शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

आधी पत्नीला दगडाने ठेचले, नंतर पतीनेही विष गटकले; दाम्पत्याच्या मृतदेहाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 12:01 IST

आंजी (मोठी) येथील घटना

आंजी (मोठी) : भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये पत्नीला दगडाने मारहाण करून तिची हत्या केली. त्यानंतर पतीनेही विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री आंजी (मोठी) येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये उघडकीस आली. या प्रकरणी खरांगणा (मोरांगणा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंदन ज्ञानेश्वर कांबळे (४५) व शीतल कुंदन कांबळे (४०) (रा. धुळवा) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. कांबळे दाम्पत्य काही वर्षांपासून आंजी (मोठी) येथे वॉर्ड क्रमांक ४ मध्ये भाड्याने राहत होते. बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या घराचे दार उघडले नसल्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत त्यांच्या भावाला कळविले. भावाने लगेच पोलिस चौकीत माहिती दिली असता, पोलिसांनी रात्री ८ वाजता घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने घराचे दार उघडल्यावर पती-पत्नी मृतावस्थेत आढळले. यानंतर खरांगण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर हे सुद्धा पूर्ण यंत्रणेसह पोहोचले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पती कुंदन याने पत्नी शीतलची दगडाने मारहाण करत हत्या करून स्वत: विष पिऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. यावेळी ठसे तज्ज्ञांसह प्रयोगशाळा तज्ज्ञांचाही चमू दाखल झाला होता. या प्रकरणी खरांगणा (मोरांगणा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

पती-पत्नीच्या वादातून घडला थरार

सायंकाळी सात वाजले तरीही घराचे दार उघडले नसल्याने शेजाऱ्यांनी मृत कुंदनचा भाऊ संजय यांना माहिती दिली. तेही आंजीतच राहत असल्याने त्यांनी तत्काळ घर गाठले. घराचे दार वाजवून दोघांनाही आवाज दिला असता, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिस चौकीला कळविले असता, पोलिस कर्मचाऱ्यांनी येऊन सळाखीच्या सहाय्याने घराचे दार उघडले. तेव्हा घरातील बेडरूमध्ये दोघांचेही मृतदेह आढळले. यावेळी कुंदनचा मृतदेह दिवाणवर झोपलेल्या अवस्थेत तर शीतलचा मृतदेह जमिनीवरील गादीवर आढळला. तिच्या डोक्यातून रक्त निघाल्याचे दिसले. तसेच बाजूला रक्ताने माखलेला एक दगडही मिळाला. यासोबतच त्या खोलीमध्ये मोबाइलचे बिल आणि सीडीआरची प्रत दिसून आली. यावरून पोलिसांनी पती-पत्नीच्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला असून, परिसरातही तीच चर्चा आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गाेकुळसिंग पाटील, ठाणेदार संतोष शेगावकर, सूर्यवंशी, विनोद सानप, दीपक जाधव व अमर हजारे उपस्थित होते.

दोन्ही मुले मामाच्या गावी गेली, आई-वडिलांनी राहत्या घरातच जीवनयात्रा संपविली!

या दाम्पत्याला १३ वर्षांची मुलगी व ९ वर्षांचा मुलगा आहे. मुले मैत्री आणि सम्राट हे भाऊ-बहीण चार-पाच दिवसांपूर्वी धामनगाव (वाठोडा) येथे आपल्या मामाच्या गावी गेले होते. त्यामुळे घरात पती-पत्नी हे दोघेच होते. वडिलांनी आईची हत्या करून स्वत:ही जीवनायात्रा संपविल्याने आता दोन्ही मुले आई-वडिलांअभावी पोरकी झाली आहेत. त्यांच्यावर मोठे संकट कोसळले असून, त्यांनी टाहो फोडला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा