शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मरणाच्या वाटेवर आम्ही सरण रचितो; पायाखाली आमच्या मरण तुडवितो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:04 IST

शेतकऱ्यांची व्यथा : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धाडसाला सलाम

प्रफुल्ल लुंगे लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : पाठीवर १५ लिटरचा जहराचा डबा बांधून, पायाखाली मरण तुडवीत, अनेक भल्याभल्या संकटांना हुलकावण्या देत रामभरोसे जगणाऱ्या शेतकऱ्याला केवळ कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तळहातावर मरण घेऊन चालत राहावे लागते. हे चित्र एखाद्या एसीत राहणाऱ्या शहरी साहेबांनी खेड्यात येऊन पाहिले तर शेतकऱ्यांचा जीवनमरणाशी सुरू असलेला संघर्ष त्यांना अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याची ही व्यथा पाहून आपसूकच 'मरणाच्या वाटेवरती आम्ही सरण रचितो; पायाखाली आमच्या मृत्यू तुडवितो' ही शब्दरचना तोंडावर आल्याशिवाय राहत नाही.

कपाशी, सोयाबीनच्या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला. त्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. अन्यथा पिकाऐवजी हाती पालापाचोळा येण्याची शक्यता असते. कंबरभर पिकात जमिनीवर काय आहे, हे दिसत नसताना पाठीवर कीटकनाशकाचा पंप घेऊन फवारणी करण्याचे धाडस कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छातीवर दगड ठेवून शेतकरी करीत आहे. वाढलेल्या पिकामुळे जमीन दिसत नाही, मग जमिनीवर सरपटणारे विषारी प्राणी, साप, विंचू कसे दिसणार! तरीही पायाखाली मरण तुडवीत शेतकरी हे धोकादायक काम कसे करत असेल याचा विचार करायला कुणालाही वेळ नाही. चुकून दुर्दैवाने विषारी सापावर पाय पडला अन् दंश केला तर? ही कल्पनाही करणे शेतकऱ्यांच्या परिवाराला अत्यंत वेदनादायक ठरते. बायकापोरांना कधीतरी सुखाचे दिवस दाखवू, या भोळ्या आशेवर रात्रंदिवस मरणाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आता कुणावरही भरवसा राहिला नाही. कोणतेही राज्यकर्ते आले तरी शेतकऱ्याच्या पाचवीला दारिद्र्य पुजलेले आहे, हे मात्र खरे! 

हेच खरे शेतकऱ्याचे दुर्दैव कमरेपेक्षा जास्त वाढलेल्या पिकाची मशागत, फवारणी व इतर सर्व कामे जीव धोक्यात घालून शेतकऱ्याला करावी लागतात. शहरी लोकांना २४ तास वीजपुरवठा पाहिजे. शेतकऱ्यांना रात्रीचा वीजपुरवठा असतो. त्या अंधाऱ्या रात्री पिकात जीव धोक्यात घालून त्याला ओलीत करावे लागते. सरपटणारे प्राणी, हिंस्त्र प्राणी केव्हा जीवाचा लचका तोडतील, याचा नेम नसतो. शेतकरी रात्री शेतात गेल्यावर त्याची बायका, मुलं अस्वस्थ होऊन त्याला घरी येण्याची वाट पाहत असतात, खरंच त्यांना झोप लागत असेल का? त्याची कल्पना कुणीच करीत नाही. शेतात गेलेला नवरा किंवा बाप परत येईपर्यंत या सर्वांचा जीव भांड्यात पडलेला असतो. निर्दयी राज्यकर्त्यांना व शासनाला याबाबत चिंतन करायला व मार्ग काढायला वेळच नाही. एवढ्या परिश्रमाने पिकवलेल्या मालाला फुटाण्याच्या भावात विकावे लागते. तरी आमच्या शासन मायबापाला लाज वाटत नाही, हेच खरे शेतकऱ्याचे दुर्दैव आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र