शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

शेतकरी धडकले तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

एक महिण्यांपासून पावसाने कहर केल्यामुळे पिकांचे अतोनात हाल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास जाण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्राथमिक सर्व्हेक्षण केले नाही. याविरोधात तालुका कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी उद्या येण्याचे आश्वासन दिल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.

ठळक मुद्देओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : एक महिण्यांपासून पावसाने कहर केल्यामुळे पिकांचे अतोनात हाल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास जाण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्राथमिक सर्व्हेक्षण केले नाही. याविरोधात तालुका कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी उद्या येण्याचे आश्वासन दिल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.माहे सप्टेंबर महिण्यात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामध्ये सोयाबीन, कपाशी, तुर, संत्रा, मोसंबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविणे क्रमप्राप्त होते. मात्र सप्टेंबर महिण्यात केवळ एका दिवसाच्या पावसाने शेतातील झालेल्या नुकसानीचा त्रोटक सर्व्हे पाठवून शासनाची दिशाभूल केली. हा अन्याय असुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. असा आरोप करीत सामाजीक कार्यकर्ते राजेश ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी सडलेले कपाशीचे बोंड, सोयाबीन तालुका कृषी अधिकारी यांच्या टेबलवर टाकले. याचा जाब विचारला यावेळी तालुका कृषी अधिकारी एम.जे.तोडकर यांनी शासनाचे आदेश आल्यावरच सर्व्हे केला जाईल असे सांगितले. त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी सतीश सांगळे यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधून माहीती दिली. त्यांनी उद्या अंतोरा व लहान आर्वी परिसरातील गावांना भेटी देण्याचे मान्य केले. यावेळी तहसिलदार आशीष वानखडे यांनाही शेतकऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश ठाकरे, बेलोरा सरपंच मिलींद जाणे, मानीकनगर येथील उपसरंपच देविदास पाथरे, डॉ.राजेंद्र जाने, नामदेव झामडे, गजानन भोरे, चेतन मोहोड, प्रशांत पांडे, अजय लोखंडे, मनोज आंबेकर, उमेश आंबेकर, हनुमंत कुरवाडे, आशिष वाघ यांच्यासह तालुक्यातील शेतकरी हजर होते. शासनाने पीक नुकसानीचे सर्व्हे करून तात्काळ आर्थीक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या महसूल यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी