शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर, व्यापाऱ्यांचा शेडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

बाजार समितीमध्ये खरेदी केलेला शेतमाल व्यापाऱ्यांना उचलण्यासाठी काही कालावधी लागत आहे. दोनच शेड असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल आणि शेतकऱ्यांचा विक्रीकरिता आलेला शेतमाल ठेवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच पावसाने हजेरी लावली तर शेडबाहेर असलेला शेतमाल ओला होऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.

ठळक मुद्देवर्धा बाजार समितीत शेडची कमतरता : लॉकडाऊनमुळे अडला व्यापाऱ्यांचा माल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील बाजार समितीमधील तीन शेड गेल्या वर्षभरापासून भाजी बाजाराकरिता वापरली जात असल्याने शेतमाल ठेवण्याकरिता सध्या दोनच शेड उपलब्ध आहेत. अशातच आता लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना खरेदी केलेला शेतमाल साठविण्याची अडचण असल्याने तो शेडमध्ये दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपला शेतमाला उघड्यावर ठेवावा लागतो. पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांना नुकसानीचाही सामना करावा लागत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लादल्याने बाजार समित्याही बंद होत्या. त्यासोबतच राज्यभरातही लॉकडाऊन असल्याने व्यापाऱ्यांना वाहनाअभावी कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी केलेला शेतमाल इतरत्र हलविता आला नाही. शिथिलता मिळाल्यानंतर काही प्रमाणात शेतमाल इतर ठिकाणी हलविला. तसेच बाजारात शेतमालाची आवकही वाढायला लागल्याने यात शेतमालाची आणखी भर पडली. त्यामुळे बाजार समितीमध्ये खरेदी केलेला शेतमाल व्यापाऱ्यांना उचलण्यासाठी काही कालावधी लागत आहे. दोनच शेड असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल आणि शेतकऱ्यांचा विक्रीकरिता आलेला शेतमाल ठेवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच पावसाने हजेरी लावली तर शेडबाहेर असलेला शेतमाल ओला होऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. 

बाजार समितीतील व्यवस्थाबाजार समितीमध्ये आवाक वाढली असून शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर तर व्यापाऱ्यांचा शेडमध्ये अशी अवस्था आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने माझ्या शेतमालासोबतच काही शेतकऱ्यांचा शेतमाल ओला झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.- गौरव लोखंडे,शेतकरी बेलगाव. 

बाजार समितीमध्ये पाच शेडची व्यवस्था असून वर्षभरापासून तीन शेड भाजी बाजाराकरिता दिले आहे. आता शेतमालाकरिता दोनच शेड उपलब्ध आहेत. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे खरेदी केलेले धान्य शेडमध्ये होते. शिथिलता मिळाल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या गोदामात नेले. आता आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनाही खरेदी केलेले धान्य उचलन्यासाठी थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नुकताच जुन्या शेडमध्ये धान्य ठेवण्याची व्यवस्था केली आहे.- समीर पेंडके,   सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी