात ५ लाखांचे नुकसान झाले़ तहसीलदार बालपांडे यांनी बिहाडी, वाघेडा, काकडा, सेलगाव (ल़) गावांना भेटी देत आढावा घेतला़ ६८ गावांतील शेतांना फटका बसला़ बांध फुटल्याने शेती खरडली़ मंगळवारी सायंकाळी १७ टक्के असलेला खैरी धरणाचा जलसाठा बुधवारी दुपारी ९० टक्क्यांवर पोहोचला़