शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पाच दाम्पत्यांच्या काळजाचे तुकडे सुरक्षित परतले युद्धभूमीतून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला. त्यामुळे हे पाचही भावी डॉक्टर युक्रेन देशात अडकले. सुखरूप मायदेशी परतण्याची ओढ असलेल्या या पाचही भावी डॉक्टरांनी मोठे धाडस करून युक्रेनची बाॅर्डर पार केली. सेलूची जान्हवी ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच आपल्या मूळगावी परतली असली, तरी युद्ध पेटल्याने तिच्या मित्र-मैत्रिणींचे काय होणार? अशीच चिंता तिला अजूनही सतावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील पाच तरुण-तरुणी युक्रेन देशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. यात दोन तरुण, तर तीन तरुणींचा समावेश असून, रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध पेटल्याने हे पाचही भावी डॉक्टर युक्रेनमध्ये अडकले. त्यामुळे या पाचही भावी डॉक्टरांच्या कुटुंबीयांना त्यांची चिंता लागली असतानाच आता हे पाचही जण सुखरूप आपल्या मायदेशी परतले आहेत. तशी नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली असल्याचे सांगण्यात आले. वर्धा येथील लविशा अनिल वलिच्छा, हिंगणघाट येथील यश विनोद मोटवाणी, सेलू येथील जान्हवी राहुल त्रिवेदी, पुलगाव येथील प्रणय सुरेश ताजणे, तर समीरण चंद्रशेखर काळे हे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये होते. त्यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला. त्यामुळे हे पाचही भावी डॉक्टर युक्रेन देशात अडकले. सुखरूप मायदेशी परतण्याची ओढ असलेल्या या पाचही भावी डॉक्टरांनी मोठे धाडस करून युक्रेनची बाॅर्डर पार केली. सेलूची जान्हवी ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच आपल्या मूळगावी परतली असली, तरी युद्ध पेटल्याने तिच्या मित्र-मैत्रिणींचे काय होणार? अशीच चिंता तिला अजूनही सतावत आहे.

मोठा धोका पत्कारून पार केली युक्रेनची बाॅर्डर

वैद्यकीय शिक्षणासाठी मी युक्रेनमध्ये होतो. रशिया आणि युक्रेन या दोन देशांत अचानक युद्ध पेटल्याने युक्रेनमध्ये प्रत्येक क्षणाला परिस्थिती बदलत आहे. धोक्याची माहिती देणारे सायरन वाजला की सुरक्षित ठिकाणी पळा, मिळेल ते खाऊन पोट भरा, अशीच परिस्थिती येथे आहे. अशाही परिस्थितीत स्वत:ला सावरत आम्ही युक्रेनची बॉर्डर पार केली. कुटुंबियांनी दिलेला धीर महत्त्वाचा ठरला. - यश मोटवाणी, हिंगणघाट.

अचानक पेटलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये परिस्थिती विदारकच आहे. रोमानियाच्या दिशेने प्रवास करीत असताना बॉर्डरपूर्वी अचानक माझी प्रकृती बिघडली. कडाक्याच्या थंडीमुळे माझे पायच गोठले होते. त्यामुळे आपण तुरकीश नामक रेस्टॉरंटमध्ये आश्रय घेतला. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर आपण युक्रेन-रोमानियाची बाॅर्डर पार केली. त्यानंतर माझी सुखरूप घरवापसी झाली आहे.- समीरण काळे, पुलगाव.

युद्ध सुरू झाल्याने आम्हाला आपल्या मायदेशी परत जाण्याच्या सूचना मिळाल्या. पण येथील परिस्थिती वेळोवेळी बदलत असल्याने मोठा धाडस करूनच मिळेल त्या वाहनाने प्रवास करून युक्रेनची बॉर्डर पार कारावी लागली. युक्रेनची बॉर्डर पार करण्यासाठी सुरू केलेल्या प्रवासादरम्यान आमच्या वाहनावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा होता. तोच आमच्यासाठी सुरक्षा कवच ठरला.- प्रणय ताजणे, पुलगाव. 

ऑपरेशन गंगा

युद्धामुळे युक्रेन देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारच्या वतीने ऑपरेशन गंगा ही मोहीम राबविली जात आहे. याच विशेष मोहिमेचा वर्धा जिल्ह्यातील चारही भावी डॉक्टरांना वेळीच मायदेशी परतण्यासाठी फायदाच झाला आहे. आपला काळजाचा तुकडा सुखरूप घरी परतल्याने या भावी डॉक्टरांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी