शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

सायखेडा (ठाकरे) येथे वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:59 IST

नजीकच्या सायखेडा (ठाकरे) येथील शेत शिवारात रोही व जंगली श्वापदांचा प्रचंड हैदोस असून दररोज शेतातील तूर, कापूस, चणा व गव्हाच्या पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी सकाळी शेतात गेल्यावर दररोज नवीन नुकसान पाहून हताश नजरेने घरी येतात.

ठळक मुद्देपिकांची नासाडी : तक्रार व पंचनामे करून शेतकरी व वन विभागाचे कर्मचारी थकले

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : नजीकच्या सायखेडा (ठाकरे) येथील शेत शिवारात रोही व जंगली श्वापदांचा प्रचंड हैदोस असून दररोज शेतातील तूर, कापूस, चणा व गव्हाच्या पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी सकाळी शेतात गेल्यावर दररोज नवीन नुकसान पाहून हताश नजरेने घरी येतात. दररोजच्या नुकसानाचे किती प्रस्ताव वनविभागाकडे सादर करावेत हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तर दररोज किती शेतकºयांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करावेत हा प्रश्न वनविभागातील कर्मचाºयासमोर निर्माण झाला आहे.सायखेडा (ठाकरे) हे गाव वर्धा नदीकाठावर असून त्यांची शेतजमीन त्याच परिसरात आहे. धाखटी व उपजाऊ जमीन म्हणून हा भाग प्रसिध्द आहे. या जमिनीतील पिकांची उलंगवाडी लवकर होत नाही. यावर्षी इतर भागातील पिकांची उलंगवाडी होत असली तरी या परिसरातील पिके अजूनही भरीत आहेत. पिण्यासाठी पाणी व लपण्यासाठी नदी किनारी खोल दºया असल्याने जंगली श्वापदे व रोही या परिसरात स्थान मांडून आहे. दिवसभर लपून बसून रात्रीच्यावेळी ही श्वापदे पिकांवर ताव मारतात यात ते खाते कमी व नासाडी जास्त करतात. काही दिवसांपूर्वी बिबट्याने गाईवर हल्ला करून गार्इंना जखमी केल्याची घटना घडल्यापासून शेतकरी रात्री पिकांची रखवाली करण्यास जाण्यासाठी घाबरतात. सध्या कापूस, तूर, चणा व गहू ही पीके शेतात असून श्वापदे दररोज पिकांची नासाडी करीत आहे. या शिवारात फेरफटका मारला असता प्रत्येक शेतात पिकांचे नुकसान आढळते. या गावात ठाकरे कुटूंबियांची संख्या अधिक असून श्रीधर ठाकरे, गजानन ठाकरे, रमेश ठाकरे, सुरेश ठाकरे, भाष्कर ठाकरे, गणेश ठाकरे, रामरावजी महात्मे या शेतकºयांनी पिकांच्या नुकसाबद्दल व्यथा मांडून दररोज वनविभागाकडे किती प्रस्ताव सादर करावे. शेतीची कामे करावी की प्रस्तावासाठी कागदपत्रे गोळा करण्यात वेळ खर्ची घालावा असा प्रश्न उपस्थित केला. समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढल्याशिवाय शेतकºयांच्या व्यथा थांबणार नाहीत हे मात्र वास्तव आहे.कन्नमवारग्राम येथे पिकांची नासाडीकन्नमवारग्राम- येथील वृत्तपत्र विक्रेता श्रीकांत देविदास धुर्वे यांच्या मालकीचे शेत हेटी शिवारात आहे. हा भाग जंगलव्याप्त असल्यामुळे बारमाही या भागात वन्यप्राण्याच्या हैदोस आहे. शेतकºयांनी ज्वारी, कपाशी, तूर, सोयाबीन पेरले पण अचानकपणे दसºया पासून या परिसरात सर्वत्र वाघाचे दर्शन गावकºयांना होवू लागले. तर कुणाची गाय कुणाची म्हैस मारल्याचे दिसू लागले. त्यामुळे या गावातील व परिसरातील शेतकºयांनी जागली जाणे बंद केले. त्यामुळे डुकरे, रोही, हरण यांनी शेतकºयांची पºहाटी व तूर राजरोसपणे फस्त करणे सुरू केले. त्याच प्रमाणे याही शेतकºयाच्या जवळपास ५-६ एकर शेतातील तूर व कापूस पिकाचे नुकसान केले. त्यामुळे परिपक्व पिकाचे नुकसान जवळपास शेतकºयाचे ६०-७० हजार रूपयेच झाले आहे. वनविभागाला शेतकºयाने माहिती, कागदपत्रानिशी दिली आहे. तरी शेतकºयांनी वनविभागाने चौकशी करून योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. वन्यजीवाच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवFarmerशेतकरी