शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकरी कृषीपंप व वीजजोडणी पासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:33 IST

जिल्ह्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. एकही शेतकरी कृषी पंप वीजजोडणी पासून वंचित राहू नये, तसेच जिल्ह्यात सुरु असलेले अति उच्च दाब विद्युत प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना खासदार रामदास तडस यांनी महावितरण व महापारेषण आढावा बैठकीमध्ये दिले.

ठळक मुद्देरामदास तडस यांच्या आढावा बैठकीत सूचना : जिल्ह्यातील विद्युत प्रकल्प जलद गतीने पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. एकही शेतकरी कृषी पंप वीजजोडणी पासून वंचित राहू नये, तसेच जिल्ह्यात सुरु असलेले अति उच्च दाब विद्युत प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना खासदार रामदास तडस यांनी महावितरण व महापारेषण आढावा बैठकीमध्ये दिले.वर्धा येथील खासदार रामदास तडस यांच्या जनसंपर्क कार्यालयात महावितरण व महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये महापारेषणच्यावतीने वर्धा जिल्ह्यात चालू असलेल्या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात महापारेषणतर्फे सन २०१४-१५ ते २०१८-१९ पर्यंत १३२/३३ केव्ही उपकेंद्र, द्विपथ वाहिनी, २२० के.व्ही उपकेंद्र, नवीन वीज उपकेंद्र कामावर एकूण ११३.२७ कोटी रुपयांचे कामे पूर्ण झालेली असून ६७.२२ कोटी रुपयाचे कामे प्रगतीपथावर आहे. यामध्ये नवीन उपकेंद्र, नवीन वाहिन्या, द्विपथ वाहिनी, अतिरिक्त रोहित्र असल्याची माहिती महापारेषणच्या उपस्थित अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यातील महावितरणमार्फत २०१७-२०१८ मार्फत कृषी पंप वीज जोडणीकरिता २७६९ अर्ज प्राप्त झाले आहेत. २७६४ कृषी पंपांना उर्जीकर्ण करण्यात आले. तसेच मे २०१८ पर्यंत प्रलंबित कृषी पंपांची संख्या ३२४९ आहे. धडक सिंचन योजने अंतर्गत कृषी पंप विद्युत पुरवठा करण्याकरिता ५५९० चे उदिष्ठ पैकी अर्ज ४९०४ प्राप्त झाले व लाभार्थ्यांची संख्या ३८४३ आहे. रोहयो योजनेअंतर्गत कृषी पंप विद्युत पुरवठा करण्याकरिता ५३४ चे उदिष्ठ पैकी अर्ज ५२८ प्राप्त झाले व लाभार्थ्यांची संख्या ५२३ आहे. अटल सौर उर्जा कृषी पंपा करिता ५७० पंपाचे उदिष्ठ होते.त्यापैकी ७३७ अर्ज प्राप्त झाले व लाभार्थ्यांची संख्या ४८६ असल्याची माहीती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली. कारंजा तहसील मधील हेटीकुंडी येथे २२० केव्ही उपकेंद्र व वर्धा मेगा फूड पार्ककरिता ३३/११ केव्ही उपकेंद्राला मंजुरी प्रदान झाल्याची माहिती दिली. प्रत्येक गावामध्ये स्वतंत्र सौर कृषी वाहिन्यांची गरज आहे आणि त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे सूचना खा. तडस यांनी दिल्या. गावागावांत शेती पंपाला सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यासाठी तसेच एकही शेतकरी कृषी पंप विद्युत पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही याकरिता अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून नियोजन करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. शेतकºयांना सौर उर्जा कृषी पंप घेण्याकरिता व वीज ग्राहकांनी आधुनिकीकरणाचा मार्ग स्वीकारण्याकरिता प्रोत्साहित करावे अशा सूचना खासदार तडस यांनी केल्या. या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, नागपूर व वर्धा विभाग महापारेषणचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता मनीष खत्री, सहायक अभियंता दयानंद धारगावे, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय वाकडे, सहायक अभियंता राजेश बाकडे उपस्थित होते.