शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

फेडरेशनच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:11 IST

जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सीसीआयच्या सहा केंद्रावर कापसाची नाममात्र खरेदी झाली असली तरी फेडरेशनच्या केंद्रावर साधा एक क्विंटलही कापूस खरेदी झाला नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देकापूस खरेदीत बाजार समितींनी सीसीआयला टाकले मागे

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सीसीआयच्या सहा केंद्रावर कापसाची नाममात्र खरेदी झाली असली तरी फेडरेशनच्या केंद्रावर साधा एक क्विंटलही कापूस खरेदी झाला नसल्याचे वास्तव आहे. तर या दोन्ही शासकीय खरेदी केंद्रांना मागे सोडत जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींनी यंदाही मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केल्याची नोंद शासकीय यंत्रणेने घेतली आहे.मागील वर्षी आणि यंदा सुरूवातीला जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने चांगलेच थैमान घातले. यामुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भरही पडली. शिवाय पावसाने वेळीच दगा दिल्याने त्याचा फटकाही शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. अशा विदारक परिस्थितीला तोंड देत शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकाचे संगोपन करण्यासाठी जीवाचे राणच केले. परंतु, सध्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अतिशय अल्प दर कापसाला मिळत असल्याची ओरड शेतकºयांकडून होत आहे.जिल्ह्यात खरांगणा, वायगाव, देवळी, सेलू, सिंदी व हिंगणघाट येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्या केंद्रांवर यंदाच्या हंगामात १४ जानेवारीपर्यंत एकूण केवळ ५ हजार ७५६ क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. तर फेडरेशनच्या जाम आणि तळेगाव या दोन केंद्रावर अद्याप एकही क्विंटल कापसाची आवक झाली नसल्याचे सांगण्यात आले. सीसीआयकडून सध्या कापसाला प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये भाव दिल्या जात आहे, हे उल्लेखनिय.७ लाख ९४ हजार क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदीयंदाच्या हंगामात १४ आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७,९४,३८३ क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची नोंद शासकीय यंत्रणेने घेतली आहे. त्यात सीसीआच्या सहा केंद्रांवरील ५ हजार ७५६ तर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी झालेल्या ७ लाख ८८ हजार ६२७ क्विंटल कापसाचा समावेश आहे.कोरडवाहू शेतजमिनींवरील कापसाची झाली उलंगवाडीयंदा पावसाच्या अनियमिततेचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. त्यातून शेतकरी सावरत नाहीच तो गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशीवर दिसून आला. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या उपाययोजना यंदा कपाशी उत्पादकांसाठी फायद्याच्या ठरल्या. शिवाय वेळोवेळी पिकाची निगा घेतल्याने कपाशीच्या पिकाची बऱ्यापैकी वाढ झाली. सध्यास्थितीत बहूतांश कोरडवाहू शेतजमिनीवरील कपाशीच्या पिकाची उलंगवाडी झाल्याचे दिसून येते. शिवाय कपाशी उत्पादकांनी भाव वाढीच्या आशेवर पिकविलेला कापूस घरीच ठेवल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडेही कापूस कमी आला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत कापसाला शासकीय केंद्राच्या तुलनेत व्यापाऱ्यांकडून आधारभूत किंमतीपेक्षा जास्त भाव दिला जात होता. म्हणूनच शेतकरी शासकीय खरेदी केंद्राकडे गेला नाही. शिवाय व्यापारी झटपट कापसाचा चुकारा देत असल्याने व शासनाकडून चुकारा देण्यासाठी वेळ लागत असल्यानेही शेतकरी शासकीय खरेदी केंद्राकडे वळला नसल्याचे दिसून येते.- अ‍ॅड. सुधीर कोठारी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट.

टॅग्स :cottonकापूस