शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भागवत सप्ताहात शेतकरीकन्येचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

वर्ध्याच्या धोत्रा (रेल्वे) येथील परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांतीधाम येथे भागवत सप्ताहानिमित्त आयोजित रुख्मिणी स्वयंवर सोहळ्यात राऊत आणि भोयर कुटुंबातील विवाह सोहळा पार पडला. कृष्णगिरी परिवाराच्या एका निर्णयाने कर्जबाजारी होणारे दोन्ही शेतकरी कुटुंबीय आनंदाने गहिवरले.

ठळक मुद्देकृष्णगिरी परिवाराचा पुढाकार : भागवत सप्ताहाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्ध्याच्या धोत्रा येथील शेतकरी कुटुंबातील विवाह सोहळा ठरला. मात्र, दोन वर्षांपासून कर्जाच्या बोझ्यामुळे मुलीचा विवाह कसा करावा, हा प्रश्न पित्यापुढे होता. वर्ध्याच्या धोत्रा (रेल्वे) येथील परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांतीधाम येथे भागवत सप्ताहानिमित्त आयोजित रुख्मिणी स्वयंवर सोहळ्यात राऊत आणि भोयर कुटुंबातील विवाह सोहळा पार पडला. कृष्णगिरी परिवाराच्या एका निर्णयाने कर्जबाजारी होणारे दोन्ही शेतकरी कुटुंबीय आनंदाने गहिवरले.लग्न सोहळा म्हटले की, आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. हा क्षण आनंदात साजरा करण्यासाठी मुलीचे वडील अक्षरश: आयुष्यभर झिजतात, कर्जबाजारी होतात. वर्ध्याच्या धोत्रा येथील संतोष राऊत यांच्यावर अशीच वेळ आली होती. दोन वर्षांपूर्वी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज थकीत आहे. नापिकी, अशातच मुलीसाठी आलेला निरोप या विवंचनेत असताना काय करावे, हे वडिलांना सुचेनासे झाले होते. कृष्णगिरी धाममध्ये पोहोचले आणि प्रश्नाचे उत्तर सापडले. धोत्रा येथे सद्गुरू परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांती धाम आहे. येथे विमल गुल्हाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याच सोहळ्यात मुलीचे लग्न होईल का, असा प्रस्ताव मुलीच्या वडिलांनी मांडला. यावर ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव गुल्हाणे यांनी तत्काळ होकार दर्शविला. सर्व खर्च स्वीकारत केवळ मुलगा आणि मुलगी घेऊन या, असे सांगण्यात आले. लग्नाची तयारी सुरू झाली.नवरी सजली आणि भागवत सप्ताहाच्या मंडपात पोहोचली. संतोष राऊत यांची मुलगी संगीता आणि अमरावती जिल्ह्यातील एकलासपूर येथील विनायक भोयर यांचा मुलगा रवी हासुद्धा रुख्मिणी स्वयंवरात पोहोचला. रवी ‘कृष्ण’ आणि संगीता ‘रुक्मिणी’ अशापद्धतीने भागवत ऐकायला आलेली मंडळी वºहाडी झाले. याच सर्वांच्या साक्षीने दोघे विवाह बंधनात अडकलेत....तर उद्याचे चित्र नक्कीच बदलेल!सर्वत्र वर्षभर धार्मिक कार्यक्रम होतात. भागवत सप्ताहानिमित्ताने भगवंताने सांगितलेला मार्ग कथेतून सप्ताहात सांगितला जातो. पण, अशा पद्धतीने लग्न सोहळा पार पाडत कृष्णगिरी धामने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. इतरांनीही यापासून प्रेरणा घेतल्यास कोणत्याच मुलीचा बाप कर्जबाजारी होत मृत्यूला कवटाळणार नाही. हा संदेश सर्वत्र पोहोचला तर उद्याचे चित्र नक्कीच बदललेले असेल, यातही शंका नाही.

टॅग्स :marriageलग्न