शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

मरणाच्या वाटेवर आम्ही सरण रचितो; पायाखाली आमच्या मरण तुडवितो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:04 IST

शेतकऱ्यांची व्यथा : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धाडसाला सलाम

प्रफुल्ल लुंगे लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : पाठीवर १५ लिटरचा जहराचा डबा बांधून, पायाखाली मरण तुडवीत, अनेक भल्याभल्या संकटांना हुलकावण्या देत रामभरोसे जगणाऱ्या शेतकऱ्याला केवळ कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तळहातावर मरण घेऊन चालत राहावे लागते. हे चित्र एखाद्या एसीत राहणाऱ्या शहरी साहेबांनी खेड्यात येऊन पाहिले तर शेतकऱ्यांचा जीवनमरणाशी सुरू असलेला संघर्ष त्यांना अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याची ही व्यथा पाहून आपसूकच 'मरणाच्या वाटेवरती आम्ही सरण रचितो; पायाखाली आमच्या मृत्यू तुडवितो' ही शब्दरचना तोंडावर आल्याशिवाय राहत नाही.

कपाशी, सोयाबीनच्या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला. त्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. अन्यथा पिकाऐवजी हाती पालापाचोळा येण्याची शक्यता असते. कंबरभर पिकात जमिनीवर काय आहे, हे दिसत नसताना पाठीवर कीटकनाशकाचा पंप घेऊन फवारणी करण्याचे धाडस कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छातीवर दगड ठेवून शेतकरी करीत आहे. वाढलेल्या पिकामुळे जमीन दिसत नाही, मग जमिनीवर सरपटणारे विषारी प्राणी, साप, विंचू कसे दिसणार! तरीही पायाखाली मरण तुडवीत शेतकरी हे धोकादायक काम कसे करत असेल याचा विचार करायला कुणालाही वेळ नाही. चुकून दुर्दैवाने विषारी सापावर पाय पडला अन् दंश केला तर? ही कल्पनाही करणे शेतकऱ्यांच्या परिवाराला अत्यंत वेदनादायक ठरते. बायकापोरांना कधीतरी सुखाचे दिवस दाखवू, या भोळ्या आशेवर रात्रंदिवस मरणाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आता कुणावरही भरवसा राहिला नाही. कोणतेही राज्यकर्ते आले तरी शेतकऱ्याच्या पाचवीला दारिद्र्य पुजलेले आहे, हे मात्र खरे! 

हेच खरे शेतकऱ्याचे दुर्दैव कमरेपेक्षा जास्त वाढलेल्या पिकाची मशागत, फवारणी व इतर सर्व कामे जीव धोक्यात घालून शेतकऱ्याला करावी लागतात. शहरी लोकांना २४ तास वीजपुरवठा पाहिजे. शेतकऱ्यांना रात्रीचा वीजपुरवठा असतो. त्या अंधाऱ्या रात्री पिकात जीव धोक्यात घालून त्याला ओलीत करावे लागते. सरपटणारे प्राणी, हिंस्त्र प्राणी केव्हा जीवाचा लचका तोडतील, याचा नेम नसतो. शेतकरी रात्री शेतात गेल्यावर त्याची बायका, मुलं अस्वस्थ होऊन त्याला घरी येण्याची वाट पाहत असतात, खरंच त्यांना झोप लागत असेल का? त्याची कल्पना कुणीच करीत नाही. शेतात गेलेला नवरा किंवा बाप परत येईपर्यंत या सर्वांचा जीव भांड्यात पडलेला असतो. निर्दयी राज्यकर्त्यांना व शासनाला याबाबत चिंतन करायला व मार्ग काढायला वेळच नाही. एवढ्या परिश्रमाने पिकवलेल्या मालाला फुटाण्याच्या भावात विकावे लागते. तरी आमच्या शासन मायबापाला लाज वाटत नाही, हेच खरे शेतकऱ्याचे दुर्दैव आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र