शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर, व्यापाऱ्यांचा शेडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

बाजार समितीमध्ये खरेदी केलेला शेतमाल व्यापाऱ्यांना उचलण्यासाठी काही कालावधी लागत आहे. दोनच शेड असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल आणि शेतकऱ्यांचा विक्रीकरिता आलेला शेतमाल ठेवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच पावसाने हजेरी लावली तर शेडबाहेर असलेला शेतमाल ओला होऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.

ठळक मुद्देवर्धा बाजार समितीत शेडची कमतरता : लॉकडाऊनमुळे अडला व्यापाऱ्यांचा माल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील बाजार समितीमधील तीन शेड गेल्या वर्षभरापासून भाजी बाजाराकरिता वापरली जात असल्याने शेतमाल ठेवण्याकरिता सध्या दोनच शेड उपलब्ध आहेत. अशातच आता लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना खरेदी केलेला शेतमाल साठविण्याची अडचण असल्याने तो शेडमध्ये दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपला शेतमाला उघड्यावर ठेवावा लागतो. पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांना नुकसानीचाही सामना करावा लागत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लादल्याने बाजार समित्याही बंद होत्या. त्यासोबतच राज्यभरातही लॉकडाऊन असल्याने व्यापाऱ्यांना वाहनाअभावी कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी केलेला शेतमाल इतरत्र हलविता आला नाही. शिथिलता मिळाल्यानंतर काही प्रमाणात शेतमाल इतर ठिकाणी हलविला. तसेच बाजारात शेतमालाची आवकही वाढायला लागल्याने यात शेतमालाची आणखी भर पडली. त्यामुळे बाजार समितीमध्ये खरेदी केलेला शेतमाल व्यापाऱ्यांना उचलण्यासाठी काही कालावधी लागत आहे. दोनच शेड असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल आणि शेतकऱ्यांचा विक्रीकरिता आलेला शेतमाल ठेवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच पावसाने हजेरी लावली तर शेडबाहेर असलेला शेतमाल ओला होऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. 

बाजार समितीतील व्यवस्थाबाजार समितीमध्ये आवाक वाढली असून शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर तर व्यापाऱ्यांचा शेडमध्ये अशी अवस्था आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने माझ्या शेतमालासोबतच काही शेतकऱ्यांचा शेतमाल ओला झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.- गौरव लोखंडे,शेतकरी बेलगाव. 

बाजार समितीमध्ये पाच शेडची व्यवस्था असून वर्षभरापासून तीन शेड भाजी बाजाराकरिता दिले आहे. आता शेतमालाकरिता दोनच शेड उपलब्ध आहेत. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे खरेदी केलेले धान्य शेडमध्ये होते. शिथिलता मिळाल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या गोदामात नेले. आता आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनाही खरेदी केलेले धान्य उचलन्यासाठी थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नुकताच जुन्या शेडमध्ये धान्य ठेवण्याची व्यवस्था केली आहे.- समीर पेंडके,   सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी