शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

शेतकऱ्यांनी तणनाशक फवारले, दीडशे एकरांतील सोयाबीन जळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:58 IST

कृषी विभाग बांधावर : आष्टीतील खडकी, किन्हाळा येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : तालुक्यातील खडकी व किन्हाळा या दोन गावांतील २६ शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये वाढलेल्या तणावर तणनाशकाची फवारणी केली. पण, आठवडाभरातच सोयाबीनचे पीक जळाले. यामुळे शेतकरी धास्तावले असून, त्यांनी कृषिमंत्र्याकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कृषी विभागाचे पथक दोन्ही गावांमध्ये दाखल झाले. पिकांची पाहणी करून तणनाशकाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठविले. आता याच्या अहवालाची शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही प्रतीक्षा आहे.

गेल्या महिनाभरापासून आष्टी तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केला आहे. सततच्या पावसामुळे खरिपातील पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर करून फवारणी सुरू केली. त्यामुळे खडकी व किन्हाळा येथील २६ शेतकऱ्यांनी 'क्युरॉन' नावाचे तणनाशक खडकी येथील कृषी सेवा केंद्रातून खरेदी करून त्याची फवारणी केली. फवारणीनंतर आठवडाभरानंतर शेतातील तण कायम राहून सोयाबीन जळाल्याचे निदर्शनास आले. या २६ शेतकऱ्यांची दीडशे एकरांतील सोयाबीन जळाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री, वर्धा लोकसभा प्रमुख सुमित वानखडे, उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा, तालुका कृषी अधिकारी आष्टी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या. याची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी देशमुख यांनी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी आणि मोहीम अधिकारी जिल्हा परिषद वर्धा या चौघांना तत्काळ जळालेल्या सोयाबीनची पाहणी करून नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना दिल्यात. आता प्रयोगशाळेमधील अहवाल प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन कशाने जळाली याचे निदान लावता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसानशेतकरी रोशन नागपुरे, संकेत नागपुरे, यशोदानंदन काबरा, मिलिंद उदापुरे, हिमांशू उदापुरे, मिलिंद मोरे, कुसुम पांडे, योगेश नागपुरे, मंदा शरद नागपुरे, सूरज कडू, शरद मोरे, सुरेंद्र नागपुरे, संगीता नागपुरे, अरविंद नागपुरे, पवन नागपुरे, आशा लांडगे, हेमंत ठाकरे, आशिष ठाकरे, प्रवीण ठाकरे, दिलीप इंगळे, किरण डोळस, प्रभाकर नागपुरे, शरद नागपुरे, संजय भिवापुरे, पुरुर्षोत्तम नागपुरे आणि प्रल्हाद डोळस या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, भरपाई देण्याची मागणी होत आहे.

"आम्ही शेतामध्ये तण वाढल्याने फवारणी केली. मात्र, हे तणनाशक सदोष असल्याने आमची सोयाबीन जळाली. अधिकाऱ्यांनी नमुने प्रयोगशाळेत पाठविले. अहवालाची वाट पाहणे सुरू आहे. आमचे आर्थिक उदरनिर्वाहाचे साधनच संपल्याने आता उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न पडला आहे. शासनाने तत्काळ आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे."- शुभम नागपुरे, शेतकरी खडकी.

"खडकी व किन्हाळा येथील मौजामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन जळाली तेथील नमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठविले आहे. कीटकनाशक आणि तणनाशक या दोन्हीचे नमुने घेतले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरविता येईल."- दिगंबर साळे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी (शहीद) 

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीFertilizerखतेFarmerशेतकरी