शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:43 PM

सैनिक परिवाराच्या सहाय्यासाठी कायम प्रशासन आणि नागरिक तत्पर असले तर सैनिक देशाच्या रक्षणासाठी निश्चितपणे कर्तव्य बजावू शकतो. ही जाणीव ठेवून प्रशासन सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणीत सहाय्य करण्यासाठी कायम तत्पर असेल.

ठळक मुद्देसंजय दैने : प्रशासन कायम सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सैनिक परिवाराच्या सहाय्यासाठी कायम प्रशासन आणि नागरिक तत्पर असले तर सैनिक देशाच्या रक्षणासाठी निश्चितपणे कर्तव्य बजावू शकतो. ही जाणीव ठेवून प्रशासन सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणीत सहाय्य करण्यासाठी कायम तत्पर असेल. कुटुंबीयांच्या सर्व छोट्या मोठ्या समस्या सोडवण्याचा १०० टक्के प्रयत्न करण्याची हमी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली.ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम मंगळवारी विकास भवन येथे पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, शिक्षणाधिकारी सिद्धार्थ मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रज्ञा डायगव्हाणे, यवतमाळचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला. ले. धनंजय सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ शिल्पा खरपकर, माजी सैनिक कल्याण अधिकारी कर्नल चित्तरंजन चावरे, डॉ सचिन पावडे आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजदिन निधी संकलन करताना उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी त्याचा वेळोवेळी आढावा घ्यायला हवा. अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे त्या जागी आलेल्या नवीन अधिकाºयांना उद्दिष्टाची कल्पना नसते. त्यामुळे वर्षातून दोन- तीनदा याबाबीचा आढावा घेतल्यास उद्दिष्ट लवकर पूर्ण होण्यास मदत होईल असे दैने यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना निखिल पिंगळे म्हणाले, सैनिक जाती-पातीच्या पठडीबाहेर जाऊन देशाच्या संरक्षणासाठी लढत असतात. स्वातंत्र्य लढ्यानंतरही आपला लढा सुरूच आहे. देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे काम आपले सैनिक सीमेवर परकीय शत्रूशी लढून पार पाडतात, तर देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. सीमेवर थेट बंदुकीची गोळी चालवण्याचे अधिकार सैनिकांना आहेत. मात्र येथे गोळी न चालवता शांतता कायम राखण्याचे काम पोलिसांना पार पडावे लागते. स्वराज्याची निर्मिती करणारे शिवाजी महाराज दुसºयांच्या घरी जन्माला यावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण देशाच्या संरक्षणासाठी शहिद होणाºया सैनिकांच्या माता पित्यानी प्रत्यक्ष शिवाजीला आणि राणी लक्ष्मीबाईला जन्म दिला आहे. त्यामुळे वीर माता आणि पित्याचे योगदान खूप मोठे आहे असे सांगून त्यांच्या सोबत असलेल नातं आणखी दृढ होण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पिंगळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रज्ञा डायगव्हाणे, धनंजय सदाफळ, डॉ सचिन पावडे, माजी कर्नल चित्तरंजन चावरे, सिद्धार्थ मेश्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ शिल्पा खरपकर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी वीर माता आणि पत्नींचा शाल श्रीफळ आणि साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच १२ वी मध्ये ९१ टक्के गुण मिळवणाºया तनिशा गौरखेडे या विद्यार्थिनींचा शाल,श्रीफळ आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांना ध्वज लावून निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन बालाजी शेंडगे यांनी केले तर आभार यशवंत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला माजी सैनिक, शहिद सैनिकांच्या वीर माता आणि वीर पत्नी उपस्थित होत्या.ध्वज निधी संकलनात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संघटना यांनी सहकार्य करावे असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी