शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:57 IST

नजीकच्या वेळा शिवारात शेतकऱ्याच्या गोदामाला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करून गोदामातील कापूस, तूर, सोयाबीन, चणा, गहू व इतर साहित्याला आपल्या कवेत घेतल्याने शेतकरी चंदू पंडित यांचे सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

ठळक मुद्देदीड कोटींचे नुकसान : आगीवर नियंत्रण मिळविताना दोघे जखमी, तासाभरानंतर परिस्थिती आटोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नजीकच्या वेळा शिवारात शेतकऱ्याच्या गोदामाला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करून गोदामातील कापूस, तूर, सोयाबीन, चणा, गहू व इतर साहित्याला आपल्या कवेत घेतल्याने शेतकरी चंदू पंडित यांचे सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली असून आगीवर नियंत्रण मिळविताना दोन जण किरकोळ जखमी झाले.वेळा शिवारात शेतकरी चंदू पंडित यांच्या मालकीचे शेतमाल साठवणुकीचे गोदाम आहे. शिवाय त्यांच्याकडे कुटुंबियांची संयुक्त ११३ एकर शेती आहे. शेतमाल साठवणुकीसाठी त्यांनी गावात ३००० चौरस फुट जागेवर गोदामाची निर्मिती केली. या गोदामात ८२० क्विंटल कापूस अंदाजे किंमत ४५ लाख, ११ लाख रुपये किंमतीचे ३०० क्विंटल सोयाबीन, २५० क्विंटल तूर किंमत १३ लाख, २ लाख ९२ हजार किंमतीचा ७५ क्विंटल चना, २ लाख २२ हजार रुपये किंमतीचा १०७ क्विंटल गहू, तसेच सहा लाख रुपये किंमतीचे शेतउपयोगी साहित्य, ६९ लाख किंमतीचे सागाचे लाकूड असा एकूण दीड कोटींचा मुद्देमाल ठेवून होता. शनिवारी रात्री या गोदामाला अचानक आग लागल्याने हे साहित्य जळून कोळसा झाले.शेतमाल ठेवण्याच्या गोदामाला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगेवर पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यात अमोल लोणकर व मंगेश सायंकार हे किरकोळ जखमी झाले. माहिती मिळताच हिंगणघाट न.प.चा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. सुमारे तासभºयाच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेमुळे पंडित कुटुंबिय पूर्णत: हादले असून ही आग महावितरणच्या दुर्लक्षी धोरणामुळे लागल्याचा त्याचा आरोप आहे. माहिती मिळताच सहाय्यक फौजदार महादेव महाजन, जमादार गिरमकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.पंडित कुटुंबाकडे ११३ एकर शेतीपंडित कुटुंबाकडे कुटुंबाबातील विविध सदस्याच्या नावाने एकूण ११३ एकर शेती आहे. त्यात रमाबाई देवराव पंडित, प्रेमराज देवराव पंडित, चंद्रकांत देवराव पंडित, सचिन देवराव पंडित, विशाल उत्तम पंडित व रेखा उत्तम पंडित यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व संयुक्तपणे शेती करतात. शेतीतील पिकविलेले त्यांनी या गोदामात ठेवले होते. ते आगीत जळून कोळसा झाल्याने पंडित कुटुंब पूर्णत: हादरले आहे. शेतीसह विविध स्वरूपाचे घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, अशा प्रश्न सध्या त्यांच्यापुढे आहे. विद्युत दाब कमी-जास्त होऊन आगीची ठिणगी पडून ही घटना घडल्याची घटनास्थळी चर्चा होत होती.दहा कोंबड्या आगीच्या भक्ष्यस्थानीगोदामातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने बघता-बघता रौद्ररुप धारण केल्याने सदर गोदामातील दहा कोंबड्याचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जनावांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीवर सुमारे एक तासानंतर नियंत्रण मिळविले.एका लाईनमनवर तीन गावांचा ताणतीन हजार लोकसंख्येच्या या गावासाठी गत एक वर्षांपासून स्थायी लाईनमन नाही. त्यामुळे लहान वणीच्या लाईनमनकडे येथील अतिरिक्त कामाचा बोझा देण्यात आला आहे. सदर लाईनमन तीन गावांचे कामकाज पाहतो. विद्युत तारा एकमेकांना लागू नये याची दक्षता घेणे क्रमप्राप्त असताना वीटा बांधून तारा लटकत असल्याचे या भागात दिसून येते. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.ग्राहकाच्या विद्युत मीटरपर्यंत विद्युत पुरवठ्याची जबाबदारी विद्युत वितरण कंपनीची आहे. या गोदामावरून कुठलाही उच्च व लघु दाबाची विद्युत वाहिनी गेलेली नाही. तसेच या भागात विद्युत दाब कमी- जास्त होत असल्याची कुठल्याही विद्युत ग्राहकाची तक्रार नाही; पण घटना घडल्याने चौकशी अनिवार्य आहेच. महावितरणचे अधिकारी व विद्युत निरीक्षकांकडून चौकशी करण्यात येईल.- हेमंत पावडे, कार्यकारी अभियंता, महावितरण, हिंगणघाटशेतकºयांच्या पीक संरक्षणासाठी कुठलेही आश्वस्त व शाश्वत धोरण सरकारकडे नाही. शिवाय आज हे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याच्या भरपाईसाठी कुठलीही योजना किंवा कुठलेही धोरण शासनाकडे नाही. शेतकरी आरक्षणातील पीक संरक्षणाचा पर्याय अशा प्रकारच्या नुकसानीच्या वेळी पीक उत्पन्न किंमतीचे संरक्षण या आरक्षणाद्वारेच शेतकºयांना पुरविणार आहे. म्हणून शेतकºयांच्या आश्वस्त रक्षणासाठी व दीर्घकालीन विकासात्मक उपाययोजना म्हणून हा पर्याय अमलात आणणे गरजेचे आहे. अशाच प्रकारच्या आगीमुळे एखाद्या उद्योजकाची किंवा जिनिंग मालकाचे नुकसान झाले असते तर त्याला लगेच नुकसान भरपाई मिळाली असती. मात्र, अशाच प्रकारचे नुकसान शेतकºयांचे झाल्यावर कुठलाही पर्याय नसल्याची बाब या कृषिप्रधान देशासाठी दुर्भाग्यपूर्ण आहे.- शैलेश अग्रवाल, प्रणेते, शेतकरी आरक्षण.

टॅग्स :fireआगFarmerशेतकरी