अग्नितांडव; पाच दुकानांची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 10:14 PM2018-11-08T22:14:58+5:302018-11-08T22:15:23+5:30

शहरात लक्ष्मीपुजन आटोपून दीपोत्सवाचा धुमधडाका सुरु होता. अख्खं शहर या आनंदोत्सवात रममान झाले असताना अनाचक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत हाह:कार माजला. एका पाठोपाठ पाच दुकानांना आगीने कवेत घेत नजीकच्या दोन घरांनाही झळ पोहचली.

Fire; Five shops of Rakharangoli | अग्नितांडव; पाच दुकानांची राखरांगोळी

अग्नितांडव; पाच दुकानांची राखरांगोळी

Next
ठळक मुद्देदीपोत्सवाच्या आनंदावर विरजन : दोन घरांना आगीची झळ; कोट्यवधीच्या नुकसानीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शहरात लक्ष्मीपुजन आटोपून दीपोत्सवाचा धुमधडाका सुरु होता. अख्खं शहर या आनंदोत्सवात रममान झाले असताना अनाचक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत हाह:कार माजला. एका पाठोपाठ पाच दुकानांना आगीने कवेत घेत नजीकच्या दोन घरांनाही झळ पोहचली. आगीचे लोळ पाहून नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत बचावकार्य सुरु केले. बुधवारी रात्री ९.४० वाजता घडलेल्या या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधीच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे.
मुख्य बाजार चौकातील बोहरा समाजाच्या व्यापाऱ्यांची मोठी प्रतिष्ठाने असून यातील पाच हार्डवेअरला रात्री ९.४० वाजता अनाचक आग लागली. आगीमुळे शहरात पडलेला लख्ख प्रकाश पाहून सर्वत्र खळबळ उडाली होती. तब्बल तीनतास चाललेल्या या अग्नितांडवामध्ये पाचही दुकानाची राखरांगोळी झाली तर दोन घरांचेही नुकसान झाले आहे. या बाजारपेठेतील दुकानांमध्ये असलेले फटाके तसेच दुकानांमागील घरातील गॅस सिलिंडर व महिलांना सुरक्षीतपणे बाहेर काढण्यासाठी पोलिसांसह समाजसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली. या भीषण आगीत सैफी हार्डवेअर्स हकीमी हार्डवेअर्स, सैफी मशनरीज, भामल ट्रेडर्स, मोईजुद्दीन फकु्रद्दीन या प्रतिष्ठांमधील साहित्य जळून राख झाले. आगीचे कारण अद्यापही कळू शकले नाही.

तीन तासानंतर आगीवर नियंत्रण
स्थानिक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत बोहरा समाजातील व्यापाºयांच्या प्रतिष्ठानाला बुधवारी ९.४० वाजता अचानक आग लागली. आगीचे लोळ उठताना दिसताच नागरिकांनी दीपोत्सवाचा आनंद बाजुला ठेऊन आगीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी पाच दुकाने आगीत धुमसत होती. तसेच या आगीने बोहरा गल्लीतील दोन घरांनाही लक्ष केले होते. पोलिसांसह, समाजसेवक व नागरिकांनी आपापल्यापरीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे पुलगाव कॅम्प, नगर परिषद वर्धा, नगर परिषद आर्वी व नगर परिषद चांदुर (रेल्वे) येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सर्वांच्या परिश्रमांती तीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. पण, तोपर्यंत पाचही दुकानातील साहित्य जळून राख झाले होते.
पोलिसांवर दगडफेक
आगीने बोहरागल्लीतील दोन घरांना लक्ष केले होते. त्यामुळे जीवितहानी होवू नये म्हणून पोलिसांनी सर्व दुकानाच्या मागील बोहरागल्लीत धाव घेतली. त्यानंतर पोलीस रेल्वे स्टेशन चौकात आले. परंतु काही युवकांचा गैरसमज झाल्याने त्यांनी पोलिसावर दगडफेक करून गाडी उलटविण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Fire; Five shops of Rakharangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग