रात्री लागलेल्या आगीत दोन घरांची राखरांगोळी

By Admin | Updated: February 6, 2016 02:17 IST2016-02-06T02:17:25+5:302016-02-06T02:17:25+5:30

नजीकच्या नरसिंगपूर येथे बुधवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत दोन घरांची राखरांगोळी झाली. आगीत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

The fire that took place in the night, | रात्री लागलेल्या आगीत दोन घरांची राखरांगोळी

रात्री लागलेल्या आगीत दोन घरांची राखरांगोळी

दीड लाखांचे नुकसान : दोन्ही संसार आले उघड्यावर
आष्टी (श) : नजीकच्या नरसिंगपूर येथे बुधवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत दोन घरांची राखरांगोळी झाली. आगीत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमुळे दोन कुटुंबीयांवर उघड्यावर संसार थाटण्याची वेळ आली आहे.
गणेश पिटेकर, गणेश धोत्रे यांच्या मालकीची ही घरे होती. या घरांना बुधवारी रात्री अचानक आग लागली. घरांना आग लागल्याचे कळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठत आग विझविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू केले. परंतु आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही. मध्यरात्रीनंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. तोपर्यंत दोन्ही घरांची राखरांगोळी झाली होती. आगीत घरावरील कोणतेही साहित्य सुस्थितीत राहिले नाही. आगीमुळे गणेश पिटेकर, गणेश धोत्रे या दोन्ही कुटुंबीयांचा अन्न, वस्त्र, निवारा हिरावला गेला असून, उघड्यावर संसार थाटण्याची वेळ आली आली आहे. घटनास्थळी तलाठी घाडगे यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. आगीत प्रत्येक घराचे सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद त्यांनी घेतली. दोन्ही कुटुंबांना आर्थिक साह्य देण्याची मागणी अनिल धोत्रे, रामदास चरडे यांनी केली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The fire that took place in the night,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.