शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

सायखेडा (ठाकरे) येथे वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:59 IST

नजीकच्या सायखेडा (ठाकरे) येथील शेत शिवारात रोही व जंगली श्वापदांचा प्रचंड हैदोस असून दररोज शेतातील तूर, कापूस, चणा व गव्हाच्या पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी सकाळी शेतात गेल्यावर दररोज नवीन नुकसान पाहून हताश नजरेने घरी येतात.

ठळक मुद्देपिकांची नासाडी : तक्रार व पंचनामे करून शेतकरी व वन विभागाचे कर्मचारी थकले

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : नजीकच्या सायखेडा (ठाकरे) येथील शेत शिवारात रोही व जंगली श्वापदांचा प्रचंड हैदोस असून दररोज शेतातील तूर, कापूस, चणा व गव्हाच्या पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी सकाळी शेतात गेल्यावर दररोज नवीन नुकसान पाहून हताश नजरेने घरी येतात. दररोजच्या नुकसानाचे किती प्रस्ताव वनविभागाकडे सादर करावेत हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तर दररोज किती शेतकºयांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करावेत हा प्रश्न वनविभागातील कर्मचाºयासमोर निर्माण झाला आहे.सायखेडा (ठाकरे) हे गाव वर्धा नदीकाठावर असून त्यांची शेतजमीन त्याच परिसरात आहे. धाखटी व उपजाऊ जमीन म्हणून हा भाग प्रसिध्द आहे. या जमिनीतील पिकांची उलंगवाडी लवकर होत नाही. यावर्षी इतर भागातील पिकांची उलंगवाडी होत असली तरी या परिसरातील पिके अजूनही भरीत आहेत. पिण्यासाठी पाणी व लपण्यासाठी नदी किनारी खोल दºया असल्याने जंगली श्वापदे व रोही या परिसरात स्थान मांडून आहे. दिवसभर लपून बसून रात्रीच्यावेळी ही श्वापदे पिकांवर ताव मारतात यात ते खाते कमी व नासाडी जास्त करतात. काही दिवसांपूर्वी बिबट्याने गाईवर हल्ला करून गार्इंना जखमी केल्याची घटना घडल्यापासून शेतकरी रात्री पिकांची रखवाली करण्यास जाण्यासाठी घाबरतात. सध्या कापूस, तूर, चणा व गहू ही पीके शेतात असून श्वापदे दररोज पिकांची नासाडी करीत आहे. या शिवारात फेरफटका मारला असता प्रत्येक शेतात पिकांचे नुकसान आढळते. या गावात ठाकरे कुटूंबियांची संख्या अधिक असून श्रीधर ठाकरे, गजानन ठाकरे, रमेश ठाकरे, सुरेश ठाकरे, भाष्कर ठाकरे, गणेश ठाकरे, रामरावजी महात्मे या शेतकºयांनी पिकांच्या नुकसाबद्दल व्यथा मांडून दररोज वनविभागाकडे किती प्रस्ताव सादर करावे. शेतीची कामे करावी की प्रस्तावासाठी कागदपत्रे गोळा करण्यात वेळ खर्ची घालावा असा प्रश्न उपस्थित केला. समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढल्याशिवाय शेतकºयांच्या व्यथा थांबणार नाहीत हे मात्र वास्तव आहे.कन्नमवारग्राम येथे पिकांची नासाडीकन्नमवारग्राम- येथील वृत्तपत्र विक्रेता श्रीकांत देविदास धुर्वे यांच्या मालकीचे शेत हेटी शिवारात आहे. हा भाग जंगलव्याप्त असल्यामुळे बारमाही या भागात वन्यप्राण्याच्या हैदोस आहे. शेतकºयांनी ज्वारी, कपाशी, तूर, सोयाबीन पेरले पण अचानकपणे दसºया पासून या परिसरात सर्वत्र वाघाचे दर्शन गावकºयांना होवू लागले. तर कुणाची गाय कुणाची म्हैस मारल्याचे दिसू लागले. त्यामुळे या गावातील व परिसरातील शेतकºयांनी जागली जाणे बंद केले. त्यामुळे डुकरे, रोही, हरण यांनी शेतकºयांची पºहाटी व तूर राजरोसपणे फस्त करणे सुरू केले. त्याच प्रमाणे याही शेतकºयाच्या जवळपास ५-६ एकर शेतातील तूर व कापूस पिकाचे नुकसान केले. त्यामुळे परिपक्व पिकाचे नुकसान जवळपास शेतकºयाचे ६०-७० हजार रूपयेच झाले आहे. वनविभागाला शेतकºयाने माहिती, कागदपत्रानिशी दिली आहे. तरी शेतकºयांनी वनविभागाने चौकशी करून योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. वन्यजीवाच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवFarmerशेतकरी