शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:44 IST

सैनिक परिवाराच्या सहाय्यासाठी कायम प्रशासन आणि नागरिक तत्पर असले तर सैनिक देशाच्या रक्षणासाठी निश्चितपणे कर्तव्य बजावू शकतो. ही जाणीव ठेवून प्रशासन सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणीत सहाय्य करण्यासाठी कायम तत्पर असेल.

ठळक मुद्देसंजय दैने : प्रशासन कायम सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सैनिक परिवाराच्या सहाय्यासाठी कायम प्रशासन आणि नागरिक तत्पर असले तर सैनिक देशाच्या रक्षणासाठी निश्चितपणे कर्तव्य बजावू शकतो. ही जाणीव ठेवून प्रशासन सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणीत सहाय्य करण्यासाठी कायम तत्पर असेल. कुटुंबीयांच्या सर्व छोट्या मोठ्या समस्या सोडवण्याचा १०० टक्के प्रयत्न करण्याची हमी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली.ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम मंगळवारी विकास भवन येथे पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, शिक्षणाधिकारी सिद्धार्थ मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रज्ञा डायगव्हाणे, यवतमाळचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला. ले. धनंजय सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ शिल्पा खरपकर, माजी सैनिक कल्याण अधिकारी कर्नल चित्तरंजन चावरे, डॉ सचिन पावडे आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजदिन निधी संकलन करताना उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी त्याचा वेळोवेळी आढावा घ्यायला हवा. अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे त्या जागी आलेल्या नवीन अधिकाºयांना उद्दिष्टाची कल्पना नसते. त्यामुळे वर्षातून दोन- तीनदा याबाबीचा आढावा घेतल्यास उद्दिष्ट लवकर पूर्ण होण्यास मदत होईल असे दैने यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना निखिल पिंगळे म्हणाले, सैनिक जाती-पातीच्या पठडीबाहेर जाऊन देशाच्या संरक्षणासाठी लढत असतात. स्वातंत्र्य लढ्यानंतरही आपला लढा सुरूच आहे. देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे काम आपले सैनिक सीमेवर परकीय शत्रूशी लढून पार पाडतात, तर देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. सीमेवर थेट बंदुकीची गोळी चालवण्याचे अधिकार सैनिकांना आहेत. मात्र येथे गोळी न चालवता शांतता कायम राखण्याचे काम पोलिसांना पार पडावे लागते. स्वराज्याची निर्मिती करणारे शिवाजी महाराज दुसºयांच्या घरी जन्माला यावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण देशाच्या संरक्षणासाठी शहिद होणाºया सैनिकांच्या माता पित्यानी प्रत्यक्ष शिवाजीला आणि राणी लक्ष्मीबाईला जन्म दिला आहे. त्यामुळे वीर माता आणि पित्याचे योगदान खूप मोठे आहे असे सांगून त्यांच्या सोबत असलेल नातं आणखी दृढ होण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पिंगळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रज्ञा डायगव्हाणे, धनंजय सदाफळ, डॉ सचिन पावडे, माजी कर्नल चित्तरंजन चावरे, सिद्धार्थ मेश्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ शिल्पा खरपकर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी वीर माता आणि पत्नींचा शाल श्रीफळ आणि साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच १२ वी मध्ये ९१ टक्के गुण मिळवणाºया तनिशा गौरखेडे या विद्यार्थिनींचा शाल,श्रीफळ आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांना ध्वज लावून निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन बालाजी शेंडगे यांनी केले तर आभार यशवंत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला माजी सैनिक, शहिद सैनिकांच्या वीर माता आणि वीर पत्नी उपस्थित होत्या.ध्वज निधी संकलनात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संघटना यांनी सहकार्य करावे असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी