शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीत शेती खरडून गेल्याने शेतकरी कुटुंब हवालदिल

By admin | Updated: August 22, 2015 02:18 IST

मोरांगणा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने खरडून निघाली.

खरांगणा (मो.) : मोरांगणा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने खरडून निघाली. परिणामी पिके नष्ट झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहे.तलाठी साजा क्र. ३० मधील शेतकरी सतीशलाल बालकराम बत्रा सर्व्हे नं. २४८/४ आराजी १.६२ हेक्टर, जितेंद्र सतीशलाल बत्रा सर्व्हे क्र. २४८/१ आराजी १.८८ हेक्टर आर व संतोषराणी बत्राा सर्व्हे क्र. २४८/४ आराजी १.७४ हे.आर. अशी या कुटुंबाची शेती आहे. यात कपाशी, तूर, सोयाबीन व ज्वारींची लागवड या कुटुंबीयांनी केली होती. पिके डौलदारपणे उभी असताना दोनवेळा झालेल्या अतिवृष्टीत सदर पिके पूर्णत: वाहून गेली. शेतात ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक कंबरडेच मोडले. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्तरेकडील वरच्या भागातून वर्धा-आर्वी राजमार्ग गेला आहे. या मार्गावर शेतकऱ्याच्या शेताजवळच रपटा बांधण्यात आला. त्यामुळे डोंगरकपारीतून येणारे पाण्याचे लोट रपट्यातून मोठ्या प्रमाणात सरळ शेतात शिरले. शेती पिकांसकट खरडून निघाली. यात सर्व कुटुंबाची ५.२८ हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांनी तहसीलदार जिल्हाधिकारी, तलाठी, यांना लेखी तक्रार दिली, पण आठ दिवसांचा कालावधी लोटूनही त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सदर कुटुंब हवालदिल झाले आहे.(वार्ताहर)