शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतले शंभर कोटीवर कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:07 IST

Wardha News वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे १०० कोटीवर कर्ज घेतल्याची नोंद असून सर्वधिक समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी २० कोटी ८५ लाख ५७ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात १३९ अधिकृत सावकारांची शासनदफ्तरी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : आजही अनेक राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नसतो. त्यात अवैध सावकारी करणारे अनेक प्रकरणे यापूर्वीही जिल्ह्यात उघड झाले आहेत, या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यातील अधिकृत सावकारांमध्ये दरवर्षी भर पडत आहे. यंदा वर्षभरात जिल्ह्यात १३९ सावकारांची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे १०० कोटीवर कर्ज घेतल्याची नोंद असून सर्वधिक समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी २० कोटी ८५ लाख ५७ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. आज प्रत्येकाला या ना त्या कामानिमित्त कर्जाची गरज असते. त्यात जवळपास प्रत्येक गावांमध्ये बँकाही जाऊन पोहचल्या आहेत. त्यामुळे कर्जासाठी बॅँकाचे उंबरठे अनेकांनी झिजवले आहेत. मात्र, बॅँकांकडून सर्वच गरजवंतांना कर्ज वाटप केले जात नाही. शिवाय बँकेचे कर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यातच अनेकांची दमछाक होते. यासर्व बाबींमुळे आजही सावकारी पाश घट्टच असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या सावकारीत भर पडत आहे. जानेवारी ते डिसेंबर जिल्ह्यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे १३९ अधिकृत सावकारीसाठी प्रस्ताव पाठविले होते. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यात १३९ सावकारांकडून शेतकरी, शेतमजूर व गरजवंत कर्ज घेऊन हजारो जण सावकारी पाशात अडकले आहेत. बँकांकडून कर्ज मिळाले तर सावकाराची पायरी चढण्याची गरजच पडणार नाही. मात्र, बँकांकडून कर्ज नाकारल्याने अनेक जण सावकारी पाशात अडकत चालल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

असे आहेत व्याजदर

अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास तारणी कर्जासाठी नऊ टक्के, बिनतारी १२ टक्के, बिगरकृषी तारण कर्जासाठी १५ टक्के व बिगर कृषी विना तारणी कर्जासाठी १८ टक्के व्याजदर घेतला जातो. त्यामुळे सावकारी कर्ज घेणाऱ्यांना व्याजाची मोठी रक्कम अदा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

अधिकृत सावकारीसाठी निकष

अधिकृत सावकारींचा परवाना घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. या प्रस्तावात सर्वात महत्त्वाचे म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. तसेच ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्रही गरजेचे असते. अधिकृत सावकारीचा परवाना देताना प्रस्ताव सादर करण्याची वित्तीय स्थिती कशी आहे, याचा विचार केला जात नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी