शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 5:00 AM

सध्या खरीप हंगात अंतीम टप्प्यात आला असला तरी पीक विमा काढलेल्या एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देगत वर्षी दिली होती केवळ २८.३८ टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी पीक विमा एच्छिक असला तरी जिल्ह्यातील २७ हजार ७० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. खरीप हंगाम सुरू झाल्यावर सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर ३३७ शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत लेखी तक्रार विमा कंपनी व कृषी विभागाला केली. सध्या खरीप हंगात अंतीम टप्प्यात आला असला तरी पीक विमा काढलेल्या एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील वर्षी ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी केवळ २८.३८ टक्केच शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली होती. त्यामुळे विमा कंपनी मनमना करीत असल्याचे दिसते.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केल्या लेखी तक्रारीयंदाच्या वर्षी जिल्ह्यातील २७ हजार ७० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पीकविमा काढणाऱ्यांपैकी तब्बल ३३७ शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनी तसेच कृषी विभागाला तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी सादर करून किमान अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी एकाही शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत विमा कंपनीकडून देण्यात आलेली नाही.मागील वर्षी दिली ९ हजार ७८२ शेतकऱ्यांना भरपाईमागील वर्षी तब्बल ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे कवच घेतले होते. पण विमा कंपनीने ९ हजार ७८२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवित त्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली होती. विमा काढणाऱ्यांच्या तुलनेत हा टक्का २८.३८ होता.

टॅग्स :agricultureशेती